शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

सर्वसामान्यांचा प्रवास होणार सुखाचा; सातारा जिल्ह्यातून दोन पॅसेंजर धावू लागल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2021 17:39 IST

जगदीश कोष्टी सातारा : आशियायी महामार्ग, राष्ट्रीय, राज्य, जिल्हा मार्गाचे जाळे दाट विणले गेले आहे. त्याचप्रमाणे आदर्की परिसरातील डोंगररांगांमधून ...

जगदीश कोष्टीसातारा : आशियायी महामार्ग, राष्ट्रीय, राज्य, जिल्हा मार्गाचे जाळे दाट विणले गेले आहे. त्याचप्रमाणे आदर्की परिसरातील डोंगररांगांमधून नागमोडी वळणे घेत धावणे रेल्वे लहान लहान गावांतील शेतकरी, विद्यार्थ्यांसाठी स्वस्तात प्रवासाचे भारी साधन होते. मात्र, कोरोनानंतर मार्च २०२० पासून पॅसेंजर बंद झाली अन् अनेक लहान स्थानके लॉकडाऊन झाले. आता पॅसेंजर सुरू झाल्याने या स्थानकांमध्ये वर्दळ वाढली आहे.

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव मार्च २०२० मध्ये झाला. तेव्हा कोरोनाचे संक्रमण बाधित लोकांच्या संपर्कात आल्यामुळे होत होते. त्यामुळे केंद्र सरकारने सर्वप्रथम सार्वजनिक प्रवासी वाहतूक बंद करण्याचा निर्णय झाला. जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या. मात्र, रेल्वे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात धावते. त्यामुळे तिही बंद करण्यात आली. या वीस महिन्यांत अधूनमधून लॉकडाऊन लागत असल्याने संचारबंदी होती. त्यामुळे प्रवास फारसा घडत नव्हता. पण त्यानंतर एक्स्प्रेस सुरू करण्यात आल्या. पण पॅसेंजरचा तिकीट दर फारच कमी असल्याने त्यात मोठी गर्दी असते. पाय ठेवायलाही जागा नसते. त्यामुळे पॅसेंजरला अजूनही लाल दिवाच दाखविण्यात आला होता.

सातारा-कोल्हापूर, सातारा-पुणे पॅसेंजर सुरू केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला प्रवासासाठी जवळच्या शहराच्या ठिकाणी जायचे अन् तेथून एस.टी.ने पुणे, मुंबईला जावे लागत होते. यात वेळ आणि पैसा जास्त वाया जात होता. तो वाचण्यास मदत होणार आहे.

पॅसेंजरमधून प्रवास करण्यासाठी प्रवाशांनी कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेले असणे गरजेचे आहे.

सध्या सुरू असलेल्या गाड्या

महाराष्ट्र एक्स्प्रेस

गोवा एक्स्प्रेस

मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस

मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस

हजरत निझामुद्दीन एक्स्प्रेस (आठवड्यातून एकदा)

पूर्णा एक्स्प्रेस (आठवड्यातून एकदा)

जोधपूर फेस्टिव्हल (आठवड्यातून दोनदा)

दादर सेंट्रल चालुक्य एक्स्प्रेस (आठवड्यातून तीनदा)

नवीन पॅसेंजर सुरू

सातारा-पुणे

सातारा-कोल्हापूर

आणखी तीन पॅसेंजर सुरू करण्याची गरज

- कोरोनाचा शिरकाव होण्यापूर्वी सातारा-पुणे पॅसेंजर सकाळी व संध्याकाळी, सातारा-कोल्हापूर पॅसेंजर सकाळी-संध्याकाळी, तसेच पुणे-फलटण ही पॅसेंजर धावत होती. यातील आता सातारा-पुणे सकाळी व सातारा-कोल्हापूर ही एकवेळच धावते. पुणे-फलटण गाडी अजून बंद आहे.

- पॅसेंजरला आजवर सातारकरांमधून मिळत असलेल्या प्रतिसादाचा विचार करून सर्वच्या सर्व गाड्या सुरू करण्याची गरज आहे. त्यामुळे ग्रामीण विद्यार्थी, शेतकऱ्यांना कृषी माल शहरांमध्ये घेऊन जाणे सोपे जाणार आहे.

सातारा जिल्ह्यातून आजवर पॅसेंजर नसल्याने अनेक छोट्या गावातील नागरिकांची गैरसोय होत होती. आता पॅसेंजर सुरू झाल्याने फायदा होणार आहे. मात्र, अजूनही या गाड्यांचे दर एक्स्प्रेसचेच घेतले जातात. हा अन्याय आहे. पॅसेंजरच्या दुप्पट हे दर आहेत. त्यामुळे दरही पूर्वीप्रमाणेच लागू करावेत.- रामदास जगताप, सातारा.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरrailwayरेल्वे