शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

बारा स्वच्छतागृहे आली दिमतीला!

By admin | Updated: July 12, 2015 00:35 IST

फिरते शौचालयही : ‘स्वच्छ-सुंदर सातारा’साठी पालिका प्रशासन सरसावले

दत्ता यादव / सातारा सातारा शहर हे एलईडी, स्मार्ट सीटीच्या दिशेने वाटचाल करत असतानाच आता स्वच्छ आणि सुंदर सातारा सीटी होण्यासाठी पालिका प्रशासन सरसावले आहे. एक फिरते शौचालय आणि बारा स्वच्छतागृहे नागरिकांच्या सेवेस लवकरच सज्ज होणार असल्याने नागरिकांची कुचंबणा तर थांबणारच; शिवाय नागरिकांचे आरोग्यमानही उंचावणार आहे. शहरामध्ये इन मीन तीन शौचालये आणि पाच ते सहा स्वच्छतागृहे आहेत. स्वच्छतागृहांची अवस्था दयनीय आहे. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होऊ लागली आहे. त्यामध्ये विशेषत: महिलांपुढे मोठी अडचण आणि समस्या निर्माण होत असते. अशा खासगी गोष्टीवर महिलांना उघडपणे बोलता येत नसल्यामुळे प्रशासनापर्यंत ही महत्त्वाची समस्या आत्तापर्यंत पोहोचत नव्हती. मात्र दोन दिवसांपूर्वी झालेल्या वॉर्ड कमिटीच्या बैठकीत हाच महत्त्वाचा मुद्दा चर्चेला गेला. आणि कमिटीतील सदस्यांनी स्वच्छतागृह नसल्यामुळे होणाऱ्या अडचणी मांडल्या. त्यामुळे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जागा दाखवा.. स्वच्छतागृहे उभारू, असे सांगितले होते. मात्र जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात नागरिकांकडून फारसा प्रतिसाद मिळालेला दिसून आला नाही. त्यामुळे पुढे होऊन आपल्यालाच यावर तोडगा काढावा लागणार असल्याचे पालिका प्रशासनाला मीहिती असल्याने ‘स्वच्छ सातारा’साठी प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या, तसेच त्याची अंमलबजावणीही केली. शहरामध्ये आत्तापर्यंत महिलांसाठी रस्त्यावर आणि मोक्याच्या ठिकाणी एकही स्वच्छतागृह नव्हते. त्यामुळे महिलांसाठी ७ सिंगल स्वच्छतागृहे आणि पुरुषांची ५ डबल स्वच्छतागृहे पालिकेने नुकतीच खरेदी केली आहेत. शहरातील राजवाडा, पाचशेएक पाटी, पोवई नाका, बसस्थानक, जुना मोटार स्टॅण्ड आदी मोक्याच्या ठिकाणी ही स्वच्छतागृहे ठेवण्यात येणार आहेत. या भागातील स्थानिक नगरसेवक आणि तेथील नागरिकांना विश्वासात घेतले जाणार आहे. आपल्या घराजवळ स्वच्छतागृह नको, अशी अनेक लोकांची तक्रार असते. त्यामुळे अशा तक्रारींचे निराकरण करताना पालिका प्रशासनाची दमछाक होणार आहे. स्वच्छ आणि सुंदर सातारासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. घंटागाड्यांना ‘जीपीएस’ यंत्रणा शहरातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन कचरा गोळा करणाऱ्या घंटागाड्याही अत्याधुनिक बनविण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. ३९ वॉर्डमध्ये असलेल्या घंटागाड्यांना ‘जीपीएस’ यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाचे काम अत्यंत हलके झाले आहे. या ‘जीपीएस’ यंत्रणेमुळे घंटागाड्यांच्या खेपा किती झाल्या हे समजणार आहे. तसेच घंटागाडी शहरामध्ये कुठे आहे, कोणत्या परिसरात जाते हे समजणार असल्याने रोज कचऱ्याची विल्हेवाट लावली जाणार आहे. आंदोलनकर्त्यांची गैरसोय टळली शहरामध्ये स्वच्छतागृहे ठेवण्यात आल्यानंतर येत्या दोन दिवसांत फिरते शौचालयही नागरिकांच्या सेवेस सज्ज होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नेहमी आंदोलन, मोर्चे होत असतात. या ठिकाणी कसलीही सोय नसल्यामुळे आंदोलनकर्त्यांची कुंचबणा होत होती. आता या फिरत्या शौचालयामुळे आंदोलनकर्त्यांची गैरसोय टळणार आहे. तसेच शहरामध्ये अनेकदा मोठे सार्वजनिक कार्यक्रमही होत असतात. त्यावेळीही या फिरत्या शौचालयाचा सातारकरांना उपयोग होणार आहे. आता १२ स्वच्छतागृहे आणि एक फिरते शौचालय चोवीस तास उपलब्ध होणार असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे.