शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

साताऱ्यात ढगांच्या गडगडात वळीव बरसला, सलग चौथ्या दिवशी पावसाची हजेरी  

By नितीन काळेल | Updated: May 13, 2024 16:33 IST

उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा 

सातारा : जिल्ह्यातील वातावरणात मोठा बदल झाला असून चार दिवसांपासून वळवाचा पाऊस पडू लागला आहे. सोमवारीही सातारा शहरात ढगांच्या गडगडाटात रिमझिम स्वरूपात हजेरी लावली. तर जिल्ह्याच्या काही भागातही पाऊस पडला. दरम्यान, पाऊस आल्यानंतर सातारा शहरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. सातारा जिल्हावासीयांना एप्रिल महिना कडक उन्हाशी सामना करावा लागला. सतत पारा ३९ अंशावर होता. तर मे महिना सुरू झाल्यानंतर ४० अंशावर तापमान गेले. यामुळे उकाड्याने नागरिक हैराण झालेले. असे असतानाच मागील पाच दिवसापासून वातावरणात मोठा बदल झालेला आहे. ढगाळ वातावरण तयार होत आहे. त्याचबरोबर वळवाचा पाऊसही पडू लागला आहे.  ढगांच्या गडगडाटात आणि विजांच्या कडकडाटामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होत आहे. यामुळे नुकसानीच्या घटनाही घडत आहेत. पावसामुळे वातावरणात मोठा बदल होवून थंडगार वारे वाहत आहेत. जिल्ह्यात सोमवारी सलग चौथ्या दिवशी वळवाचा पाऊस पडला. सातारा शहरात दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास आभाळ भरून आले होते. त्यानंतर ढगांचा गडगड सुरू झाला आणि पावसाला सुरुवात झाली. रिमझिम स्वरूपात हा पाऊस पडला असलातरीही हवेत गारवा निर्माण झाला. तर सातारा शहराच्या पश्चिम भागातील परळी खोरे, पेट्री भागात चांगला पाऊस झाल्याची माहिती मिळत आहे. त्याचबरोबर जिल्ह्याच्या काही भागाची ढगाच्या गडगडाटात पावसाने चांगली हजेर लावली आहे. तरीही धो - धो पाऊस कोसळल्याशिवाय खरीप हंगाम पूर्व शेती मशागतीच्या कामांना वेग येणार नाही.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसTemperatureतापमान