शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

सरकारच्या फसवणुकीमुळे दिवाळीत झुणका-भाकर खाण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2020 17:34 IST

Uddhav Thackeray, chandrakant patil, Satara area 'राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारने शेतकर्‍यांची घोर फसवणूक केलेली आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई देण्याचे जाहीर करून देखील ती न दिल्याने ऐन दिवाळीत शेतकऱ्यांवर झुणका- भाकर खाण्याची वेळ आली आहे,' अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.

ठळक मुद्देसरकारच्या फसवणुकीमुळे दिवाळीत झुणका-भाकर खाण्याची वेळमेघा कुलकर्णी यांचे पुनर्वसन योग्य ठिकाणी करणार : चंद्रकांत पाटील

सातारा : 'राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारने शेतकर्‍यांची घोर फसवणूक केलेली आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई देण्याचे जाहीर करून देखील ती न दिल्याने ऐन दिवाळीत शेतकऱ्यांवर झुणका- भाकर खाण्याची वेळ आली आहे,' अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.आमदार पाटील म्हणाले, 'राज्य सरकार दडपशाहीचा कारभार करत असून सत्य लपवण्याचा वारंवार प्रयत्न करत आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपये हेक्टरी देण्याचा घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती, त्यानंतर त्यांनी पुन्हा दहा हजार रुपये देण्याचे जाहीर केले. ही मदत दिवाळीपूर्वी देऊ, असे त्यांनी सांगितले होते. मात्र दिवाळी आली तरी शेतकऱ्यांना एक पै मिळालेले नाही. पैसे नसल्याने आता शेतकऱ्यांना लाडू व इतर गोडधोड करता येत नसल्याने भारतीय जनता पार्टीच्या शेतकरी किसान आघाडीतर्फे संपूर्ण राज्यात झुणका भाकर खाण्याचे आंदोलन करून राज्य शासनाचा निषेध करण्यात येत आहे.'माजी आमदार मेघा कुलकर्णी यांना पदवीधरची उमेदवारी देण्यात येणार होती. मात्र, ऐनवेळी त्यांना डावलण्यात आले, याबाबत विचारले असता चंद्रकांत पाटील म्हणाले 'पदवीधर व शिक्षक निवडणुकीसाठी प्रत्येकी एक जागा असते. चार जिल्ह्यातून चाळीस इच्छुक असतात त्यामुळे कोणावर तरी अन्याय होणार, हे गृहीत असते. मात्र विधानपरिषदेच्या जागा नेहमीच टप्प्याटप्प्याने रिक्त होत असतात. त्यामुळे माजी आमदार मेघा कुलकर्णी यांचे योग्य ठिकाणी लवकरच पुनर्वसन केले जाईल. त्यांच्यावर अन्याय होऊ दिला जाणार नाही.'भाजप सरकारच्या कालावधीत पदवीधर बेरोजगारांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने कर्ज वाटप, औद्योगिक वसाहत उभी करण्यासाठी केलेले प्रयत्न तसेच कायम विनाअनुदानित शाळांच्या समोरील कायम हा शब्द काढून टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. आमच्या शासनाच्या काळात संख्येने मराठा मोर्चे निघाले. संवादाने प्रश्न सुटतात हे आमचे धोरण होते मात्र आताचे सरकार असं वादच करायला तयार नाही अशी स्थिती आहे. तसेच भाजपने दिलेले मराठा आरक्षण महाविकास आघाडीला टिकवता आले नाही,' अशी टीका देखील आमदार पाटील यांनी केली.पदवीधर निवडणुकीसाठी भाजपच्यावतीने संग्राम देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचाराच्या नियोजनाच्या अनुषंगाने चंद्रकांत पाटील यांनी सातारा येथे मेळावा घेतला. या मेळाव्याला खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, प्रदेश सदस्य सुवर्णाताई पाटील, ज्येष्ठ नेते दत्ताजी थोरात, प्रदेश सदस्य अमित कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष एडवोकेट भरत पाटील आदींची उपस्थिती होती. शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी या मेळाव्याचे सूत्रसंचालन केले.खडसेंचे नाव काढताच म्हणाले रात गई बात गईमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी नाराज होऊन पक्ष सोडला, याबाबत विचारले असता आमदार चंद्रकांत पाटील यांनी रात गई बात गई असे म्हणत, त्यांचा प्रश्न आता संपला आहे, असे उत्तर दिले. 

टॅग्स :PoliticsराजकारणSatara areaसातारा परिसरUddhav Thackerayउद्धव ठाकरेchandrakant patilचंद्रकांत पाटील