शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

नांदणी पुलाजवळील वळण धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:24 IST

पुसेसावळी : विटा-महाबळेश्वर या राज्य मार्गावरील नांदणी पुलाजवळील वळण अतिशय धोकादायक बनले आहे. या परिसरात वारंवार अपघात घडत ...

पुसेसावळी : विटा-महाबळेश्वर या राज्य मार्गावरील नांदणी पुलाजवळील वळण अतिशय धोकादायक बनले आहे. या परिसरात वारंवार अपघात घडत आहेत. याबाबतच्या उपाययोजना संबंधित विभागाने कराव्यात, अशी मागणी वाहनचालकांतून केली जात आहे.

विटा-महाबळेश्वर या राज्यमार्गावरील चोराडे-पुसेसावळी या नऊ किलोमीटरच्या मार्गावर वाहनांची वर्दळ असते. हा रस्ता विस्तारल्यामुळे वाहने सुसाट धावत असतात. त्यामुळे अचानक येणाऱ्या वळणामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या मार्गावरील काही वळणे पूर्वीपासूनच अत्यंत धोकादायक स्थितीत आहेत. रुंदीकरणानंतरही त्यामध्ये फारसा फरक पडलेला नाही. त्यामध्ये नांदणी पुलानजीकच असलेल्या वळणाचा प्रामुख्याने समावेश आहे. रस्त्याच्या रुंदीकरणावेळी संबंधितांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने न पाहिल्याने या वळणाच्या ठिकाणी सतत अपघात होत आहेत. वेग नियंत्रणासाठी वाहनचालकांतून या वळणाच्या दोन्ही बाजूला काळे-पांढरे पट्टे ओढणे गरजेचे आहे. तरच अपघातावर नियंत्रण मिळविता येईल. मात्र बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाबाबत वाहनचालक प्रवासी व जनतेतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

चौकट:

सर्वच वळणांचा पुन्हा सर्व्हे करावा

प्रामुख्याने नांदणी पुलाजवळचे धोकादायक वळण केवळ अपघातच घडल्यानंतर चर्चेत येते. संबंधित विभाग ठोस उपाययोजनांसाठी पावले उचलत नसल्याने अपघात होत आहेत. या मार्गावरील सर्वच वळणांचा पुन्हा सर्व्हे करून आवश्यक उपाययोजना हाती घेण्याची गरज आहे.

फोटो २९पुसेसावळी रोड

विटा-महाबळेश्वर रस्त्यावरील या धोकादायक वळणावर सातत्याने अपघात घडत असतात. त्यामुळे उपाययोजना करण्याची गरज आहे. (छाया : राजीव पिसाळ)