शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

भिंत कोसळून तीन गणेशभक्तांचा मृत्यू !

By admin | Updated: September 9, 2014 23:46 IST

महिला गंभीर जखमी : राजपथावर ‘मोरया’च्या जयघोषात मिसळले टाहो; डॉल्बीच्या दणदणाटावर सातारकरांचा आक्षेप

सातारा : गणेश विसर्जन मिरवणुकीत ‘मोरया’चा गजर सुरू असतानाच अचानक मोठा आवाज झाला आणि त्या जयघोषातच टाहो मिसळले. सातारच्या राजपथावरील इमारतीची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत सोमवारी रात्री तिघांचा मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली. इमारतीच्या मालकांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला असला, तरी डॉल्बीच्या दणदणाटामुळे ही भिंत कोसळल्याचीच चर्चा शहरात अधिक आहे.चंद्रकांत भिवा बोले (वय ६४, रा. समर्थ मंदिरजवळ, सातारा), उमाकांत गजानन कुलकर्णी (६२, रा. यादोगोपाळ पेठ, सातारा) आणि गजानन श्रीरंग कदम (रा. करंजे पेठ, सातारा) अशी मृतांची नावे आहेत. अश्विनी नीलकंठ भिसे (४०, रा. मंगळवार पेठ, सातारा) या गंभीर जखमी झाल्या आहेत. सोमवारी रात्री गणेश विसर्जन मिरवणूक ऐन रंगात आली असताना साडेअकराच्या सुमारास राजपथावरील सिटी पोस्टानजीक असलेल्या एका इमारतीची भिंत अचानक कोसळली. या भिंतीजवळच बोले यांचा वडापावचा गाडा उभा होता. या गाड्याशेजारी गप्पा मारत उभे राहिलेले कदम आणि कुलकर्णी यांच्यासह बोलेही क्षणार्धात ढिगाऱ्याखाली गाडले गेले. आणखीही काहीजण ढिगाऱ्याखाली अडकले होते. मात्र, त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मिरवणुकीची धामधूम सुरू असतानाच घडलेल्या या प्रकारामुळे गणेशभक्तांची प्रचंड धावपळ उडाली. पोलिसांनी विसर्जन मिरवणूक तत्काळ मार्गी लावून बचावकार्य सुरू केले. मिरवणुकीतील मंडळांचे कार्यकर्तेही मदतीला धावले. (प्रतिनिधी) काळाने आधीच दिला होता इशारा!सातारा : राजपथावरील सुमारे १०५ वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ इमारतीचा काही भाग कोसळला होता. जणू पुढे होणाऱ्या मोठ्या दुर्घटनेचा इशाराच मागील महिन्यातील तुफान पावसात मिळाला होता. यानंतर पालिकेने इमारत मालकाला नोटीसही दिली होती. (अधिक वृत्त पान २ वर)इमारत केली जमीनदोस्तसोमवारी रात्री दुर्घटना घडल्यानंतर सोमवारी रात्रीच पालिकेचा जेसीबी घटनास्थळी दाखल झाला आणि ही धोकादायक इमारत पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आली.त्यासाठी आलेला खर्चही इमारतीच्या मालकांकडूनच वसूल केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. २० आॅगस्टला साताऱ्यात ढगफुटीसदृश पाऊस झाल्यानंतर ११८ धोकादायक इमारतींच्या मालकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यात लांजेकर यांचाही समावेश होता. डॉल्बीमुळेच भिंत कोसळलीमिरवणुकीतील डॉल्बीच्या हादऱ्यांमुळे भिंत कोसळल्याची चर्चा रात्रीपासूनच नागरिकांत आणि सोशल मीडियात सुरू झाली. तथापि, इमारतही मोडकळीस आली होती आणि पालिकेने ती पाडण्याची नोटीस बजावली होती, हेही नंतर समोर आले.याप्रकरणी इमारतीचे मालक वसंत नारायण लांजेकर आणि दिगंबर नारायण लांजेकर (रा. भवानी पेठ, सातारा) यांच्याविरुद्ध तिघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा (भादवि कलम ३०४) गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पालिकेचे कनिष्ठ अभियंता प्रदीप साबळे यांनी याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.