शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
3
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
5
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
6
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
7
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
8
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
9
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
10
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
11
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
12
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
13
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
14
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
15
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
16
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
17
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
18
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
19
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
20
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड

वीज बिल वसुलीचे आघाडी सरकारचे तुघलकी फर्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:15 IST

सातारा : ‘वीज बिल भरा नाहीतर व वीज पुरवठा खंडित करू’ असा निर्णय घेणाऱ्या महाविकास आघाडी सरकारची असंवेदनशीलता पुन्हा ...

सातारा : ‘वीज बिल भरा नाहीतर व वीज पुरवठा खंडित करू’ असा निर्णय घेणाऱ्या महाविकास आघाडी सरकारची असंवेदनशीलता पुन्हा दिसली आहे, वीज बिल भरण्याचे फर्मान म्हणजे सरकारच्या तुघलकी कारभाराचा नमुना आहे,' अशी टीका भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी केली आहे.

कोरोना काळात वीज बिलांची थकीबाकी कोट्यवधींच्या घरात गेली. यावर महाराष्ट्र राज्यातील ७२ लाख वीज जोडण्यांचा पुरवठा खंडित करण्याचा जुलमी निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. तरी हा निर्णय त्वरित मागे घ्यावा अशी मागणी करत भाजपच्यावतीने कृष्णानगर येथील महावितरणच्या कार्यालयास प्रतीकात्मक टाळे ठोकत निदर्शने करून ठिय्या मांडला.

कोरोना काळात जनतेला वीज बिल माफीचे महाविकास आघाडी सरकारकडून वारंवार आश्वासन दिले जात होते. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जनतेला वीजबिल माफीचे गाजर दाखवले आता गरज सरो आणि वैद्य मरो या पद्धतीने महाविकास आघाडी सरकारचा कारभार सुरू आहे. आता हे राज्य सरकार सक्तीने वीज बिल वसुली करून जनतेला नाहक त्रास देत आहे. थकीत बिल भरले नाही तर वीज पुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेणारे हे सरकार किती असंवेदनशील आहे हे यावरून दिसत आहे. मात्र, या आघाडी सरकारला मनमानी कारभार करू देणार नाही. तसेच वीज पुरवठा खंडित करण्यास येणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना अटकाव करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. फडणवीस सरकारच्या काळात कधीच शेतकऱ्यांना वीज बिल भरण्याची सक्ती केली नाही. यामुळे थकबाकी वाढली तरी तो भार राज्य सरकारने स्वत:वर घेतला. युतीचे राज्य सरकार असताना कृषी क्षेत्रासाठी साडेसात लाख नवीन वीज जोडण्या दिल्या. पण वीज कंपन्यांही फायद्यात राहिल्या होत्या. महाविकास आघाडी सरकारच्या ऊर्जामंत्र्यांनीच १०० युनिटपर्यंतचे वीज बिल माफ करण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासनही प्रत्यक्षात आले नाही. जर दिलेली आश्वासने पूर्ण करायची धमक नसेल तर निदान अशी सक्तीने वीज बिले वसुली करून आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकरी बांधवांना आणि सर्वसामान्य जनतेला अडचणीत टाकू नका, असा इशारा देण्यात आला.

यावेळी जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, शहराध्यक्ष विकास गोसावी, राजेंद्र इंगळे, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुवर्णाताई पाटील, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सुरभी भोसले, सुनिशा शहा, रिना भणगे, नीलेश नलावडे, विट्ठल बलशेटवार, सुनील जाधव, आशा पंडित, सुनील काळेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

फोटो ओळ : सातारा येथील वीज मंडळाच्या कार्यालयासमोर भारतीय जनता पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. (छाया : जावेद खान)