शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

गावकारभार विसावला तरुणाईच्या हातात !

By admin | Updated: August 30, 2015 00:12 IST

जिल्ह्यातील स्थिती : ४० टक्क्यांपेक्षाही जास्त सरपंच-उपसरपंच तिशीच्या आतील

सातारा : कधी काळी पेन्शनरांचं गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साताऱ्यानं जशी अलीकडे कात टाकलीय, तशीच जिल्ह्यातील शेकडो गावांनीही नुकताच आपला कारभार सळसळत्या तरुण रक्ताच्या हाती दिल्याचे ‘लोकमत’ सर्वेक्षणात स्पष्ट झालेय. सातारा जिल्ह्यात नुकत्याच ७०८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. तालुक्यातील अनेक मातब्बर गटांच्या संघर्षातून गावोगावी मोठ्या चुरशीने ग्रामपंचायत सदस्य निवडले गेले. यानंतर गेल्या आठवड्यात सरपंच, उपसरपंचांच्याही निवडी झाल्या. यातील बहुतांश सरपंच अत्यंत तरुण वयात निवडले गेले असून, ‘यंग लिडर’ म्हणून या गावांनी आता स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलीय. ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणात ४० टक्क्यांपेक्षाही जास्त गावांमध्ये सरपंच किंवा उपसरपंच तिशीच्या आतील आहेत. ३५ टक्के गावकारभारी तीस ते चाळीस वयोगटांतील आहेत. १५ टक्के सरपंच चाळीस ते पन्नाशीतील आहेत. बाकीचे दहा टक्के पन्नाशीच्या वरचे आहेत. महिलांसह विविध जातींच्या आरक्षणामुळे कमी वयाचे पदाधिकारी जास्तीत जास्त गावांमध्ये दिसून येऊ लागले आहेत. विशेष म्हणजे, अत्यंत तरुणपणी सरपंच किंवा उपसरपंच पदावर आरुढ झालेल्या या मंडळींच्या जुन्या पिढींचा आजपावेतो कधीच राजकारणाशी संबंध न आल्याचेही या सर्वेक्षणात उघड झाले आहे. केवळ राजकारणात करिअरच्या हेतूने निवडणुकीला उभारल्याचेही अनेकांनी स्पष्टपणे सांगितले. (प्रतिनिधी) १५ पेक्षाही जास्त सरपंच केवळ एकवीस वर्षांचे असून, यातील बहुतांश अद्याप महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. पंचविशीच्या पुढील अनेक मंडळी चांगल्या कंपनीत नोकरीला असून, केवळ समाजकारणाच्या माध्यमातून गावाचा विकास करण्याच्या ध्येयाने झपाटलेली आहेत. ‘गावकी’ अन् ‘भावकी’च्या बाहेर जाऊन राजकारणविरहित गावगाडा हाकण्याचाच मानस बहुतांश तरुण गावकारभाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केलाय.