शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

दोन महिन्यांत तब्बल आठ मुलांची घरवापसी, सातारा पोलिसांनी केले पालकांकडे सुपुर्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 20:38 IST

गोडोली : विविध कारणांमुळे घरात झालेल्या किरकोळ वादाचा राग, पालकांची भीती यामुळे घर सोडून आलेल्या पाच अल्पवयीन मुलांची व तीन मुलींची सातारा बसस्थानक पोलिसांनी

ठळक मुद्देविविध कारणांनी सोडले होते घर :पोलिसांना पाहून घाबरतात आणि पळून जातात.

गोडोली : विविध कारणांमुळे घरात झालेल्या किरकोळ वादाचा राग, पालकांची भीती यामुळे घर सोडून आलेल्या पाच अल्पवयीन मुलांची व तीन मुलींची सातारा बसस्थानक पोलिसांनी त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देऊन घरवापसी केली आहे.

शहरी वातावरणाचे आकर्षण, टीव्ही, चित्रपट, मालिकांचा प्रभाव याचा सामान्य कुटुंबातील अल्पवयीन मुलांमुलींवर परिणाम होत आहे. प्रेमप्रकरण, घरचा वाद, पालकांची अवास्तव भीती यामुळे आणि इतरही क्षुल्लक कारणांमुळं मुलं घर सोडत असल्याचे निदर्शनास येत आहे. यात विशेषत: अल्पवयीन मुलांचे प्रमाण लक्षणीय आहे. गत तीन महिन्यांत सातारा बसस्थानक पोलिसांनी आढळून आलेल्या पाच मुलांना तर तीन मुलींना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे. ही सर्व मुले सर्वसाधारण आणि गरीब कुटुंबातील असल्याचे दिसून आले आहे.

क्षुल्लक कारणापोटी ही मुले घर सोडतात, शहरात येतात आणि पैसे संपले की वणवण भटकतात, त्यांच्या या असा' अवस्थेचा मग काही समाजकंटक आपल्या स्वार्थासाठी वापर करतात. बसस्थानक परिसरात फिरणारे असामाजिक घटक खेडोपाड्यातून आलेल्या गरीब मुलांना हेरून आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे बालपण हिरावून घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच सातारा बसस्थानक पोलिस चौकीतील हवालदार दत्ता पवार, प्रवीण पवार, केतन शिंदे यांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक केले जात आहे.

दोन महिन्यांत तब्बल आठ मुलं बसस्थानकात सापडली. यामध्ये प्रेम प्रकरणातून पळून आलेली मुलगी तर काही मुलं घरातील भांडणामुळे घराबाहेर पडली होती. साधारणत: घरातून पळून आलेली मुलं गणवेशातील पोलिसांना पाहून घाबरतात आणि पळून जातात. तर काही मुले रडायला लागतात. त्यांच्याकडील पैसे संपलेले असतात, त्यांना चूक कळलेली असते. घरी परत जाण्यासाठी त्यांना मदत हवी असते. भरकटलेल्या अशा मुलांना सातारा बसस्थानक पोलिसांनी वेळीच पालकांच्या स्वाधीन केल्याने खºया अर्थाने त्यांची घरवापसी झाली आहे.

 

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेSatara areaसातारा परिसर