शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘तळहिरा’त केवळ २५ टक्केच पाणी

By admin | Updated: September 11, 2014 23:01 IST

दुष्काळाचे सावट : शेतकऱ्यांच्या अजूनही पावसाकडेच नजरा

वाठार स्टेशन : जिल्हाभर हाहाकार घालणाऱ्या पावसाने अनेकांना दिलासा दिला असला तरी कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील वाठार स्टेशन, देऊर, तळिये गावांच्या पाण्याचा प्रश्न मात्र आजही जैसे थे आहे. या सर्वच गावांची तहान भागविणारा तळहिरा तलाव उद्याप २५ टक्के देखील भरला नसल्याने या गावांचा पाणीप्रश्न बिकट झाला आहे.१९९९ नंतर अपवादात्मकरीत्या सलग दोन-तीन वर्षे हा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर २००४ मधील दुष्काळात हा तलाव कोरडा पडला होता. त्यानंतर २००६-०७ मध्ये हा तलाव एकवेळच पूर्ण क्षमतेने भरून वाहिला होता. त्यानंतर आज अखेर म्हणजे, जवळपास पाच ते सहा वर्षांत तलाव अद्याप भरलाच नसल्याने चालूवर्षी तरी हा तलाव भरणार का? याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. १९७७ पासून दिवंगत माजी आमदार शंकरराव जगताप यांच्या प्रयत्नातून या तलावाची संकल्पना कागदावर आली आणि त्यानंतरच हा तलाव साकारण्याचे काम नजीकच्या काही वर्षांत पूर्ण झाला.या तलावाचा सर्वाधिक लाभ तलावाखालील देऊर गावच्या शेती व पिण्याच्या पाण्यासाठी होत आहे. याच तलावाखाली वाठारस्टेशन स्वजलधारा विहीर काढण्यात आली असून, तळिये गावसाठीही याच धरणपात्रातून पाणी उचलले जात आहे. त्यामुळे या तलावावरच या तिन्ही गावांचा पाणीप्रश्न अवलंबून आहे. (वार्ताहर)सद्य:स्थितीत वाठार स्टेशन, देऊर, तळिये या गावांच्या पश्चिमेस पाऊस झाल्याने वसना नदीत थोडेफार पाणी आहे. परंतु हे पाणी काही दिवसांतच बंद पडणार असल्याने दुष्काळाची तीव्रता आजही भेडसावत आहे. देऊरकरिता आजही चार ते पाच दिवसांनी पाणी मिळत आहे. त्यामुळे आतापर्यंत झालेला पाऊस या भागात तरी समाधानकारक नसल्याचाच प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.