शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाण रद्द
2
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
3
Operation Sindoor Live Updates: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर दिल्लीत हालचाली; कॅबिनेट बैठकीला सुरुवात
4
Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंह, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती
5
Operation Sindoor नंतर शेअर बाजाराबाबत मोठी अपडेट, BSE-NSE नं घेतला महत्त्वाचा निर्णय
6
“विना अपघात सेवा बजावणाऱ्या ST चालकांचा रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार”: प्रताप सरनाईक
7
पाकविरोधात आणखी मोठी कारवाई? गृहमंत्र्यांच्या J&Kच्या मुख्यमंत्री-नायब राज्यपालांना सूचना...
8
Kangana Ranaut : "मोदींनी त्यांना दाखवून दिलं"; 'ऑपरेशन सिंदूर' नंतर कंगना राणौतची सैन्याच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना
9
Operation Sindoor: भारताचा जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अजहरवर घाव! 'मरकज सुभानल्लाह' उडवले, व्हिडीओ बघा
10
खबरदार! आणखी काही कराल तर...; पत्रकार परिषद संपवताना विंग कमांडर व्योमिका सिंह यांचा पाकिस्तानला थेट इशारा 
11
"ही ताकद नव्हे तर भ्याडपणा!"; भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी अभिनेत्रीचा तीळपापड, म्हणाली-
12
चीननं भारतावर लावला १६६ टक्क्यांपर्यंत टॅरिफ; पाक तणावादरम्यान ड्रॅगनची घोषणा, 'या' क्षेत्रांवर परिणाम?
13
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
14
"रात्री चार ड्रोन आले अन्..."; पाकिस्ताने तरुणाने सांगितला कसा उडवला गेला हाफिज सईदचा अड्डा
15
“निष्पाप भारतीयांवर भ्याड हल्ला केलेल्या पाकिस्तानला चोख उत्तर”: विजय वडेट्टीवार
16
Eknath Shinde : "लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम करणाऱ्यांना धडा शिकवला"; शिंदेंनी केलं मोदींचं अभिनंदन
17
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
18
Operation Sindoor: अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?
19
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
20
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!

गुन्हेगारी संपविण्यासाठी एकत्र या...

By admin | Updated: December 17, 2015 22:53 IST

फलटण शहर : नागरिकांच्या अपेक्षा; ‘लोकमत’च्या धाडसी भूमिकेचे स्वागत

फलटण : फलटण तालुक्यातील वाढती गुन्हेगारी, दहशत याविरोधात ‘लोकमत’ने उचललेल्या धाडसी भूमिकेचे स्वागत होत असतानाच गुन्हेगारी संपविण्यासाठी पोलिसांबरोबरच विविध घटकांनीही एकत्र येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. वारंवार होणारा बंद व दवाखाने, बसेसची मोडतोड थांबवण्याची गरज व्यक्त होत आहे. फलटण तालुक्यात वाढत्या चोऱ्या, गुंडगिरी, दहशत, वारंवार बंद याला जनता कंटाळली आहे. पोलिसांकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त होत असताना त्या पूर्ण होताना दिसत नाहीत. त्यामुळे जनतेमध्ये अस्वस्थता आहे. राजकीय नेतेमंडळी स्वार्थासाठी काही गुंडाना हाताशी धरताना राजकारण करीत असल्याचे प्रकार आढळून येत आहेत. यालाही आळा घालण्याची गरज व्यक्त होत आहे. काही समाजकंटकांनी फलटणमधील हॉटेल, एटीएम, दवाखाने, दुकाने बसेस यांची मोडतोड केल्याने हे प्रकार थांबविण्याची गरज आहे.तालुक्यात किंवा तालुक्याबाहेर एखादी घटना घडली की त्याचे पडसाद तालुक्यात सर्वत्र उमटतात. वारंवार फलटण शहर बंद ठेवले जाते. याला व्यापारी, लहानमोठे विक्रेते वैतागले आहेत. बंद पाळतानाही दहशत निर्माण केली जात असल्याने याला कोठेतरी आळा बसण्याची अपेक्षा जनता करीत आहे. सध्या फलटण शहरात रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाहेरून मोठ्या प्रमाणात विक्रेते आले आहेत. मागील चार, पाच वर्षांपासून रामरथोत्सवाचा बाजार वारंवारचा बंद व दहशत यामुळे कमी कमी होत चालला आहे. पूर्वी महिना-महिना थांबणारे व मोठ्या संख्येने येणारे विक्रेते फलटणला खूपच कमी प्रमाणात येत आहेत. हातावर पोट असलेल्या या विक्रेत्यांनाहीदोन दिवसांपूर्वीच्या बंदचा व तोडफोडीचा फटका बसल्याने काहींनी आपला गाशा गुंडाळा आहे. पुढच्यावर्षी रथोत्सवाला अशा वातावरणात किती विक्रेते येतील याची आता चिंता व्यक्त होऊ लागली आहे. फलटणची दहशत, वारंवारचे बंद, एकटे पोलीस संपवू शकत नाहीत. त्यासाठी राजकीय नेतेमंडळी, सर्व समाजातील व्यक्तिंनी एकत्र येऊन प्रतिकार करण्याची गरज आहे. फलटण बंद राहणार नाही याची काळजी सर्वांनी घेणे गरजेचे आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या तोडफोडीबाबत अनेकांनी गुन्हे दाखल करण्यात असमर्थता व्यक्त केली. या मागची कारणे वेगवेगळी असली तरी गुन्हे दाखल करण्याची मानसिकता दिसून येत नाही. (प्रतिनिधी)दहशतीला कोणी थारा देऊ नयेफलटण तालुक्यात वाढत चाललेल्या दहशतीला, गुंडगिरीला कोणी थारा देऊ नये. या पार्श्वभूमीवर राजकीय कार्यकर्ते, पोलीस, पत्रकार, समाजातील सर्व घटकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. काही मुठभर लोक वैयक्तिक कारणासाठी सातत्याने फलटण बंद करीत आहेत. त्याला आमचा विरोध आहे. फलटण यापुढे बंद होऊ नये, असे आवाहन रघूनाथराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.