शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

सरकारच्या फसवणुकीमुळे दिवाळीत झुणका-भाकर खाण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2020 17:34 IST

Uddhav Thackeray, chandrakant patil, Satara area 'राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारने शेतकर्‍यांची घोर फसवणूक केलेली आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई देण्याचे जाहीर करून देखील ती न दिल्याने ऐन दिवाळीत शेतकऱ्यांवर झुणका- भाकर खाण्याची वेळ आली आहे,' अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.

ठळक मुद्देसरकारच्या फसवणुकीमुळे दिवाळीत झुणका-भाकर खाण्याची वेळमेघा कुलकर्णी यांचे पुनर्वसन योग्य ठिकाणी करणार : चंद्रकांत पाटील

सातारा : 'राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारने शेतकर्‍यांची घोर फसवणूक केलेली आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई देण्याचे जाहीर करून देखील ती न दिल्याने ऐन दिवाळीत शेतकऱ्यांवर झुणका- भाकर खाण्याची वेळ आली आहे,' अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.आमदार पाटील म्हणाले, 'राज्य सरकार दडपशाहीचा कारभार करत असून सत्य लपवण्याचा वारंवार प्रयत्न करत आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपये हेक्टरी देण्याचा घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती, त्यानंतर त्यांनी पुन्हा दहा हजार रुपये देण्याचे जाहीर केले. ही मदत दिवाळीपूर्वी देऊ, असे त्यांनी सांगितले होते. मात्र दिवाळी आली तरी शेतकऱ्यांना एक पै मिळालेले नाही. पैसे नसल्याने आता शेतकऱ्यांना लाडू व इतर गोडधोड करता येत नसल्याने भारतीय जनता पार्टीच्या शेतकरी किसान आघाडीतर्फे संपूर्ण राज्यात झुणका भाकर खाण्याचे आंदोलन करून राज्य शासनाचा निषेध करण्यात येत आहे.'माजी आमदार मेघा कुलकर्णी यांना पदवीधरची उमेदवारी देण्यात येणार होती. मात्र, ऐनवेळी त्यांना डावलण्यात आले, याबाबत विचारले असता चंद्रकांत पाटील म्हणाले 'पदवीधर व शिक्षक निवडणुकीसाठी प्रत्येकी एक जागा असते. चार जिल्ह्यातून चाळीस इच्छुक असतात त्यामुळे कोणावर तरी अन्याय होणार, हे गृहीत असते. मात्र विधानपरिषदेच्या जागा नेहमीच टप्प्याटप्प्याने रिक्त होत असतात. त्यामुळे माजी आमदार मेघा कुलकर्णी यांचे योग्य ठिकाणी लवकरच पुनर्वसन केले जाईल. त्यांच्यावर अन्याय होऊ दिला जाणार नाही.'भाजप सरकारच्या कालावधीत पदवीधर बेरोजगारांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने कर्ज वाटप, औद्योगिक वसाहत उभी करण्यासाठी केलेले प्रयत्न तसेच कायम विनाअनुदानित शाळांच्या समोरील कायम हा शब्द काढून टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. आमच्या शासनाच्या काळात संख्येने मराठा मोर्चे निघाले. संवादाने प्रश्न सुटतात हे आमचे धोरण होते मात्र आताचे सरकार असं वादच करायला तयार नाही अशी स्थिती आहे. तसेच भाजपने दिलेले मराठा आरक्षण महाविकास आघाडीला टिकवता आले नाही,' अशी टीका देखील आमदार पाटील यांनी केली.पदवीधर निवडणुकीसाठी भाजपच्यावतीने संग्राम देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचाराच्या नियोजनाच्या अनुषंगाने चंद्रकांत पाटील यांनी सातारा येथे मेळावा घेतला. या मेळाव्याला खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, प्रदेश सदस्य सुवर्णाताई पाटील, ज्येष्ठ नेते दत्ताजी थोरात, प्रदेश सदस्य अमित कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष एडवोकेट भरत पाटील आदींची उपस्थिती होती. शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी या मेळाव्याचे सूत्रसंचालन केले.खडसेंचे नाव काढताच म्हणाले रात गई बात गईमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी नाराज होऊन पक्ष सोडला, याबाबत विचारले असता आमदार चंद्रकांत पाटील यांनी रात गई बात गई असे म्हणत, त्यांचा प्रश्न आता संपला आहे, असे उत्तर दिले. 

टॅग्स :PoliticsराजकारणSatara areaसातारा परिसरUddhav Thackerayउद्धव ठाकरेchandrakant patilचंद्रकांत पाटील