शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

विस्तवाला हात लावणाऱ्यांना चटका काय असतो तो दिसेल, अंबादास दानवे यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 14:00 IST

मुख्यमंत्र्यांनी छ. शिवरायांची शपथ घेतलीय

सातारा : सातारा असो किंवा महाराष्ट्र, शिवसेना आपल्या पद्धतीने काम करत आहे. विस्तवाला ज्यांनी हात लावला तर त्याला कसा चटका बसतो हे आगामी काळात दिसून येईल, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेते आ. अंबादास दानवे यांनी दिला.कोरेगाव येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीच्या उद्घाटनास आले असताना शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी शिवसेना उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील, जिल्हाप्रमुख सचिन मोहिते, हर्षल कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते.दानवे म्हणाले, फडणवीस यांना कारसेवक असल्याचा पुरावा सादर करावा लागतोय यातच आमचे यश आहे. बाबरी मशीद पाडल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सांगितले होते की, बाबरी मशीद जमीनदोस्त शिवसैनिकांनी केली त्याचा सार्थ अभिमान आहे.शिवसेनेतील फुटीनंतर जिल्ह्यातील परिस्थितीबाबत प्रश्न विचारला असता आ. दानवे म्हणाले, शिवसेना पक्ष फिनिक्स पक्ष आहे. थोडीशी फुंकर घातली जी विस्तव होतो. अन् विस्तवाला कोणी हात लावला तर त्याला कसा चटका बसतो हे आगामी काळात दिसेल.आ. दानवे पुढे म्हणाले, बैलगाडा शर्यत ग्रामीण भागातील मातीतील खेळ, उत्सव आहे. प्रत्येक ठिकाणी हा उत्सव वेगवेगळ्या प्रकारे पार पडत असतो. साताऱ्यातील बैलगाडा शर्यत ही वेगळीच ओळख आहे.मुख्यमंत्र्यांनी छ. शिवरायांची शपथ घेतलीयजरांगे-पाटलांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा नेत्यांना गावबंदी करण्याचा इशारा दिला आहे, त्यावर आ. दानवे म्हणाले, मराठा आरक्षणासाठी सरकारने वारंवार तारीख पे तारीख दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आहे. त्यामुळे जरांगे-पाटलांची मागणी पूर्ण झाली पाहिजे. त्यासाठी अनेक मार्ग आहेत. केंद्रातील आणि राज्यातील सरकारला आरक्षण प्रश्न सोडवायचा नसून जाती जातीत भांडणे लावायची असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAmbadas Danweyअंबादास दानवेShiv Senaशिवसेना