शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वीज बिल वसुलीचे आघाडी सरकारचे तुघलकी फर्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:15 IST

सातारा : ‘वीज बिल भरा नाहीतर व वीज पुरवठा खंडित करू’ असा निर्णय घेणाऱ्या महाविकास आघाडी सरकारची असंवेदनशीलता पुन्हा ...

सातारा : ‘वीज बिल भरा नाहीतर व वीज पुरवठा खंडित करू’ असा निर्णय घेणाऱ्या महाविकास आघाडी सरकारची असंवेदनशीलता पुन्हा दिसली आहे, वीज बिल भरण्याचे फर्मान म्हणजे सरकारच्या तुघलकी कारभाराचा नमुना आहे,' अशी टीका भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी केली आहे.

कोरोना काळात वीज बिलांची थकीबाकी कोट्यवधींच्या घरात गेली. यावर महाराष्ट्र राज्यातील ७२ लाख वीज जोडण्यांचा पुरवठा खंडित करण्याचा जुलमी निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. तरी हा निर्णय त्वरित मागे घ्यावा अशी मागणी करत भाजपच्यावतीने कृष्णानगर येथील महावितरणच्या कार्यालयास प्रतीकात्मक टाळे ठोकत निदर्शने करून ठिय्या मांडला.

कोरोना काळात जनतेला वीज बिल माफीचे महाविकास आघाडी सरकारकडून वारंवार आश्वासन दिले जात होते. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जनतेला वीजबिल माफीचे गाजर दाखवले आता गरज सरो आणि वैद्य मरो या पद्धतीने महाविकास आघाडी सरकारचा कारभार सुरू आहे. आता हे राज्य सरकार सक्तीने वीज बिल वसुली करून जनतेला नाहक त्रास देत आहे. थकीत बिल भरले नाही तर वीज पुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेणारे हे सरकार किती असंवेदनशील आहे हे यावरून दिसत आहे. मात्र, या आघाडी सरकारला मनमानी कारभार करू देणार नाही. तसेच वीज पुरवठा खंडित करण्यास येणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना अटकाव करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. फडणवीस सरकारच्या काळात कधीच शेतकऱ्यांना वीज बिल भरण्याची सक्ती केली नाही. यामुळे थकबाकी वाढली तरी तो भार राज्य सरकारने स्वत:वर घेतला. युतीचे राज्य सरकार असताना कृषी क्षेत्रासाठी साडेसात लाख नवीन वीज जोडण्या दिल्या. पण वीज कंपन्यांही फायद्यात राहिल्या होत्या. महाविकास आघाडी सरकारच्या ऊर्जामंत्र्यांनीच १०० युनिटपर्यंतचे वीज बिल माफ करण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासनही प्रत्यक्षात आले नाही. जर दिलेली आश्वासने पूर्ण करायची धमक नसेल तर निदान अशी सक्तीने वीज बिले वसुली करून आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकरी बांधवांना आणि सर्वसामान्य जनतेला अडचणीत टाकू नका, असा इशारा देण्यात आला.

यावेळी जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, शहराध्यक्ष विकास गोसावी, राजेंद्र इंगळे, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुवर्णाताई पाटील, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सुरभी भोसले, सुनिशा शहा, रिना भणगे, नीलेश नलावडे, विट्ठल बलशेटवार, सुनील जाधव, आशा पंडित, सुनील काळेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

फोटो ओळ : सातारा येथील वीज मंडळाच्या कार्यालयासमोर भारतीय जनता पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. (छाया : जावेद खान)