शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

नदीत बुडून दोन तरुणांचा मृत्यू

By admin | Updated: April 6, 2015 01:30 IST

हरिपुरातील घटना : दोघे बचावले; मृत राजस्थानचे

सांगली : हरिपूर (ता. मिरज) येथील कृष्णा-वारणा नदीच्या संगमातील पात्रात अंघोळीसाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला, तर दोघेजण प्रसंगावधान राखून पात्राबाहेर आल्याने बचावले. मिट्टू नंदकिशोर दानका (वय २३) व राजेंद्रकुमार पप्पू वर्मा (१७, दोघे रा. राजस्थान, सध्या रा. इस्लामपूर) अशी मृतांची नावे आहेत. आज, रविवारी दुपारी दोन वाजता ही घटना घडली. राजकुमार नंदकिशोर दानका (२४) व मोनू हनुमानदास दानका (२१, राजस्थान, सध्या रा. बोंद्रे वाडा, हरिपूर) हे दोघे बचावले आहेत. मिट्टू दानका व राजेंद्रकुमार वर्मा इस्लामपुरात भाड्याने खोली घेऊन राहात होते. ते फरशी बसविण्याचे काम करीत होते. मिट्टूचा सख्खा भाऊ राजकुमार व नातेवाईक मोनू दानका हे हरिपुरात राहतात. आज दुपारी हे चौघेही एकत्रित बसून जेवले. त्यानंतर दीड वाजता ते अंघोळ करण्यासाठी कृष्णा-वारणा संगमावर गेले होते. चौघांनाही पोहता येत नव्हते. मिट्टू व राजेंद्रकुमार पाण्याचा अंदाज घेत काठापासून जवळपास दहा फूट अंतरावर पाण्यात गेले. याठिकाणी वाळू उपशामुळे मोठा खड्डा पडला होता. याचा त्यांना अंदाज आला नाही. या खड्ड्यात मिट्टू आणि राजेंद्रचा पाय गेल्याने ते पाण्यात बुडू लागले. हा प्रकार पाहून पाठीमागे नदीकाठाजवळ अंघोळ करणाऱ्या राजकुमार व मोनू यांनी आरडाओरड केली. प्रसंगावधान राखून भीतीने ते नदीतून बाहेर आले. दरम्यान, नदीच्या काठावर क्रिकेट खेळणाऱ्या तरुणांनी मदतीसाठी धाव घेतली. मात्र तोपर्यंत दोघेही बुडाले होते. या घटनेची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलीस, महापालिका अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले होते. दुपारी अडीचपासून दोघांचा शोध सुरु होता. सायंकाळी साडेपाचला दोघांचे मृतदेह सापडले. (प्रतिनिधी)