शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीच्या तडाख्याने हळद रूसली!

By admin | Updated: March 11, 2015 00:13 IST

शेकडो पोती भिजली : हातातोंडाशी आलेला घास हिरावला; शेतकरी चिंतेत; शिवारात अद्यापही वाळवणीची लगबग

कऱ्हाड : हंगामात हळदीचे उत्पन्न चांगले मिळण्याच्या आशेने शेतकरी सुखावले होते. मात्र, मध्यंतरी हळदीवर रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यातच गत आठवड्यात अवकाळी पावसाचाही तडाखा बसला. त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांवर अश्रू ढाळण्याची वेळ आली आहे. कऱ्हाड तालुक्यात हळदीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. वडगाव हवेली, चचेगाव, जखिणवाडी, कापिल, सुपने, तांबवे, मसुर भागासह इतर गावांतही शेतकरी हळद पिक घेतात. दरवर्षी हळदीचा दर कमी जास्त होतो. मात्र, हे पिक फायद्यात जात असल्याने शेतकऱ्यांचा हे पिक घेण्याकडे सध्या ओढा वाढला आहे. दरवर्षी ऊसाच्या दराचा प्रश्न निर्माण होतो. ऊसाला अपेक्षित दर मिळत नाही. त्यातच कारखान्यांकडून वेळेत ऊसतोडणीही मिळत नाही. त्यामुळे कालावधी उलटून गेला तरी दरवर्षी ऊस शेतातच उभा असतो. परीणामी, पुढील पिकाला त्याचा मोठा फटका बसतो. ऊसाचा उत्पादन खर्च व त्यातून मिळणारे उत्पन्न याचा सारासार विचार केला असता शेतकऱ्यांना काहीच फायदा होत नसल्याचे चित्र आहे. अल्प भुधारक काही शेतकरी ऊस शेतीमुळे तोट्यात गेल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. अशा परीस्थितीत हळद पिकातून चांगले उत्पन्न मिळू लागल्याने गत दोन वर्षापासुन तालुक्यातील शेतकरी या पिकाकडे वळला आहे. साधारणपणे मे अथवा जुन महिन्यात हळद पिकाची लागवड केली जाते. लागवडीनंतर वारंवार शेतकऱ्यांना खुरपणी करावी लागते. तसेच हळदीसाठी सेंद्रीय खतही मोठ्या प्रमाणावर लागते. सेंद्रीय खत चांगले प्रमाणात मिळाले तर त्याचा पिकावर चांगला परीणाम दिसुन येतो. रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठीही शेतकऱ्यांना धडपड करावी लागते. वारंवार औषधांची फवारणी तसेच रासायनीक खताचा डोसही द्यावा लागतो. एवढे करूनही निसर्गाने साथ दिली नाही तर शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरते. पावसाळ्याच्या अखेरच्या दिवसात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि ते पाणी शेतातच साचून राहिले तर पिक वाया जाण्याची भिती असते. त्यासाठीही शेतकऱ्यांना धडपड करून शेतात पाणी साचू नये, यासाठी उपाययोजना कराव्या लागतात. पावसाळा उलटून गेल्यानंतर हिवाळ्यात धुक्यामुळे हळद पिकावर अनेक रोगांचा प्रादुर्भाव होता. यावर मात करण्यासाठी शेतकरी रोग प्रतिबंधक औषधांची फवारणी करावी लागते. साधारपणे हळद पिक आठ महिन्यांचे असते. आठ महिने पुर्ण झाल्यानंतर साधारणपणे जानेवारी अखेरीस हळदीचा पाला कापण्यास सुरूवात केली जाते. त्यानंतर खणणी व मोडणीही होते. मोडणीचे काम पुर्ण झाल्यानंतर हळद उकडावी लागते. मात्र, याच कालावधीत शेतकऱ्याला पिकाची जास्त काळजी घ्यावी लागते. उकडलेल्या हळदीवर पाऊस पडल्यास संपुर्ण उत्पन्न वाया जाण्याची भिती असते. त्यामुळे या कालावधीत येणारा पाऊस शेतकऱ्यांसाठी शत्रुच असतो. यावर्षीही काही दिवसांपुर्वी अवकाळी पावसाचा कऱ्हाड तालुक्याला तडाखा बसला. उकडून वाळवणी करण्यासाठी टाकलेली हळद पावसात भिजली. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. भिजलेल्या हळदीचा सध्या रंग बदलला आहे. त्यामुळे या हळदीतून शेतकऱ्यांना कसलेही उत्पन्न मिळणार नाही. सध्याही काही ठिकाणी हळद काढणीची कामे सुरू आहेत. उकडणी व वाळवणीसाठी शेतकरी धडपडत आहेत. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांच्या मनातून पावसाची भिती गेलेली नाही. पाऊस कोसळला तर इतर शेतकऱ्यांची हळदही वाया जाण्याची शक्यता आहे. हळद भिजू नये, यासाठी शेतकऱ्यांनी खबरदारीच्या उपाययोजना केल्या असल्या तरी काही दिवसांपुर्वी झालेल्या पावसाने हळद शेतकऱ्यांवर रूसल्याचेच सध्या दिसुन येत आहे. (प्रतिनिधी)दराबाबत अद्यापही संभ्रम...गत तीन वर्षात हळदीचे भाव कमी झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनीही या पिकाकडे पाठ फिरविली होती. त्या कालावधीत साधारणपणे हळदीचे ३० टक्के क्षेत्र कमी झाले होते. गत काही महिन्यांपुर्वी व्यापाऱ्यांकडे हळद शिल्लक नसल्याचे सांगीतले जात होते. त्यामुळे हळदीला पंधरा हजारापर्यंत भाव मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा होती. अशातच हळदीचे सौदे सुरू झाले आणि संप पुकारण्यात आल्याने सौद्यांची प्रक्रिया थांबली. परीणामी, शेतकऱ्यांनी हळद तयार होऊनही घरातच पोत्यांचा साठा करून ठेवला आहे.