शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
4
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
5
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
6
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
7
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
8
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
9
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
10
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
11
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
12
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
13
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
14
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
15
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
16
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
17
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
18
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
19
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
20
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज

भिंत कोसळून तीन गणेशभक्तांचा मृत्यू !

By admin | Updated: September 9, 2014 23:46 IST

महिला गंभीर जखमी : राजपथावर ‘मोरया’च्या जयघोषात मिसळले टाहो; डॉल्बीच्या दणदणाटावर सातारकरांचा आक्षेप

सातारा : गणेश विसर्जन मिरवणुकीत ‘मोरया’चा गजर सुरू असतानाच अचानक मोठा आवाज झाला आणि त्या जयघोषातच टाहो मिसळले. सातारच्या राजपथावरील इमारतीची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत सोमवारी रात्री तिघांचा मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली. इमारतीच्या मालकांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला असला, तरी डॉल्बीच्या दणदणाटामुळे ही भिंत कोसळल्याचीच चर्चा शहरात अधिक आहे.चंद्रकांत भिवा बोले (वय ६४, रा. समर्थ मंदिरजवळ, सातारा), उमाकांत गजानन कुलकर्णी (६२, रा. यादोगोपाळ पेठ, सातारा) आणि गजानन श्रीरंग कदम (रा. करंजे पेठ, सातारा) अशी मृतांची नावे आहेत. अश्विनी नीलकंठ भिसे (४०, रा. मंगळवार पेठ, सातारा) या गंभीर जखमी झाल्या आहेत. सोमवारी रात्री गणेश विसर्जन मिरवणूक ऐन रंगात आली असताना साडेअकराच्या सुमारास राजपथावरील सिटी पोस्टानजीक असलेल्या एका इमारतीची भिंत अचानक कोसळली. या भिंतीजवळच बोले यांचा वडापावचा गाडा उभा होता. या गाड्याशेजारी गप्पा मारत उभे राहिलेले कदम आणि कुलकर्णी यांच्यासह बोलेही क्षणार्धात ढिगाऱ्याखाली गाडले गेले. आणखीही काहीजण ढिगाऱ्याखाली अडकले होते. मात्र, त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मिरवणुकीची धामधूम सुरू असतानाच घडलेल्या या प्रकारामुळे गणेशभक्तांची प्रचंड धावपळ उडाली. पोलिसांनी विसर्जन मिरवणूक तत्काळ मार्गी लावून बचावकार्य सुरू केले. मिरवणुकीतील मंडळांचे कार्यकर्तेही मदतीला धावले. (प्रतिनिधी) काळाने आधीच दिला होता इशारा!सातारा : राजपथावरील सुमारे १०५ वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ इमारतीचा काही भाग कोसळला होता. जणू पुढे होणाऱ्या मोठ्या दुर्घटनेचा इशाराच मागील महिन्यातील तुफान पावसात मिळाला होता. यानंतर पालिकेने इमारत मालकाला नोटीसही दिली होती. (अधिक वृत्त पान २ वर)इमारत केली जमीनदोस्तसोमवारी रात्री दुर्घटना घडल्यानंतर सोमवारी रात्रीच पालिकेचा जेसीबी घटनास्थळी दाखल झाला आणि ही धोकादायक इमारत पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आली.त्यासाठी आलेला खर्चही इमारतीच्या मालकांकडूनच वसूल केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. २० आॅगस्टला साताऱ्यात ढगफुटीसदृश पाऊस झाल्यानंतर ११८ धोकादायक इमारतींच्या मालकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यात लांजेकर यांचाही समावेश होता. डॉल्बीमुळेच भिंत कोसळलीमिरवणुकीतील डॉल्बीच्या हादऱ्यांमुळे भिंत कोसळल्याची चर्चा रात्रीपासूनच नागरिकांत आणि सोशल मीडियात सुरू झाली. तथापि, इमारतही मोडकळीस आली होती आणि पालिकेने ती पाडण्याची नोटीस बजावली होती, हेही नंतर समोर आले.याप्रकरणी इमारतीचे मालक वसंत नारायण लांजेकर आणि दिगंबर नारायण लांजेकर (रा. भवानी पेठ, सातारा) यांच्याविरुद्ध तिघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा (भादवि कलम ३०४) गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पालिकेचे कनिष्ठ अभियंता प्रदीप साबळे यांनी याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.