शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

स्वत:च्या बोअरवेलमधून भागविली गावाची तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 23:04 IST

भोलेनाथ केवटे । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यातील दुष्काळाची तीव्रता वाढत असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना वणवण करावी लागत ...

भोलेनाथ केवटे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जिल्ह्यातील दुष्काळाची तीव्रता वाढत असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना वणवण करावी लागत आहे. पाण्यासाठी ग्रामस्थांचे होणारे हाल थांबवण्यासाठी खोकडवाडी येथील एका शेतकऱ्याने सामाजिक बांधिलकीने स्वखर्चातून आपल्या शेतात बोअरवेल खोदली. गेल्या सात वर्षांपासून ते या बोअरवेलमधून संपूर्ण गावाला पाणी पुरवठा करून ग्रामस्थांची तहान भागवत आहेत.सातारा तालुक्यातील खोकडवाडी हे ६० ते ६५ घरांचं छोटंसं गाव. दुष्काळामुळे गावात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण जाला आहे. हंडाभर पाण्यासाठी काही किलोमीटरचे अंतर कापावे लागत असते. गावातीलच एका विहिरीवरून पाणी आणावे लागते; पण ते पाणी पिण्यायोग्य नाही. हंडाभर पाण्यासाठी उन्हातन्हाचे महिला व लहान मुलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. ग्रामस्थांचे होणारे हाल थांबण्यासाठी गावातील संतोष सावंत यांनी गावात निर्माण झालेली पाणीटंचाई लक्षात घेऊन सात वर्षांपूर्वी शेतात एक बोअर खोदली. तिथून प्रत्येक घरापर्यंत त्यांनी स्वखर्चातून अडीच ते तीन किलोमीटर पाईपलाईन करून त्याद्वारे गावातील प्रत्येक घरात पाणीपुरवठा करत आहेत. सकाळी सहा ते अकरा या वेळेत टप्प्याटप्प्याने गावातील प्रत्येक भागात पाणी पुरवठा केला जातोय. त्यामुळे गावातील नागरिकांना त्यांच्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांनी मागच्या वर्षी अजून एक बोअर घेतली आहे; मात्र पहिल्याच बोअरला भरपूर पाणी असल्याने दुसरी बोअर त्यांनी बंदच ठेवली आहे.दुरुस्तीसाठी गावातील काहीजणांकडून पैसेगावाला पाणी देत असताना त्यासाठी येणारा इतर दुरुस्तीचा खर्च ते गावातील ज्यांना पैसे देणे शक्य आहे, त्यांच्याकडूनच ते पैसे घेतात आणि नागरिकही पैसे देतात.गावाला मोठा दिलासासंतोष सावंत यांनी स्वखर्चातून बोअरवेल घेऊन तसेच स्वखर्चातूनच गावातील प्रत्येक घरापर्यंत पाईपलाईनने पाणीपुरवठा करत गावाला मोठा दिलासा दिला आहे.