शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

हुतात्मानगरीत हजारो विद्यार्थ्यांची ‘जलप्रतिज्ञा’

By admin | Updated: March 25, 2016 23:35 IST

‘लोक’चळवळीत सहभाग : कोरडी रंगपंचमी खेळून पाणी वाचविण्याची घेतली शपथ!

सातारा : जिल्ह्यातली सारीच धरणं कोरडी पडत चाललीयंत. लोकांच्या तोंडचं पाणी पळालंय. घोटभर पाण्यासाठी शेकडो गावं तहानलीयंत. अशावेळी या तहानलेल्या गावांच्या भावनेचा आदर करत यंदा पाणी न उधळता रंगपंचमी साजरी करणं काळाची गरज आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने ‘रंगोत्सव पाण्याच्या नासाडीविना’ ही मोहीम हाती घेतली. बघता-बघता असंख्य शाळा यात सहभागी होत आहेत. पाणी बचतीची शपथ दिली जात आहेत. वडूज : हुतात्मानगरी म्हणून जिल्ह्याला प्रसिद्ध असलेल्या वडूज शहरातील छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या प्रांगणात मंगळवारी ऐतिहासिक घटना घडली. एकमेकांना रंगात न्हाऊन काढण्याचे स्वप्न पाहत असलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी एका आवाजात, एका सुरात जलप्रतिज्ञा घेतली. ‘दुष्काळी स्थितीत कोरडी रंग पंचमी घेळण्याची मी शपथ घेत आहे...’ अशी शपथ घेत पाण्याचा अपव्यय टाळण्याची हमी दिली.सामाजिक चळवळीत वडूज शहराने कायमच पुढाकार घेतला आहे. वडूजमधील शाळांनी ‘लोकमत’च्या चळवळीत उडी घेतली. प्राचार्य दिलीप डोईफोडे, पर्यवेक्षक मोहन पोतदार, प्रयास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुंडलिक मांडवे, उपध्याक्ष मुन्ना मुल्ला, संतोष देशमाने, डॉ. सौरभ जोशी, अ‍ॅड. श्रीकांत तोडकर, विशाल भागवत, डॉ. प्रवीण चव्हाण, प्रसाद जगदाळे,अनिकेत कुंभार, डॉ. वैभव भंडारे, ईश्वर जाधव, धनंजय गोडसे, रतनशेठ पवार, रोहित शहा, विशाल महामुनी, मोहित शहा, राहुल लोहार, प्रसाद तोडकर, प्रमोद गांधी, विजय कुलकर्णी, चंद्रकांत काटकर उपस्थित होते. प्रसाद जगदाळे यांनी ‘जलप्रतिज्ञा’ वाचून दाखविली. आलोरे विभागाचे आनंद मोरे यांनी पाण्याची नासाडी टाळण्यासाठी आवाहन केले. (प्रतिनिधी)कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे विद्यार्थीही खेळणार कोरडी रंगपंचमीभुर्इंज : आदर्श शाळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील विद्यार्थ्यांनी कोरडी रंगपंचमी साजरी करण्याची सामूहिक शपथ घेतले. जिल्ह्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आदर्श निर्णय घेतला आहे. सध्या दुष्काळाचे भीषण सावट घोंगावत आहे. घोटभर पाण्यासाठी तडफडणाऱ्या शेकडो गावांच्या भावनेचा आदर करून रंगपंचमीला पाण्याची भरमसाठ उधळण न करता कोरडी रंगपंचमी साजरी करण्याची मानसिकता सर्वत्र बळावत आहे. ही संवेदनशीलता रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीही दाखवली आहे. वाई तालुक्याच्या पूर्व भागातूनही या विद्यालयात अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी येत आहेत. ते दुष्काळाचे चटके सोसत आहेत. त्यामुळे दुष्काळाच्या वास्तवतेचे भान या विद्यालयातील विद्यार्थ्यांनाही आहे. त्यातूनच प्राचार्य आर. एस. पाटील यांनी सर्व सहकारी शिक्षकांना सोबत घेऊन विद्यार्थ्यांना दुष्काळाचे वास्तव समजावून सांगत रंगपंचमीला पाण्याचा किती अपव्यय होतो, ते समजावून सांगितले. कोरड्या रंगपंचमीमुळे होणारे फायदे, वाचणारे पाणी आणि आरोग्याचे लाभही स्पष्ट केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी एकमताने होकार दर्शवल्यानंतर कोरडी रंगपंचमी खेळण्याबाबतची शपथ विद्यार्थ्यांना देण्यात आली. विशेष म्हणजे कोरडी रंगपंचमी कशी खेळायची याचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले. (प्रतिनिधी)होळीची पोळी गरजूंना दान!ग्रामीण भागातून होळीसाठी लाकडे वापरण्याची परंपरा आहे. यामुळे झाडांची कत्तल झाल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होतो. तो टाळण्यासाठी पर्यावरणपूरक होळी साजरी करणे क्रमप्राप्त आहे. यासंदर्भात जनजागृती करण्यात आली. तसेच होळीत नैवेद्य अर्पण केला जातो. हीच पोळी एखाद्या गरीबाला दिलातर त्याची पोट भरू शकते. तो भुकेल्याला देण्याचा निर्णय या विद्यार्थ्यांनी घेतला व प्रत्यक्षात अंमलातही आणला. रंग बरसे... पाण्याविना अवघा महाराष्ट्र दुष्काळाच्या झळा सोसत असताना त्यांचं दु:ख माण-खटावमधील जनता जाणून आहे. सर्वत्र पाणीटंचाईचे संकट आ वासून समोर असताना रंगपंचमीला पाण्याचा वारेमाप वापर करणे योग्य नाही. यासंदर्भात माण तालुक्यातील दानवलेवाडी येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांना जनजागृती करण्यात आली. तसेच स्वत:बरोबरच इतरांनाही कोरडी रंगपंचमी खेळण्यास प्रवृत्त करण्याबाबत शपथ देण्यात आली.