शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

टोमॅटोला उच्चांकी दर!, शेतकरी म्हणतो पिकवायचा आम्ही, अन् दर ठरवतो व्यापारी

By नितीन काळेल | Updated: July 13, 2023 19:19 IST

कधी नव्हे ते टोमॅटो दराला लाली चढली

सातारा : कधी नव्हे ते टोमॅटो दराला लाली चढली आहे. शेतीच्या बांधावर येऊनही व्यापारी १०० रुपये किलोने टोमॅटो घेऊन जात आहेत. त्यामुळे जादा मागणी आणि उत्पादन कमी असल्याने तीन वर्षांनंतर प्रथमच चांगला भाव आला आहे. पण, हा दर कायम राहील का याविषयीही साशंकता आहे. कारण, ‘टोमॅटो पिकवायचा आम्ही, दर ठरवतो व्यापारी,’ अशी भावनाच शेतकऱ्यांनी बोलून दाखवली.दरवर्षी पावसाळ्याच्या काळात भाजीपाल्याचे दर वाढतात. पण, मागील दोन वर्षाततरी टोमॅटो ६० रुपयांच्या पुढे गेला नव्हता. आता मात्र, टोमॅटोने उच्चांकी दर गाठला आहे. चांगला टोमॅटो घ्यायचा झाला तर किलोला १०० ते १२० रुपये मोजण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे. नवीन उत्पादन बाजारात येत नाही तोपर्यंत दर वाढलेलाच राहणार आहे. पण, यामध्ये शेतकऱ्यांना किती फायदा हाही विषय आहे. 

कारण, तीन वर्षे टोमॅटो घेतला. पण, कधीही २० ते ३० रुपयांवर दर मिळालेला नाही, असे शेतकरी सांगत आहेत. कधी पाऊस तर कधी ऊन यामुळे मालाचे नुकसान झाले. तर अनेकवेळा उत्पादन जादा असल्याने दर कमी मिळाला अशी स्थिती होती. आता दर मिळत असला तरी व्यापाऱ्यांच्या हातात बऱ्याच गोष्टी असल्याचे शेतकरी सांगतात. माल चांगला नाही म्हणून दर पाडून मागतात. यात शेतकऱ्यांचाच तोटाच आहे.एक एकर टोमॅटोला दोन लाखांचा खर्च...एक एकर टोमॅटो पीक घ्यायचे झाले तर त्याला दोन लाख रुपये तरी खर्च येतो. यामध्ये लागण, खत, मुजरी, आैषधे, कागद आदींचा समावेश आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी