शहरं
Join us  
Trending Stories
1
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
2
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
3
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
4
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
5
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
6
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
7
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
8
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
9
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
10
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
11
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
12
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
13
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
14
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
15
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
16
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
17
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
18
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
19
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
20
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?

वरुणराजाची कृपा; कोयनेला १०८३ मिलिमीटर जादा पाऊस, यंदा धरणात साडे पाच टीएमसी साठा अधिक

By नितीन काळेल | Updated: August 10, 2024 19:27 IST

नवजा, महाबळेश्वरलाही यंदा अधिक पर्जन्यमान 

सातारा : जिल्ह्यात गेल्यावर्षी दुष्काळ पडलेला. पण, यंदा वरुणराजाने कृपा केल्याने समाधानाची स्थिती आहे. त्यातच पावसाचा अजून दीड महिना बाकी असल्याने धरणे भरु शकतात. तर गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा कोयनानगरला १ हजार ८३ मिलिमीटर अधिक पाऊस झाला आहे. तसेच नवजा आणि महाबळेश्वरलाही जादा पर्जन्यमान झाले आहे. तर सध्या कोयना धरणातील पाणीसाठा ८८ टीएमसीवर पोहोचला आहे.जिल्ह्यात गेल्यावर्षी पर्जन्यमान कमी झाले होते. सुरूवातीच्या अडीच महिन्यातच चांगला पाऊस झालेला. त्यानंतर परतीच्या पावसानेही हुलकावणी दिलेली. त्यामुळे जिल्ह्यात सरासरीच्या सुमारे ७५ टक्केच पाऊस झाला होता. कोणत्याही तालुक्याने वार्षिक सरासरी गाठली नव्हती. परिणामी पश्चिम भागातील कोयनेसह बहुतांशी प्रमुख धरणे भरली नव्हती. तसेच पूर्व भागातील पाझर तलावातही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला नव्हता. त्यामुळे जिल्हावासीयांना आठ-नऊ महिने दुष्काळाशी सामना करावा लागला. यंदा मात्र, जिल्ह्यावर वरुणराजाने कृपा केली आहे.मान्सूनचा पाऊसच जिल्ह्यासाठी महत्वाचा ठरतो. यंदा जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पावसाला सुरूवात झाली. तर जुलै महिन्यात अतिवृष्टी होऊन जनजीवन विस्कळीत झाले. जूनमधील पावसावर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणीला सुरूवात केली. त्यामुळे यंदा १०० टक्के पेरणी झाली आहे. तसेच मोठ्या प्रकल्पातही पाणीसाठा वाढला. जून ते जुलै या दोन महिन्यांचा विचार करता जिल्ह्यात ४४ टक्के अधिक पर्जन्यमान झाले. त्याचबरोबर कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी या प्रमुख प्रकल्पात ८० ते ८७ टक्क्यांदरम्यान पाणीसाठा झालेला आहे. सध्या या धरणात सुमारे १२५ टीएमसी साठा आहे. त्यातच पावसाचा अजून दीड महिना आहे. यामुळे धरणे भरु शकतात.मागीलवर्षीपेक्षा यंदा जिल्ह्यात पर्जन्यमान अधिक झाले आहे. गेल्यावर्षी १० आॅगस्टपर्यंत कोयनानगर येथे ३ हजार १६१ मिलिमीटर पाऊस झाला होता. यंदा ४ हजार २४४ मिलिमीटर पाऊस झाला. त्यातच अजूनही कोयना धरणक्षेत्रात पाऊस होत असल्याने पाच हजार मिलिमीटचाही टप्पा पार होऊ शकतो. तर नवजा येथे आतापर्यंत ५ हजार ३ मिलिमीटर पाऊस पडला आहे. गतवर्षीच्या तुलनेत नवाजला ५११ मिलिमीटर अधिक पर्जन्यमान झाले आहे. त्याचबरोबर महाबळेश्वरलाही आतापर्यंत ४ हजार ७६२ मिलीमीटर पाऊस झाला आहे. मागीलवर्षीच्या तुलनेत महाबळेश्वरला ५८२ मिलिमीटर अधिक पाऊस पडलेला आहे. या पावसामुळे कोयनेसह प्रमुख धरणांतीलही पाणीसाठा वेगाने वाढला आहे.

कोयनेत साडे पाच टीएमसी साठा अधिक..मागीलवर्षी कमी पाऊस झाल्याने कोयना धरण पूर्ण भरलेले नव्हते. धरणाची पाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. पण, गतवर्षी ९४ टीएमसीवरच साठा झालेला. यंदा मात्र, आताच धरणात ८८.६५ टीएमसी पाणीसाठा झालेला आहे. त्यातच सध्या पाऊस कमी असलातरी धरणात आवक सुरूच आहे. अजूनही पाऊस होणार असल्याने धरण भरणार आहे. कोयनेत गतवर्षीच्या तुलनेत ५.६७ टीएमसी पाणीसाठा अधिक आहे.

२४ तासांत महाबळेश्वरला ५३ मिलीमीटर पाऊस..जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाची उघडीप आहे. तर सध्या पश्चिम भागातच तुरळक प्रमाणात पाऊस होत आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे २०, नवजाला २३ आणि महाबळेश्वरला ५३ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरण