शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

दोन महिन्यांत तब्बल आठ मुलांची घरवापसी, सातारा पोलिसांनी केले पालकांकडे सुपुर्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 20:38 IST

गोडोली : विविध कारणांमुळे घरात झालेल्या किरकोळ वादाचा राग, पालकांची भीती यामुळे घर सोडून आलेल्या पाच अल्पवयीन मुलांची व तीन मुलींची सातारा बसस्थानक पोलिसांनी

ठळक मुद्देविविध कारणांनी सोडले होते घर :पोलिसांना पाहून घाबरतात आणि पळून जातात.

गोडोली : विविध कारणांमुळे घरात झालेल्या किरकोळ वादाचा राग, पालकांची भीती यामुळे घर सोडून आलेल्या पाच अल्पवयीन मुलांची व तीन मुलींची सातारा बसस्थानक पोलिसांनी त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देऊन घरवापसी केली आहे.

शहरी वातावरणाचे आकर्षण, टीव्ही, चित्रपट, मालिकांचा प्रभाव याचा सामान्य कुटुंबातील अल्पवयीन मुलांमुलींवर परिणाम होत आहे. प्रेमप्रकरण, घरचा वाद, पालकांची अवास्तव भीती यामुळे आणि इतरही क्षुल्लक कारणांमुळं मुलं घर सोडत असल्याचे निदर्शनास येत आहे. यात विशेषत: अल्पवयीन मुलांचे प्रमाण लक्षणीय आहे. गत तीन महिन्यांत सातारा बसस्थानक पोलिसांनी आढळून आलेल्या पाच मुलांना तर तीन मुलींना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे. ही सर्व मुले सर्वसाधारण आणि गरीब कुटुंबातील असल्याचे दिसून आले आहे.

क्षुल्लक कारणापोटी ही मुले घर सोडतात, शहरात येतात आणि पैसे संपले की वणवण भटकतात, त्यांच्या या असा' अवस्थेचा मग काही समाजकंटक आपल्या स्वार्थासाठी वापर करतात. बसस्थानक परिसरात फिरणारे असामाजिक घटक खेडोपाड्यातून आलेल्या गरीब मुलांना हेरून आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे बालपण हिरावून घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच सातारा बसस्थानक पोलिस चौकीतील हवालदार दत्ता पवार, प्रवीण पवार, केतन शिंदे यांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक केले जात आहे.

दोन महिन्यांत तब्बल आठ मुलं बसस्थानकात सापडली. यामध्ये प्रेम प्रकरणातून पळून आलेली मुलगी तर काही मुलं घरातील भांडणामुळे घराबाहेर पडली होती. साधारणत: घरातून पळून आलेली मुलं गणवेशातील पोलिसांना पाहून घाबरतात आणि पळून जातात. तर काही मुले रडायला लागतात. त्यांच्याकडील पैसे संपलेले असतात, त्यांना चूक कळलेली असते. घरी परत जाण्यासाठी त्यांना मदत हवी असते. भरकटलेल्या अशा मुलांना सातारा बसस्थानक पोलिसांनी वेळीच पालकांच्या स्वाधीन केल्याने खºया अर्थाने त्यांची घरवापसी झाली आहे.

 

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेSatara areaसातारा परिसर