शहरं
Join us  
Trending Stories
1
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
2
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
3
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटमधील 'डॉन'चा विक्रम मोडला
4
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
5
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
6
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
7
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
8
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
9
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
10
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
11
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
12
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
13
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
14
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
15
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
16
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
17
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
18
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
19
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
20
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?

हुतात्मानगरीत हजारो विद्यार्थ्यांची ‘जलप्रतिज्ञा’

By admin | Updated: March 25, 2016 23:35 IST

‘लोक’चळवळीत सहभाग : कोरडी रंगपंचमी खेळून पाणी वाचविण्याची घेतली शपथ!

सातारा : जिल्ह्यातली सारीच धरणं कोरडी पडत चाललीयंत. लोकांच्या तोंडचं पाणी पळालंय. घोटभर पाण्यासाठी शेकडो गावं तहानलीयंत. अशावेळी या तहानलेल्या गावांच्या भावनेचा आदर करत यंदा पाणी न उधळता रंगपंचमी साजरी करणं काळाची गरज आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने ‘रंगोत्सव पाण्याच्या नासाडीविना’ ही मोहीम हाती घेतली. बघता-बघता असंख्य शाळा यात सहभागी होत आहेत. पाणी बचतीची शपथ दिली जात आहेत. वडूज : हुतात्मानगरी म्हणून जिल्ह्याला प्रसिद्ध असलेल्या वडूज शहरातील छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या प्रांगणात मंगळवारी ऐतिहासिक घटना घडली. एकमेकांना रंगात न्हाऊन काढण्याचे स्वप्न पाहत असलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी एका आवाजात, एका सुरात जलप्रतिज्ञा घेतली. ‘दुष्काळी स्थितीत कोरडी रंग पंचमी घेळण्याची मी शपथ घेत आहे...’ अशी शपथ घेत पाण्याचा अपव्यय टाळण्याची हमी दिली.सामाजिक चळवळीत वडूज शहराने कायमच पुढाकार घेतला आहे. वडूजमधील शाळांनी ‘लोकमत’च्या चळवळीत उडी घेतली. प्राचार्य दिलीप डोईफोडे, पर्यवेक्षक मोहन पोतदार, प्रयास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुंडलिक मांडवे, उपध्याक्ष मुन्ना मुल्ला, संतोष देशमाने, डॉ. सौरभ जोशी, अ‍ॅड. श्रीकांत तोडकर, विशाल भागवत, डॉ. प्रवीण चव्हाण, प्रसाद जगदाळे,अनिकेत कुंभार, डॉ. वैभव भंडारे, ईश्वर जाधव, धनंजय गोडसे, रतनशेठ पवार, रोहित शहा, विशाल महामुनी, मोहित शहा, राहुल लोहार, प्रसाद तोडकर, प्रमोद गांधी, विजय कुलकर्णी, चंद्रकांत काटकर उपस्थित होते. प्रसाद जगदाळे यांनी ‘जलप्रतिज्ञा’ वाचून दाखविली. आलोरे विभागाचे आनंद मोरे यांनी पाण्याची नासाडी टाळण्यासाठी आवाहन केले. (प्रतिनिधी)कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे विद्यार्थीही खेळणार कोरडी रंगपंचमीभुर्इंज : आदर्श शाळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील विद्यार्थ्यांनी कोरडी रंगपंचमी साजरी करण्याची सामूहिक शपथ घेतले. जिल्ह्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आदर्श निर्णय घेतला आहे. सध्या दुष्काळाचे भीषण सावट घोंगावत आहे. घोटभर पाण्यासाठी तडफडणाऱ्या शेकडो गावांच्या भावनेचा आदर करून रंगपंचमीला पाण्याची भरमसाठ उधळण न करता कोरडी रंगपंचमी साजरी करण्याची मानसिकता सर्वत्र बळावत आहे. ही संवेदनशीलता रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीही दाखवली आहे. वाई तालुक्याच्या पूर्व भागातूनही या विद्यालयात अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी येत आहेत. ते दुष्काळाचे चटके सोसत आहेत. त्यामुळे दुष्काळाच्या वास्तवतेचे भान या विद्यालयातील विद्यार्थ्यांनाही आहे. त्यातूनच प्राचार्य आर. एस. पाटील यांनी सर्व सहकारी शिक्षकांना सोबत घेऊन विद्यार्थ्यांना दुष्काळाचे वास्तव समजावून सांगत रंगपंचमीला पाण्याचा किती अपव्यय होतो, ते समजावून सांगितले. कोरड्या रंगपंचमीमुळे होणारे फायदे, वाचणारे पाणी आणि आरोग्याचे लाभही स्पष्ट केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी एकमताने होकार दर्शवल्यानंतर कोरडी रंगपंचमी खेळण्याबाबतची शपथ विद्यार्थ्यांना देण्यात आली. विशेष म्हणजे कोरडी रंगपंचमी कशी खेळायची याचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले. (प्रतिनिधी)होळीची पोळी गरजूंना दान!ग्रामीण भागातून होळीसाठी लाकडे वापरण्याची परंपरा आहे. यामुळे झाडांची कत्तल झाल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होतो. तो टाळण्यासाठी पर्यावरणपूरक होळी साजरी करणे क्रमप्राप्त आहे. यासंदर्भात जनजागृती करण्यात आली. तसेच होळीत नैवेद्य अर्पण केला जातो. हीच पोळी एखाद्या गरीबाला दिलातर त्याची पोट भरू शकते. तो भुकेल्याला देण्याचा निर्णय या विद्यार्थ्यांनी घेतला व प्रत्यक्षात अंमलातही आणला. रंग बरसे... पाण्याविना अवघा महाराष्ट्र दुष्काळाच्या झळा सोसत असताना त्यांचं दु:ख माण-खटावमधील जनता जाणून आहे. सर्वत्र पाणीटंचाईचे संकट आ वासून समोर असताना रंगपंचमीला पाण्याचा वारेमाप वापर करणे योग्य नाही. यासंदर्भात माण तालुक्यातील दानवलेवाडी येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांना जनजागृती करण्यात आली. तसेच स्वत:बरोबरच इतरांनाही कोरडी रंगपंचमी खेळण्यास प्रवृत्त करण्याबाबत शपथ देण्यात आली.