शहरं
Join us  
Trending Stories
1
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
4
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
5
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
6
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
7
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
8
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
9
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
10
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
11
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
12
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
13
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
14
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
15
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
16
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
17
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
18
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
19
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
20
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
Daily Top 2Weekly Top 5

"बाळासाहेबांच्या विचारांचा ज्यांनी त्याग केला, त्यांना धनुष्यबाण मागण्याचा अधिकार नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2023 21:07 IST

पाचगणी येथे राज्यस्तरीय काव्य संमेलनाच्या सांगता समारंभास शालेय मंत्री दिपक केसरकर आले होते यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

पांचगणी :  धनुष्यबाण नेहमी बाळासाहेबांचा राहिला आहे. बाळासाहेबांच्या विचारांचा ज्यांनी त्याग केला. त्यांना धनुष्यबाण मागण्याचाही अधिकार नाही.  जे काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेले. त्यांना ना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार आहे, ना धनुष्यबाण वापरायचा अधिकार आहे, अशा शब्दात शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाला टोला लगावला. तसेच, महाराष्ट्रात झालेलं मोठ बंड हे बाळासाहेबांच्या विचारासाठीच झाल्याचा पुनरुच्चारही केसरकर यांनी केला.

पाचगणी येथे राज्यस्तरीय काव्य संमेलनाच्या सांगता समारंभास शालेय मंत्री दिपक केसरकर आले होते यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्याचबरोबर नितीन भाई भिलारे यांची उपस्थिती होती. ते पुढे म्हणाले हे पक्षांतर्गत बंड होत. माझी खात्री आहे भविष्यात सर्वच्या सर्व शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचारासोबत रहातील.   बाळासाहेबांनी मला एकदा पंतप्रधान करा मी ३७० कलम एका दिवसात रद्द करतो. त्यामुळे हिंदुत्ववादी विचारांशी बाळासाहेबांचा विचार पक्का होता. असे सांगून ते पुढे म्हणाले  वैष्णव देवीची यात्रा दहशतवाद्यांनी थांबवली. तेव्हा बाळासाहेबांनी एकच सांगितले एकही विमान हज साठी उडणार नाहीं. हिंदुत्वासाठी त्यांनी ठाम निर्णय घेतले. बाळासाहेबांचे हिंदुत्व हे कोणत्याही धर्मावर अधारीत  नव्हते. जो हिंदुस्थानवर प्रेम करतो तो हिंदू.  तेच हिंदुत्त्व  सोडून तुम्ही काँग्रेसच्या पुढाऱ्याला काश्मीर मध्ये जावून मिठी मारणार असाल तर बाळासाहेबांचे काय शिल्लक रहाणार आहे. महाराष्ट्रात आणि हिंदुस्थानात हे पाप कधीही फेडल जावू शकत नाही. अस मला स्वतःला वाटत. 

केसरकर पुढे म्हणाले, उद्या बाळासाहेबांची जयंती आहे. त्यांच्या विचारांचे स्मरण ठेवण आणि त्याची अंमबजावणी करण हीच आत्ताच्या परिस्थितीमध्ये बाळासाहेबांच्या संदर्भातली खरी आदरांजली ठरेल.आणि आमचा जो क्लेम आहे. तो जूनियन क्लेम आहे. कुठल्याही पक्षाचे अस्तित्व तो राज्यस्तरावरचा आहे. की देश स्तरावरचा त्या पक्षाला मिळालेल्या मतांवर ठरतं. किती आमदार व खासदार निवडून आले. यांना किती मते मिळाली. यावर त्या पक्षाला रिकगनेशन दिलं जातं. ज्याच्याकडे जास्त आमदार, खासदार आहेत, त्यालाच रिकगनेशन दिलं जातं असेल तर त्याला तो न्याय मिळाला पाहिजे, आणि तो आम्हाला मिळेल याची खात्री आहे.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Shiv SenaशिवसेनाBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे