शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
2
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
3
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
4
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
5
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
6
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
7
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
8
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
9
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
10
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
11
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
12
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
13
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
14
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
16
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
17
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
18
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
19
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
20
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा

नांदणी पुलाजवळील वळण धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:24 IST

पुसेसावळी : विटा-महाबळेश्वर या राज्य मार्गावरील नांदणी पुलाजवळील वळण अतिशय धोकादायक बनले आहे. या परिसरात वारंवार अपघात घडत ...

पुसेसावळी : विटा-महाबळेश्वर या राज्य मार्गावरील नांदणी पुलाजवळील वळण अतिशय धोकादायक बनले आहे. या परिसरात वारंवार अपघात घडत आहेत. याबाबतच्या उपाययोजना संबंधित विभागाने कराव्यात, अशी मागणी वाहनचालकांतून केली जात आहे.

विटा-महाबळेश्वर या राज्यमार्गावरील चोराडे-पुसेसावळी या नऊ किलोमीटरच्या मार्गावर वाहनांची वर्दळ असते. हा रस्ता विस्तारल्यामुळे वाहने सुसाट धावत असतात. त्यामुळे अचानक येणाऱ्या वळणामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या मार्गावरील काही वळणे पूर्वीपासूनच अत्यंत धोकादायक स्थितीत आहेत. रुंदीकरणानंतरही त्यामध्ये फारसा फरक पडलेला नाही. त्यामध्ये नांदणी पुलानजीकच असलेल्या वळणाचा प्रामुख्याने समावेश आहे. रस्त्याच्या रुंदीकरणावेळी संबंधितांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने न पाहिल्याने या वळणाच्या ठिकाणी सतत अपघात होत आहेत. वेग नियंत्रणासाठी वाहनचालकांतून या वळणाच्या दोन्ही बाजूला काळे-पांढरे पट्टे ओढणे गरजेचे आहे. तरच अपघातावर नियंत्रण मिळविता येईल. मात्र बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाबाबत वाहनचालक प्रवासी व जनतेतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

चौकट:

सर्वच वळणांचा पुन्हा सर्व्हे करावा

प्रामुख्याने नांदणी पुलाजवळचे धोकादायक वळण केवळ अपघातच घडल्यानंतर चर्चेत येते. संबंधित विभाग ठोस उपाययोजनांसाठी पावले उचलत नसल्याने अपघात होत आहेत. या मार्गावरील सर्वच वळणांचा पुन्हा सर्व्हे करून आवश्यक उपाययोजना हाती घेण्याची गरज आहे.

फोटो २९पुसेसावळी रोड

विटा-महाबळेश्वर रस्त्यावरील या धोकादायक वळणावर सातत्याने अपघात घडत असतात. त्यामुळे उपाययोजना करण्याची गरज आहे. (छाया : राजीव पिसाळ)