शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

हजारो जण नि:शब्द अन् अनवाणी, छत्रपती संभाजीराजेंसाठी आजही डोळ्यांत पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 21:53 IST

सातारा शहरात मूक पदयात्रा : अभिवादनानंतर बलिदान मासचा समारोप

सातारा : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त गेल्या तीस दिवसांपासून जिल्ह्यात ठिकठिकाणी बलिदान मास पाळण्यात आला आहे. त्याचा समारोप सातारा येथे राजपथावर मूक पदयात्रा काढून करण्यात आला. यावेळी मशालधारक, तसेच हजारो नागरिकांनी पदयात्रेत सहभाग घेतला. अतिशय नि:शब्द व गंभीर वातावरणात शहरातून पदयात्रा काढण्यात आली. यानंतर राजवाड्यावर छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करून बलिदान मासचा समारोप करण्यात आला.

सातारा येथे दि. २९ रोजी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथीनिमित्त सायंकाळी ७ वाजता मूक पदयात्रा काढण्यात आली होती. त्यासाठी सायंकाळपासूनच संभाजीप्रेमींची राजवाडा चौपाटीवर गर्दी होऊ लागली होती. सायंकाळी सातच्या सुमारास पदयात्रेस प्रारंभ झाला. पदयात्रेच्या सर्वांत पुढे मशालधारक व पाठीमागे हजारो नागरिक अनवाणी चालत निघाले व सजवलेल्या वाहन रथात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा अशी पदयात्रा निघाली. यामध्ये महिला व मुलांचाही सहभाग लक्षणीय होता.

राजवाड्यावरून ही पदयात्रा मोती चौक, खालचा रस्त्याने पंचमुखी गणपती मंदिर, पाचशे एक पाटीमार्गे पोवई नाक्यावरील शिवतीर्थावर पदयात्रा आली. याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यानंतर पदयात्रा रयत संस्था, शाहू चौकमार्गे राजपथावरून राजवाड्यावर आली. याठिकाणी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर संभाजीराजेंना प्रतीकात्मक भडाग्नी देण्यात आला. छत्रपतींना श्रद्धांजली अर्पण करून बलिदान मासचा समारोप करण्यात आला.

शासकीय कार्यालयात

छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्याचे निर्माते होते, तर छत्रपती संभाजी महाराजांनी अतुलनीय शौर्य दाखवून स्वराज्याचे रक्षण केले. त्यामुळे जसे छत्रपती शिवराय, फुले-शाहू-आंबेडकर यांच्या प्रतिमा शासकीय कार्यालयत आहेत तसेच छत्रपती संभाजी महाराजांचीही प्रतिमा शासकीय कार्यालयात लावण्यात यावी, अशी आग्रही मागणी शिवप्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली.