शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

गावाची तहान भागविणाऱ्या शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ : बँकेचे कर्जही थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 00:05 IST

संजय कदम ।वाठार स्टेशन : इतर गावांची सलग तीन वर्षे तहान भागविणाºया जाधववाडी येथील शेतकºयावरच आत्ताच उपासमारीची वेळ आली आहे. विहिरीचे पाणी गावाची तहान भागवण्यासाठी सलग तीन वर्षांपासून शासकीय अधिकाºयांनी दबाबतंत्र वापरून अधिग्रहण केल्याचा आरोप संबंधित अल्पभूधारक शेतकºयाने केला आहे. त्याचे जिल्हा बँकेतील कर्जही थकले आहे.जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात जाधववाडी येथील ...

संजय कदम ।वाठार स्टेशन : इतर गावांची सलग तीन वर्षे तहान भागविणाºया जाधववाडी येथील शेतकºयावरच आत्ताच उपासमारीची वेळ आली आहे. विहिरीचे पाणी गावाची तहान भागवण्यासाठी सलग तीन वर्षांपासून शासकीय अधिकाºयांनी दबाबतंत्र वापरून अधिग्रहण केल्याचा आरोप संबंधित अल्पभूधारक शेतकºयाने केला आहे. त्याचे जिल्हा बँकेतील कर्जही थकले आहे.

जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात जाधववाडी येथील बबन महादेव वाघ या शेतकºयाने म्हटले आहे की, तीन वर्षांत गावाला पाणी दिले. परंतु पाण्याचा मोबदलाही शासनाने दिलेला नाही. यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्जही थकले आहे. त्यामुळे आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. एक तर शासनाने या पाण्याचा मोबदला द्यावा, अन्यथा जिल्हा बँकेचे कर्ज शासनाने माफ करावे.याबाबत माहिती अशी की, जाधववाडी गावात राहणारे बबन वाघ यांना वडिलार्जित दोन एकर विहीर बागायत शेती आहे. याच शेतीवर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांपासूनच्या दुष्काळी परिस्थितीमुळे त्यांची या शेतीवरील विहीर शासनाने गेल्या तीन वर्षांपासून अधिग्रहण केली आहे.

त्यामुळे त्यांच्या शेतीत कोणतीच पीक निघत नाही. त्यातून ते मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. तर शासनानेही या पाण्याचा कोणताही मोबदला त्यांना दिला नसल्याने त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेत घेतलेले दोन लाखांचे कर्जही थकले आहे. एका बाजूला शेतकºयांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शासन पुढाकार घेत असताना जाधववाडी गावातील शेतकरी शासनाच्या कारभाराला वैतागून आत्महत्या करण्याच्या भूमिकेत आहेत. एक तर शासनाने तत्काळ तीन वर्षांचा मोबदला द्यावा, अन्यथा बँकेतील कर्ज तरी माफ करावे, अशी मागणी जाधववाडी ग्रामस्थ करत आहेत. 

जाधववाडी येथील संबंधित शेतकºयाचा प्रस्ताव मला मिळाला असून, हा प्रस्ताव कोरेगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्याकडे दुरुस्तीसाठी पाठविला आहे. तो प्रस्ताव मिळताच संबंधित शेतकºयाला त्याच्या हक्काचे पैसे पैसे मिळतील.- स्मिता पवार, तहसीलदार, कोरेगावगावात इतर लोकांच्या विहिरी असतानाही सलग तीन वर्षांपासून आकासापोटी माझीच विहीर अधिग्रहण करण्यासाठी गावचे ग्रामसेवक, तलाठी व तहसीलदार मला दमदाटी करत आहे.- बबन वाघ,शेतकरी, जाधववाडी.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरwater shortageपाणीटंचाई