शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

टोमॅटोला उच्चांकी दर!, शेतकरी म्हणतो पिकवायचा आम्ही, अन् दर ठरवतो व्यापारी

By नितीन काळेल | Updated: July 13, 2023 19:19 IST

कधी नव्हे ते टोमॅटो दराला लाली चढली

सातारा : कधी नव्हे ते टोमॅटो दराला लाली चढली आहे. शेतीच्या बांधावर येऊनही व्यापारी १०० रुपये किलोने टोमॅटो घेऊन जात आहेत. त्यामुळे जादा मागणी आणि उत्पादन कमी असल्याने तीन वर्षांनंतर प्रथमच चांगला भाव आला आहे. पण, हा दर कायम राहील का याविषयीही साशंकता आहे. कारण, ‘टोमॅटो पिकवायचा आम्ही, दर ठरवतो व्यापारी,’ अशी भावनाच शेतकऱ्यांनी बोलून दाखवली.दरवर्षी पावसाळ्याच्या काळात भाजीपाल्याचे दर वाढतात. पण, मागील दोन वर्षाततरी टोमॅटो ६० रुपयांच्या पुढे गेला नव्हता. आता मात्र, टोमॅटोने उच्चांकी दर गाठला आहे. चांगला टोमॅटो घ्यायचा झाला तर किलोला १०० ते १२० रुपये मोजण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे. नवीन उत्पादन बाजारात येत नाही तोपर्यंत दर वाढलेलाच राहणार आहे. पण, यामध्ये शेतकऱ्यांना किती फायदा हाही विषय आहे. 

कारण, तीन वर्षे टोमॅटो घेतला. पण, कधीही २० ते ३० रुपयांवर दर मिळालेला नाही, असे शेतकरी सांगत आहेत. कधी पाऊस तर कधी ऊन यामुळे मालाचे नुकसान झाले. तर अनेकवेळा उत्पादन जादा असल्याने दर कमी मिळाला अशी स्थिती होती. आता दर मिळत असला तरी व्यापाऱ्यांच्या हातात बऱ्याच गोष्टी असल्याचे शेतकरी सांगतात. माल चांगला नाही म्हणून दर पाडून मागतात. यात शेतकऱ्यांचाच तोटाच आहे.एक एकर टोमॅटोला दोन लाखांचा खर्च...एक एकर टोमॅटो पीक घ्यायचे झाले तर त्याला दोन लाख रुपये तरी खर्च येतो. यामध्ये लागण, खत, मुजरी, आैषधे, कागद आदींचा समावेश आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी