शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

वीस वर्षे शेतकरी मोबदल्याच्या प्रतीक्षेत; प्रशासन दखल घेईना म्हणून ते करणार आता आत्मदहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 19:22 IST

बाळकृष्ण पवार यांच्या मालकीची एकूण 10 गुंठे जमीन महामार्ग बनवण्यासाठी संपादित करण्यात आली. तशा नोंदीही सातबारा उताऱ्यावर फेरफार नुसार करण्यात आल्या. त्या नोंदींप्रमाणे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने त्यांच्या जमिनीतून महामार्ग बनविला. हे काम सन 2000 साली करण्यात आले होते.

ठळक मुद्देमहामार्गाला दिली होती जागा, प्रशासन अजून दखल घेईना म्हणून ते करणार आता आत्मदहनप्रशासनाला जागच येत नसेल तर हे निष्क्रिय प्रशासन काय कामाचे?

वेळे (सातारा) - हायवेमध्ये गेलेल्या जमिनीचा 20 वर्षे झाली तरी अद्यापपर्यंत नुकसान भरपाई चा मोबदला न मिळाल्याने वेळे, ता. वाई येथील शेतकरी बाळकृष्ण रामचंद्र पवार यांनी हायवेवरच आपल्या संपूर्ण कुटुंबासह आत्मदहन करण्याचा इशारा जिल्हाधिकारी सातारा तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक सातारा यांना यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

महामार्ग चौपदरी करणाच्या वेळी बाळकृष्ण पवार यांच्या मालकीची तीन गटांतील एकूण 10 गुंठे जमीन महामार्ग बनवण्यासाठी संपादित करण्यात आली. तशा नोंदीही सातबारा उताऱ्यावर फेरफार नुसार करण्यात आल्या. त्या नोंदींप्रमाणे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने त्यांच्या जमिनीतून महामार्ग बनविला. हे काम सन 2000 साली करण्यात आले होते.

या जमिनीचा मोबदला देण्याचे प्राधिकरणाने कबूल केले होते. मात्र आजमितीला जवळपास 20 वर्षे पूर्ण होत आली तरीही या जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी या शेतकऱ्याला झगडावे लागत आहे. एवढे झगडून देखील पदरी निराशाच आल्याने खचून जावून त्या शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला.

एकूण 10 गुंठे जमिनी पैकी फक्त 1 गुंठे क्षेत्राची मोबदला रक्कम प्राधिकरणाने या शेतकऱ्याला अदा केली. उर्वरीत 9 गुंठे क्षेत्राची रक्कम अजूनही मिळाली नसल्याची स्पष्टोक्ती बाळकृष्ण पवार यांनी दिली. ही मोबदला रक्कम मिळविण्यासाठी त्यांनी सर्व कागदपत्रे तयार करून राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण व संबंधित विभाग आणि कार्यालये यांना वेळोवेळी संपर्क साधून, पत्रव्यवहार करून, अधिकाऱ्यांची समक्ष भेट घेवून देखील त्यांच्या या मागणीला केराची टोपली दाखवत सोयीस्कर रित्या टाळाटाळ केली जात असल्याने आता दाद तरी कोणाला मागायची? हा प्रश्न त्यांना सतावू लागल्याने अखेर त्यांनी आपल्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आत्मदहनाचा मार्ग स्वीकारला.

जिल्हाधिकारी यांना दिलेल्या इशारा वजा निवेदनात असे म्हटले आहे की, सदर जमिनीचा मोबदला या महिनाअखेर मिळाला नाही तर त्यानंतर कोणत्याही क्षणी या जमिनीतून गेलेला महामार्ग बंद करून प्रसंगी त्याच ठिकाणी सहकुटुंब आत्मदहन करण्यात येईल. या होणाऱ्या प्रसंगाला महामार्ग प्राधिकरण व संपूर्ण प्रशासनच जबाबदार असणार आहे. तसेच  मोबदला न मिळालेल्या जमिनीतून अवैधपणे नेलेला राष्ट्रीय महामार्ग मी बंद का करू नये? असा सडेतोड प्रश्नही त्यांनी या निवेदनातून विचारला आहे.

बाळकृष्ण पवार यांचेसह स्वप्नील बाळासाहेब कांगडे, विजय लक्ष्मण कांगडे, धर्मु बाजीराव पवार, संतोष रघुनाथ पवार या शेतकऱ्यांना देखील मोबदला रक्कम मिळविण्यासाठी सरकार दफ्तरी उंबरठे झिझवावे लागत आहेत. तरी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांमार्फत या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला त्वरित मिळावा एवढीच माफक अपेक्षा या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

राष्ट्रीय हितासाठी आपल्या मालकी हक्काच्या जमिनी देवून देखील त्याच्या नुकसान भरपाईसाठी वीस वर्षे लागत असतील तर यापेक्षा शेतकऱ्यांचे दुर्दैव ते काय! त्यामुळेच शेतकरी संतापला जातो व टोकाचे पाऊल उचलतो. तरीही प्रशासनाला जागच येत नसेल तर हे निष्क्रिय प्रशासन काय कामाचे?

Quote: मी गेली वीस वर्षांपासून माझ्या जमिनीचा मोबदला मिळावा म्हणून अनेकदा संबंधित कार्यालयांत हेलपाटे मारत होतो. मात्र माझी जमीनच संपादित केली नाही तर मोबदला देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे उत्तर मिळाले. वास्तविक जमीन संपादित झाली असल्याचे पुरावे सादर करूनही मला वेठीस धरले जात आहे. त्यामुळे मी कोणत्याही परिस्थितीत माझ्या जमिनीतून गेलेला महामार्ग बंद करून प्रसंगी आत्मदहन करण्याच्या विचारात आहे._ बाळकृष्ण पवार, बाधित शेतकरी, वेळे

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcollectorजिल्हाधिकारीhighwayमहामार्ग