शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

उदयनराजेंना संभाजी भिंडेंची भूमिका अमान्य : --भारत पाटणकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 11:42 IST

‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वधर्म समभावाच्या भूमिकेवर आपणही ठाम आहे. मात्र, या भूमिकेशी विसंगत भूमिका असलेल्या संभाजी भिडे यांच्यासह सर्वांच्या भूमिका

ठळक मुद्दे‘सध्या होत असलेली निवडणूक ही शेवटची निवडणूक असल्याचे भाजपचे खासदार साक्षी महाराज सांगत आहेतभाजप लोकशाही बुडवायला निघाल्याचा केला आरोप

सातारा : ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वधर्म समभावाच्या भूमिकेवर आपणही ठाम आहे. मात्र, या भूमिकेशी विसंगत भूमिका असलेल्या संभाजी भिडे यांच्यासह सर्वांच्या भूमिका आपल्याला अमान्य आहेत,’ असे पत्र खा. उदयनराजे भोसले यांनी दिल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

पाटणकर म्हणाले, ‘सध्या होत असलेली निवडणूक ही शेवटची निवडणूक असल्याचे भाजपचे खासदार साक्षी महाराज सांगत आहेत. त्यामुळे लोकशाही वाचविण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. चळवळीत आंदोलन करण्याचे अधिकार लोकशाहीमुळे मिळाले. ते अधिकार वाचविण्याची निवडणूक ही संधी आहे.’  

श्रमिक मुक्ती दलाने तयार केलेला जाहीरनाम्याची अंमलबजावणी करण्याचे पत्र खा. उदयनराजे यांनी दिले आहे. मतदार संघात समन्यायी पाणी वाटप तत्त्व लागू करून प्रत्येक कुटुंबाला किमान ५ एकरांचे बारमाही बागायत करण्यासाठी सार्वत्रिक बंद पाईप योजना लागू करणार. तसेच विकेंद्रित अत्याधुनिक कृषी उद्योग शासनाच्या बीज भांडवलाच्या आधारावर रोजगार निर्मिती करणार असल्याचे खा. उदयनराजे यांनी लेखी पत्र दिले आहे. 

दरम्यान, खा. उदयनराजेंनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्यास आपण काय भूमिका घेणार? असा प्रश्न पाटणकर यांना यावेळी विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, ‘त्यांनी आश्वासनांची पूर्तता न केल्यास खासदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जाईल. मागील पाच वर्षांप्रमाणे आम्ही यावेळी गाफील राहणार नाही,’ असे पाटणकर यांनी सांगितले. 

दरम्यान, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांना यांच्यासोबत जातीअंताच्या लढाईत आम्ही अनेक वर्षांपासून सोबत काम करत आहोत. यापुढेही हे कार्य सुरूच राहील, असे डॉ. पाटणकर यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसले