शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
5
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
6
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
7
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
8
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
9
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
10
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
11
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
12
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
13
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
14
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
15
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
16
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
17
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
18
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
19
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम
20
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!

गुन्हेगारी संपविण्यासाठी एकत्र या...

By admin | Updated: December 17, 2015 22:53 IST

फलटण शहर : नागरिकांच्या अपेक्षा; ‘लोकमत’च्या धाडसी भूमिकेचे स्वागत

फलटण : फलटण तालुक्यातील वाढती गुन्हेगारी, दहशत याविरोधात ‘लोकमत’ने उचललेल्या धाडसी भूमिकेचे स्वागत होत असतानाच गुन्हेगारी संपविण्यासाठी पोलिसांबरोबरच विविध घटकांनीही एकत्र येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. वारंवार होणारा बंद व दवाखाने, बसेसची मोडतोड थांबवण्याची गरज व्यक्त होत आहे. फलटण तालुक्यात वाढत्या चोऱ्या, गुंडगिरी, दहशत, वारंवार बंद याला जनता कंटाळली आहे. पोलिसांकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त होत असताना त्या पूर्ण होताना दिसत नाहीत. त्यामुळे जनतेमध्ये अस्वस्थता आहे. राजकीय नेतेमंडळी स्वार्थासाठी काही गुंडाना हाताशी धरताना राजकारण करीत असल्याचे प्रकार आढळून येत आहेत. यालाही आळा घालण्याची गरज व्यक्त होत आहे. काही समाजकंटकांनी फलटणमधील हॉटेल, एटीएम, दवाखाने, दुकाने बसेस यांची मोडतोड केल्याने हे प्रकार थांबविण्याची गरज आहे.तालुक्यात किंवा तालुक्याबाहेर एखादी घटना घडली की त्याचे पडसाद तालुक्यात सर्वत्र उमटतात. वारंवार फलटण शहर बंद ठेवले जाते. याला व्यापारी, लहानमोठे विक्रेते वैतागले आहेत. बंद पाळतानाही दहशत निर्माण केली जात असल्याने याला कोठेतरी आळा बसण्याची अपेक्षा जनता करीत आहे. सध्या फलटण शहरात रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाहेरून मोठ्या प्रमाणात विक्रेते आले आहेत. मागील चार, पाच वर्षांपासून रामरथोत्सवाचा बाजार वारंवारचा बंद व दहशत यामुळे कमी कमी होत चालला आहे. पूर्वी महिना-महिना थांबणारे व मोठ्या संख्येने येणारे विक्रेते फलटणला खूपच कमी प्रमाणात येत आहेत. हातावर पोट असलेल्या या विक्रेत्यांनाहीदोन दिवसांपूर्वीच्या बंदचा व तोडफोडीचा फटका बसल्याने काहींनी आपला गाशा गुंडाळा आहे. पुढच्यावर्षी रथोत्सवाला अशा वातावरणात किती विक्रेते येतील याची आता चिंता व्यक्त होऊ लागली आहे. फलटणची दहशत, वारंवारचे बंद, एकटे पोलीस संपवू शकत नाहीत. त्यासाठी राजकीय नेतेमंडळी, सर्व समाजातील व्यक्तिंनी एकत्र येऊन प्रतिकार करण्याची गरज आहे. फलटण बंद राहणार नाही याची काळजी सर्वांनी घेणे गरजेचे आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या तोडफोडीबाबत अनेकांनी गुन्हे दाखल करण्यात असमर्थता व्यक्त केली. या मागची कारणे वेगवेगळी असली तरी गुन्हे दाखल करण्याची मानसिकता दिसून येत नाही. (प्रतिनिधी)दहशतीला कोणी थारा देऊ नयेफलटण तालुक्यात वाढत चाललेल्या दहशतीला, गुंडगिरीला कोणी थारा देऊ नये. या पार्श्वभूमीवर राजकीय कार्यकर्ते, पोलीस, पत्रकार, समाजातील सर्व घटकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. काही मुठभर लोक वैयक्तिक कारणासाठी सातत्याने फलटण बंद करीत आहेत. त्याला आमचा विरोध आहे. फलटण यापुढे बंद होऊ नये, असे आवाहन रघूनाथराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.