शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी खरी? EXIT POLL अंदाजानुसार राज ठाकरेंचा सर्वात मोठा पराभव
2
पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी ५८ टक्के मतदान; १२६ जागांवरील ६९२ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांत बंद
3
इराण-अमेरिका युद्ध टळले? सैनिक कतारमधील अमेरिकन लष्करी तळावर परतले; इराणनेही हवाई क्षेत्र उघडले
4
तपोवनाचा मुद्दा, ठाकरे बंधूंची सभा; नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेनेला किती जागा मिळणार?
5
Maharashtra Municipal Election Exit Polls : जयंत पाटलांच्या सांगलीत, शिंदेच्या सोलापुरात कोण मारणार बाजी ? एक्झिट पोलचे अंदाज वाचा
6
EXIT POLL मध्ये ठाकरे बंधूंना धक्का, संजय राऊतांचा खळबळजनक दावा; 'त्या' बैठकीत काय शिजलं?
7
अमेरिका-इराणमध्ये तणाव, इराणने हवाई क्षेत्र केले बंद, एअर इंडिया आणि इंडिगोने ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी केली जारी
8
भारतीय कोस्ट गार्डची कारवाई; भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी नौकेसह 9 ताब्यात
9
Municipal Election 2026 Exit Poll Live: मुंबईत ठाकरेंना झटका बसणार, युतीला किती जागा मिळणार?
10
PMC Election Exit Poll 2026: पुण्यात भाजपाच राहणार की, राष्ट्रवादी बसणार सत्तेत, कौल कुणाला?
11
Pune Election: मतदार येरवडा तुरुंगात, पण मतदान केंद्रावर त्याच्या नावावर झालं मतदान
12
मोठा दणका! निवडणूक ड्युटीवर 'दांडी' मारणाऱ्या १५५ कर्मचाऱ्यांवर छत्रपती संभाजीनगरात गुन्हा
13
BMC Election 2026 Exit Poll: ३ सर्व्हे ३ अंदाज...मुंबईत भाजपाच सर्वात मोठा पक्ष?; महायुतीची सत्ता येण्याचा एक्झिट पोल
14
'निवडणूक मतदान प्रक्रियेत क्रांतिकारी बदल झाले पाहिजेत'; सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टच सांगितलं
15
TMC Election 2026 Exit Poll: ठाण्यात शिंदेसेना मारणार मुंसडी! उद्धवसेना, भाजपाला किती जागा मिळणार?
16
iPhone: आणखी स्वस्त झाला आयफोन; रिपब्लिक सेलआधीच मोठा धमाका! कुठं मिळतोय इतका स्वस्त?
17
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
18
महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कुठे, किती टक्के मतदान? मुंबईच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष
19
"आशिष शेलारजी, आपण राज्याचे मंत्री आहात की निवडणूक आयोगाचे वकील?", काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार, कोणत्या मुद्द्यांवर बोट?
20
 10 Minute Delivery: १० मिनिटांत डिलिव्हरी बंद, पण 'इन्सेंटिव्ह'साठी जीवघेणी शर्यत सुरूच! 
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:च्या बोअरवेलमधून भागविली गावाची तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 23:04 IST

भोलेनाथ केवटे । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यातील दुष्काळाची तीव्रता वाढत असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना वणवण करावी लागत ...

भोलेनाथ केवटे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जिल्ह्यातील दुष्काळाची तीव्रता वाढत असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना वणवण करावी लागत आहे. पाण्यासाठी ग्रामस्थांचे होणारे हाल थांबवण्यासाठी खोकडवाडी येथील एका शेतकऱ्याने सामाजिक बांधिलकीने स्वखर्चातून आपल्या शेतात बोअरवेल खोदली. गेल्या सात वर्षांपासून ते या बोअरवेलमधून संपूर्ण गावाला पाणी पुरवठा करून ग्रामस्थांची तहान भागवत आहेत.सातारा तालुक्यातील खोकडवाडी हे ६० ते ६५ घरांचं छोटंसं गाव. दुष्काळामुळे गावात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण जाला आहे. हंडाभर पाण्यासाठी काही किलोमीटरचे अंतर कापावे लागत असते. गावातीलच एका विहिरीवरून पाणी आणावे लागते; पण ते पाणी पिण्यायोग्य नाही. हंडाभर पाण्यासाठी उन्हातन्हाचे महिला व लहान मुलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. ग्रामस्थांचे होणारे हाल थांबण्यासाठी गावातील संतोष सावंत यांनी गावात निर्माण झालेली पाणीटंचाई लक्षात घेऊन सात वर्षांपूर्वी शेतात एक बोअर खोदली. तिथून प्रत्येक घरापर्यंत त्यांनी स्वखर्चातून अडीच ते तीन किलोमीटर पाईपलाईन करून त्याद्वारे गावातील प्रत्येक घरात पाणीपुरवठा करत आहेत. सकाळी सहा ते अकरा या वेळेत टप्प्याटप्प्याने गावातील प्रत्येक भागात पाणी पुरवठा केला जातोय. त्यामुळे गावातील नागरिकांना त्यांच्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांनी मागच्या वर्षी अजून एक बोअर घेतली आहे; मात्र पहिल्याच बोअरला भरपूर पाणी असल्याने दुसरी बोअर त्यांनी बंदच ठेवली आहे.दुरुस्तीसाठी गावातील काहीजणांकडून पैसेगावाला पाणी देत असताना त्यासाठी येणारा इतर दुरुस्तीचा खर्च ते गावातील ज्यांना पैसे देणे शक्य आहे, त्यांच्याकडूनच ते पैसे घेतात आणि नागरिकही पैसे देतात.गावाला मोठा दिलासासंतोष सावंत यांनी स्वखर्चातून बोअरवेल घेऊन तसेच स्वखर्चातूनच गावातील प्रत्येक घरापर्यंत पाईपलाईनने पाणीपुरवठा करत गावाला मोठा दिलासा दिला आहे.