शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
4
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
5
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
7
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
8
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
9
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
10
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
11
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
12
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
13
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
14
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
15
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
16
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
17
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
18
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
19
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
20
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
Daily Top 2Weekly Top 5

भिंत कोसळून तीन गणेशभक्तांचा मृत्यू !

By admin | Updated: September 9, 2014 23:46 IST

महिला गंभीर जखमी : राजपथावर ‘मोरया’च्या जयघोषात मिसळले टाहो; डॉल्बीच्या दणदणाटावर सातारकरांचा आक्षेप

सातारा : गणेश विसर्जन मिरवणुकीत ‘मोरया’चा गजर सुरू असतानाच अचानक मोठा आवाज झाला आणि त्या जयघोषातच टाहो मिसळले. सातारच्या राजपथावरील इमारतीची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत सोमवारी रात्री तिघांचा मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली. इमारतीच्या मालकांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला असला, तरी डॉल्बीच्या दणदणाटामुळे ही भिंत कोसळल्याचीच चर्चा शहरात अधिक आहे.चंद्रकांत भिवा बोले (वय ६४, रा. समर्थ मंदिरजवळ, सातारा), उमाकांत गजानन कुलकर्णी (६२, रा. यादोगोपाळ पेठ, सातारा) आणि गजानन श्रीरंग कदम (रा. करंजे पेठ, सातारा) अशी मृतांची नावे आहेत. अश्विनी नीलकंठ भिसे (४०, रा. मंगळवार पेठ, सातारा) या गंभीर जखमी झाल्या आहेत. सोमवारी रात्री गणेश विसर्जन मिरवणूक ऐन रंगात आली असताना साडेअकराच्या सुमारास राजपथावरील सिटी पोस्टानजीक असलेल्या एका इमारतीची भिंत अचानक कोसळली. या भिंतीजवळच बोले यांचा वडापावचा गाडा उभा होता. या गाड्याशेजारी गप्पा मारत उभे राहिलेले कदम आणि कुलकर्णी यांच्यासह बोलेही क्षणार्धात ढिगाऱ्याखाली गाडले गेले. आणखीही काहीजण ढिगाऱ्याखाली अडकले होते. मात्र, त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मिरवणुकीची धामधूम सुरू असतानाच घडलेल्या या प्रकारामुळे गणेशभक्तांची प्रचंड धावपळ उडाली. पोलिसांनी विसर्जन मिरवणूक तत्काळ मार्गी लावून बचावकार्य सुरू केले. मिरवणुकीतील मंडळांचे कार्यकर्तेही मदतीला धावले. (प्रतिनिधी) काळाने आधीच दिला होता इशारा!सातारा : राजपथावरील सुमारे १०५ वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ इमारतीचा काही भाग कोसळला होता. जणू पुढे होणाऱ्या मोठ्या दुर्घटनेचा इशाराच मागील महिन्यातील तुफान पावसात मिळाला होता. यानंतर पालिकेने इमारत मालकाला नोटीसही दिली होती. (अधिक वृत्त पान २ वर)इमारत केली जमीनदोस्तसोमवारी रात्री दुर्घटना घडल्यानंतर सोमवारी रात्रीच पालिकेचा जेसीबी घटनास्थळी दाखल झाला आणि ही धोकादायक इमारत पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आली.त्यासाठी आलेला खर्चही इमारतीच्या मालकांकडूनच वसूल केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. २० आॅगस्टला साताऱ्यात ढगफुटीसदृश पाऊस झाल्यानंतर ११८ धोकादायक इमारतींच्या मालकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यात लांजेकर यांचाही समावेश होता. डॉल्बीमुळेच भिंत कोसळलीमिरवणुकीतील डॉल्बीच्या हादऱ्यांमुळे भिंत कोसळल्याची चर्चा रात्रीपासूनच नागरिकांत आणि सोशल मीडियात सुरू झाली. तथापि, इमारतही मोडकळीस आली होती आणि पालिकेने ती पाडण्याची नोटीस बजावली होती, हेही नंतर समोर आले.याप्रकरणी इमारतीचे मालक वसंत नारायण लांजेकर आणि दिगंबर नारायण लांजेकर (रा. भवानी पेठ, सातारा) यांच्याविरुद्ध तिघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा (भादवि कलम ३०४) गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पालिकेचे कनिष्ठ अभियंता प्रदीप साबळे यांनी याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.