शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

वणव्याने घेतला दोन मुक्या जिवांचा बळी, वाईत वणव्याच्या घटना वाढल्या

By दीपक शिंदे | Updated: March 11, 2024 15:34 IST

वाई : वाई तालुक्यात वणवे लागण्याचे प्रमाण काही केल्या कमी होत नाहीत. त्याचे दुष्परिणाम दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. अज्ञात ...

वाई : वाई तालुक्यात वणवे लागण्याचे प्रमाण काही केल्या कमी होत नाहीत. त्याचे दुष्परिणाम दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. अज्ञात विघ्नसंतोषी मंडळींनी लावलेल्या वणव्यात पिराचीवाडी येथील एका शेतकऱ्याचा जनावरांच्या गोठ्याला धग लागून दोन मुक्या जनावरांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.वाई तालुक्यात वणवे लागण्याच्या घटना सतत घडत आहेत. पसरणीचा डोंगर, मांढरदेवचा डोंगर, वैराटगडाचा डोंगर असे डोंगर पेटून काळे ठिक्क पडत आहेत. ते वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमींचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे. असे असतानाच वाईच्या उत्तर बाजूला असलेल्या धावडी गावालगतच्या डोंगरावर अज्ञात व्यक्तींकडून रविवारी दुपारी वणवा लावण्यात आला. तो वणवा वाऱ्याच्या वेगाने भडकला. वणव्याने वाळलेल्या गवताबरोबरच सागाची, शिवरीची झाडे कवेत घेत रौद्र रूप धारण केले. वणव्याची दाहकता वाढत होती. हा वणवा त्याच गावालगत असलेल्या पिराचीवाडी येथील दशरथ कोचळे यांच्या जनावराच्या गोठ्याजवळ पोहोचला. आगीच्या ज्वाळांनी गुरांचा गोठा वेढला गेला. घटनेची माहिती मिळताच शेतकरी व ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले; परंतु गोठ्यातील एक खोंड आणि एका गायीचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, वाई वनविभागाकडून वणवा आटोक्यात आणण्याचे काम सुरू होते, अशी माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfireआगwai-acवाई