शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

सोयाबीन खरेदी केंद्र्रात व्यवहार सुरू : कोरेगाव बाजार समितीचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 23:51 IST

पिंपोडे बुद्रुक : सध्याच्या बाजारपेठेतील सोयाबीनचा पडता दर लक्षात घेता शेतकºयांचे नुकसान होते. हे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी त्यांना किमान ...

ठळक मुद्देआॅनलाईन नोंदणी करण्याचीही शेतकऱ्यांसाठी संधी उपलब्धकेंद्रावर आणलेला माल स्वच्छ असावा, मालाची आर्द्रता कमाल बारा टक्के असावी, तो मातीमिश्रीत नसावा,

पिंपोडे बुद्रुक : सध्याच्या बाजारपेठेतील सोयाबीनचा पडता दर लक्षात घेता शेतकºयांचे नुकसान होते. हे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी त्यांना किमान किफायतशीर भाव मिळावा, या हेतूने कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याचा जास्तीत जास्त शेतकºयांनी लाभ घेण्याचे आवाहन खरेदी-विक्री संघाच्या वतीने अध्यक्ष शहाजी भोईटे व उपाध्यक्ष प्रल्हादराव माने यांनी केले आहे.

शेतकºयाच्या मालाला केंद्र शासनाने निर्धारित केलेली किमान आधारभूत किंमत मिळावी, या हेतूने कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघ, शेती उत्पन्न बाजार समिती व मार्केटिंग फेडरेशन, सातारा यांच्या संयुक्त विद्यमानाने नाफेडच्या मंजुरीने खरीप हंगाम २०१८-१९ करिता बाजार समिती कोरेगाव येथील मुख्य बाजार आवारात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केले आहे.

हे केंद्र १ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन कोरेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन शहाजीराव भोईटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वखार महामंडळ कोरेगाव साठा अधीक्षक जाधव, सहायक निबंधक सुद्र्रीक, खरेदी-विक्री संघाचे व्यवस्थापक राजेंद्र येवले, कोरेगाव बाजार समितीचे सहायक सचिव संभाजीराव निकम, संचालक उपस्थित होते.

बाजारात सोयाबीन मालाची ज्यादा आवक झाल्याने बाजार भाव किमान आधरभूत किमतीपेक्षा कमी होण्याची शक्यता वर्तवली जात असताना अशा प्रकारे शेतकºयांची गळचेपी होऊन आर्थिक नुकसान होऊ नये, या हेतूने हे खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी केंद्र शासनाने ठरविलेल्या किमान आधारभूत किमतीने म्हणजेच प्रति क्विंटल ३ हजार ३९९ रुपये दराने सोयाबीन खरेदी करण्यात येणार आहे, त्यासाठी शेतकºयांनी खरेदी केंद्र्रावर आॅनलाईन नोंदणीकरिता २०१८-१९ चे सोयाबीन या पीक पाण्याच्या नोंदीसह ७/१२ उतारा, आधारकार्ड, बँक पासबुकची प्रत घेऊन येणे अनिवार्य केले आहे.शेतकºयांनी खरेदी केंद्रावर आणलेला माल स्वच्छ असावा, मालाची आर्द्रता कमाल बारा टक्के असावी, तो मातीमिश्रीत नसावा, असे आवाहन संघाचे व्यवस्थापक राजेंद्र येवले यांनी केले आहे.गतवर्षी आठ हजार क्विंटल साठाकोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतवर्षीही सोयाबीन खरेदी-विक्री संघाच्या वतीने खरीप हंगामात आठ हजार एकशे साठ क्विंटल सोयाबीन तसेच रब्बी हंगामात हरभरा खरेदी करण्यात आला होता. त्याचप्रमाणे यंदाही करण्यात येणार आहे. याचा फायदा तालुक्यातील शेतकºयांना होणार आहे. 

एकीकडे वाढत्या भांडवली खर्चाच्या तुलनेत बाजारभावामध्ये होणारी दराची घसरण लक्षात घेता शेतकºयांना आपल्या मालाला किफायतशीर बाजारभाव मिळणे आवश्यक आहे. त्यांना योग्य दर मिळावा, या उद्देशाने कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे हे खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. जास्तीत जास्त शेतकºयांनी त्याचा फायदा घ्यावा.- शहाजी भोईटे, चेअरमन, कोरेगाव तालुका खरेदी-विक्री संघ 

टॅग्स :Farmerशेतकरीbusinessव्यवसाय