शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

‘तळहिरा’त केवळ २५ टक्केच पाणी

By admin | Updated: September 11, 2014 23:01 IST

दुष्काळाचे सावट : शेतकऱ्यांच्या अजूनही पावसाकडेच नजरा

वाठार स्टेशन : जिल्हाभर हाहाकार घालणाऱ्या पावसाने अनेकांना दिलासा दिला असला तरी कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील वाठार स्टेशन, देऊर, तळिये गावांच्या पाण्याचा प्रश्न मात्र आजही जैसे थे आहे. या सर्वच गावांची तहान भागविणारा तळहिरा तलाव उद्याप २५ टक्के देखील भरला नसल्याने या गावांचा पाणीप्रश्न बिकट झाला आहे.१९९९ नंतर अपवादात्मकरीत्या सलग दोन-तीन वर्षे हा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर २००४ मधील दुष्काळात हा तलाव कोरडा पडला होता. त्यानंतर २००६-०७ मध्ये हा तलाव एकवेळच पूर्ण क्षमतेने भरून वाहिला होता. त्यानंतर आज अखेर म्हणजे, जवळपास पाच ते सहा वर्षांत तलाव अद्याप भरलाच नसल्याने चालूवर्षी तरी हा तलाव भरणार का? याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. १९७७ पासून दिवंगत माजी आमदार शंकरराव जगताप यांच्या प्रयत्नातून या तलावाची संकल्पना कागदावर आली आणि त्यानंतरच हा तलाव साकारण्याचे काम नजीकच्या काही वर्षांत पूर्ण झाला.या तलावाचा सर्वाधिक लाभ तलावाखालील देऊर गावच्या शेती व पिण्याच्या पाण्यासाठी होत आहे. याच तलावाखाली वाठारस्टेशन स्वजलधारा विहीर काढण्यात आली असून, तळिये गावसाठीही याच धरणपात्रातून पाणी उचलले जात आहे. त्यामुळे या तलावावरच या तिन्ही गावांचा पाणीप्रश्न अवलंबून आहे. (वार्ताहर)सद्य:स्थितीत वाठार स्टेशन, देऊर, तळिये या गावांच्या पश्चिमेस पाऊस झाल्याने वसना नदीत थोडेफार पाणी आहे. परंतु हे पाणी काही दिवसांतच बंद पडणार असल्याने दुष्काळाची तीव्रता आजही भेडसावत आहे. देऊरकरिता आजही चार ते पाच दिवसांनी पाणी मिळत आहे. त्यामुळे आतापर्यंत झालेला पाऊस या भागात तरी समाधानकारक नसल्याचाच प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.