शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वीस वर्षे शेतकरी मोबदल्याच्या प्रतीक्षेत; प्रशासन दखल घेईना म्हणून ते करणार आता आत्मदहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 19:22 IST

बाळकृष्ण पवार यांच्या मालकीची एकूण 10 गुंठे जमीन महामार्ग बनवण्यासाठी संपादित करण्यात आली. तशा नोंदीही सातबारा उताऱ्यावर फेरफार नुसार करण्यात आल्या. त्या नोंदींप्रमाणे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने त्यांच्या जमिनीतून महामार्ग बनविला. हे काम सन 2000 साली करण्यात आले होते.

ठळक मुद्देमहामार्गाला दिली होती जागा, प्रशासन अजून दखल घेईना म्हणून ते करणार आता आत्मदहनप्रशासनाला जागच येत नसेल तर हे निष्क्रिय प्रशासन काय कामाचे?

वेळे (सातारा) - हायवेमध्ये गेलेल्या जमिनीचा 20 वर्षे झाली तरी अद्यापपर्यंत नुकसान भरपाई चा मोबदला न मिळाल्याने वेळे, ता. वाई येथील शेतकरी बाळकृष्ण रामचंद्र पवार यांनी हायवेवरच आपल्या संपूर्ण कुटुंबासह आत्मदहन करण्याचा इशारा जिल्हाधिकारी सातारा तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक सातारा यांना यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

महामार्ग चौपदरी करणाच्या वेळी बाळकृष्ण पवार यांच्या मालकीची तीन गटांतील एकूण 10 गुंठे जमीन महामार्ग बनवण्यासाठी संपादित करण्यात आली. तशा नोंदीही सातबारा उताऱ्यावर फेरफार नुसार करण्यात आल्या. त्या नोंदींप्रमाणे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने त्यांच्या जमिनीतून महामार्ग बनविला. हे काम सन 2000 साली करण्यात आले होते.

या जमिनीचा मोबदला देण्याचे प्राधिकरणाने कबूल केले होते. मात्र आजमितीला जवळपास 20 वर्षे पूर्ण होत आली तरीही या जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी या शेतकऱ्याला झगडावे लागत आहे. एवढे झगडून देखील पदरी निराशाच आल्याने खचून जावून त्या शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला.

एकूण 10 गुंठे जमिनी पैकी फक्त 1 गुंठे क्षेत्राची मोबदला रक्कम प्राधिकरणाने या शेतकऱ्याला अदा केली. उर्वरीत 9 गुंठे क्षेत्राची रक्कम अजूनही मिळाली नसल्याची स्पष्टोक्ती बाळकृष्ण पवार यांनी दिली. ही मोबदला रक्कम मिळविण्यासाठी त्यांनी सर्व कागदपत्रे तयार करून राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण व संबंधित विभाग आणि कार्यालये यांना वेळोवेळी संपर्क साधून, पत्रव्यवहार करून, अधिकाऱ्यांची समक्ष भेट घेवून देखील त्यांच्या या मागणीला केराची टोपली दाखवत सोयीस्कर रित्या टाळाटाळ केली जात असल्याने आता दाद तरी कोणाला मागायची? हा प्रश्न त्यांना सतावू लागल्याने अखेर त्यांनी आपल्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आत्मदहनाचा मार्ग स्वीकारला.

जिल्हाधिकारी यांना दिलेल्या इशारा वजा निवेदनात असे म्हटले आहे की, सदर जमिनीचा मोबदला या महिनाअखेर मिळाला नाही तर त्यानंतर कोणत्याही क्षणी या जमिनीतून गेलेला महामार्ग बंद करून प्रसंगी त्याच ठिकाणी सहकुटुंब आत्मदहन करण्यात येईल. या होणाऱ्या प्रसंगाला महामार्ग प्राधिकरण व संपूर्ण प्रशासनच जबाबदार असणार आहे. तसेच  मोबदला न मिळालेल्या जमिनीतून अवैधपणे नेलेला राष्ट्रीय महामार्ग मी बंद का करू नये? असा सडेतोड प्रश्नही त्यांनी या निवेदनातून विचारला आहे.

बाळकृष्ण पवार यांचेसह स्वप्नील बाळासाहेब कांगडे, विजय लक्ष्मण कांगडे, धर्मु बाजीराव पवार, संतोष रघुनाथ पवार या शेतकऱ्यांना देखील मोबदला रक्कम मिळविण्यासाठी सरकार दफ्तरी उंबरठे झिझवावे लागत आहेत. तरी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांमार्फत या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला त्वरित मिळावा एवढीच माफक अपेक्षा या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

राष्ट्रीय हितासाठी आपल्या मालकी हक्काच्या जमिनी देवून देखील त्याच्या नुकसान भरपाईसाठी वीस वर्षे लागत असतील तर यापेक्षा शेतकऱ्यांचे दुर्दैव ते काय! त्यामुळेच शेतकरी संतापला जातो व टोकाचे पाऊल उचलतो. तरीही प्रशासनाला जागच येत नसेल तर हे निष्क्रिय प्रशासन काय कामाचे?

Quote: मी गेली वीस वर्षांपासून माझ्या जमिनीचा मोबदला मिळावा म्हणून अनेकदा संबंधित कार्यालयांत हेलपाटे मारत होतो. मात्र माझी जमीनच संपादित केली नाही तर मोबदला देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे उत्तर मिळाले. वास्तविक जमीन संपादित झाली असल्याचे पुरावे सादर करूनही मला वेठीस धरले जात आहे. त्यामुळे मी कोणत्याही परिस्थितीत माझ्या जमिनीतून गेलेला महामार्ग बंद करून प्रसंगी आत्मदहन करण्याच्या विचारात आहे._ बाळकृष्ण पवार, बाधित शेतकरी, वेळे

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcollectorजिल्हाधिकारीhighwayमहामार्ग