शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

गावाची तहान भागविणाऱ्या शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ : बँकेचे कर्जही थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 00:05 IST

संजय कदम ।वाठार स्टेशन : इतर गावांची सलग तीन वर्षे तहान भागविणाºया जाधववाडी येथील शेतकºयावरच आत्ताच उपासमारीची वेळ आली आहे. विहिरीचे पाणी गावाची तहान भागवण्यासाठी सलग तीन वर्षांपासून शासकीय अधिकाºयांनी दबाबतंत्र वापरून अधिग्रहण केल्याचा आरोप संबंधित अल्पभूधारक शेतकºयाने केला आहे. त्याचे जिल्हा बँकेतील कर्जही थकले आहे.जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात जाधववाडी येथील ...

संजय कदम ।वाठार स्टेशन : इतर गावांची सलग तीन वर्षे तहान भागविणाºया जाधववाडी येथील शेतकºयावरच आत्ताच उपासमारीची वेळ आली आहे. विहिरीचे पाणी गावाची तहान भागवण्यासाठी सलग तीन वर्षांपासून शासकीय अधिकाºयांनी दबाबतंत्र वापरून अधिग्रहण केल्याचा आरोप संबंधित अल्पभूधारक शेतकºयाने केला आहे. त्याचे जिल्हा बँकेतील कर्जही थकले आहे.

जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात जाधववाडी येथील बबन महादेव वाघ या शेतकºयाने म्हटले आहे की, तीन वर्षांत गावाला पाणी दिले. परंतु पाण्याचा मोबदलाही शासनाने दिलेला नाही. यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्जही थकले आहे. त्यामुळे आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. एक तर शासनाने या पाण्याचा मोबदला द्यावा, अन्यथा जिल्हा बँकेचे कर्ज शासनाने माफ करावे.याबाबत माहिती अशी की, जाधववाडी गावात राहणारे बबन वाघ यांना वडिलार्जित दोन एकर विहीर बागायत शेती आहे. याच शेतीवर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांपासूनच्या दुष्काळी परिस्थितीमुळे त्यांची या शेतीवरील विहीर शासनाने गेल्या तीन वर्षांपासून अधिग्रहण केली आहे.

त्यामुळे त्यांच्या शेतीत कोणतीच पीक निघत नाही. त्यातून ते मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. तर शासनानेही या पाण्याचा कोणताही मोबदला त्यांना दिला नसल्याने त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेत घेतलेले दोन लाखांचे कर्जही थकले आहे. एका बाजूला शेतकºयांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शासन पुढाकार घेत असताना जाधववाडी गावातील शेतकरी शासनाच्या कारभाराला वैतागून आत्महत्या करण्याच्या भूमिकेत आहेत. एक तर शासनाने तत्काळ तीन वर्षांचा मोबदला द्यावा, अन्यथा बँकेतील कर्ज तरी माफ करावे, अशी मागणी जाधववाडी ग्रामस्थ करत आहेत. 

जाधववाडी येथील संबंधित शेतकºयाचा प्रस्ताव मला मिळाला असून, हा प्रस्ताव कोरेगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्याकडे दुरुस्तीसाठी पाठविला आहे. तो प्रस्ताव मिळताच संबंधित शेतकºयाला त्याच्या हक्काचे पैसे पैसे मिळतील.- स्मिता पवार, तहसीलदार, कोरेगावगावात इतर लोकांच्या विहिरी असतानाही सलग तीन वर्षांपासून आकासापोटी माझीच विहीर अधिग्रहण करण्यासाठी गावचे ग्रामसेवक, तलाठी व तहसीलदार मला दमदाटी करत आहे.- बबन वाघ,शेतकरी, जाधववाडी.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरwater shortageपाणीटंचाई