शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

सोयाबीन खरेदी केंद्र्रात व्यवहार सुरू : कोरेगाव बाजार समितीचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 23:51 IST

पिंपोडे बुद्रुक : सध्याच्या बाजारपेठेतील सोयाबीनचा पडता दर लक्षात घेता शेतकºयांचे नुकसान होते. हे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी त्यांना किमान ...

ठळक मुद्देआॅनलाईन नोंदणी करण्याचीही शेतकऱ्यांसाठी संधी उपलब्धकेंद्रावर आणलेला माल स्वच्छ असावा, मालाची आर्द्रता कमाल बारा टक्के असावी, तो मातीमिश्रीत नसावा,

पिंपोडे बुद्रुक : सध्याच्या बाजारपेठेतील सोयाबीनचा पडता दर लक्षात घेता शेतकºयांचे नुकसान होते. हे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी त्यांना किमान किफायतशीर भाव मिळावा, या हेतूने कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याचा जास्तीत जास्त शेतकºयांनी लाभ घेण्याचे आवाहन खरेदी-विक्री संघाच्या वतीने अध्यक्ष शहाजी भोईटे व उपाध्यक्ष प्रल्हादराव माने यांनी केले आहे.

शेतकºयाच्या मालाला केंद्र शासनाने निर्धारित केलेली किमान आधारभूत किंमत मिळावी, या हेतूने कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघ, शेती उत्पन्न बाजार समिती व मार्केटिंग फेडरेशन, सातारा यांच्या संयुक्त विद्यमानाने नाफेडच्या मंजुरीने खरीप हंगाम २०१८-१९ करिता बाजार समिती कोरेगाव येथील मुख्य बाजार आवारात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केले आहे.

हे केंद्र १ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन कोरेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन शहाजीराव भोईटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वखार महामंडळ कोरेगाव साठा अधीक्षक जाधव, सहायक निबंधक सुद्र्रीक, खरेदी-विक्री संघाचे व्यवस्थापक राजेंद्र येवले, कोरेगाव बाजार समितीचे सहायक सचिव संभाजीराव निकम, संचालक उपस्थित होते.

बाजारात सोयाबीन मालाची ज्यादा आवक झाल्याने बाजार भाव किमान आधरभूत किमतीपेक्षा कमी होण्याची शक्यता वर्तवली जात असताना अशा प्रकारे शेतकºयांची गळचेपी होऊन आर्थिक नुकसान होऊ नये, या हेतूने हे खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी केंद्र शासनाने ठरविलेल्या किमान आधारभूत किमतीने म्हणजेच प्रति क्विंटल ३ हजार ३९९ रुपये दराने सोयाबीन खरेदी करण्यात येणार आहे, त्यासाठी शेतकºयांनी खरेदी केंद्र्रावर आॅनलाईन नोंदणीकरिता २०१८-१९ चे सोयाबीन या पीक पाण्याच्या नोंदीसह ७/१२ उतारा, आधारकार्ड, बँक पासबुकची प्रत घेऊन येणे अनिवार्य केले आहे.शेतकºयांनी खरेदी केंद्रावर आणलेला माल स्वच्छ असावा, मालाची आर्द्रता कमाल बारा टक्के असावी, तो मातीमिश्रीत नसावा, असे आवाहन संघाचे व्यवस्थापक राजेंद्र येवले यांनी केले आहे.गतवर्षी आठ हजार क्विंटल साठाकोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतवर्षीही सोयाबीन खरेदी-विक्री संघाच्या वतीने खरीप हंगामात आठ हजार एकशे साठ क्विंटल सोयाबीन तसेच रब्बी हंगामात हरभरा खरेदी करण्यात आला होता. त्याचप्रमाणे यंदाही करण्यात येणार आहे. याचा फायदा तालुक्यातील शेतकºयांना होणार आहे. 

एकीकडे वाढत्या भांडवली खर्चाच्या तुलनेत बाजारभावामध्ये होणारी दराची घसरण लक्षात घेता शेतकºयांना आपल्या मालाला किफायतशीर बाजारभाव मिळणे आवश्यक आहे. त्यांना योग्य दर मिळावा, या उद्देशाने कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे हे खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. जास्तीत जास्त शेतकºयांनी त्याचा फायदा घ्यावा.- शहाजी भोईटे, चेअरमन, कोरेगाव तालुका खरेदी-विक्री संघ 

टॅग्स :Farmerशेतकरीbusinessव्यवसाय