शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

असाह्य लोकांचा विचार करा

By admin | Updated: August 26, 2016 23:12 IST

सुधा मूर्ती : सातारा येथे पहिला ‘लक्ष्मीबाई भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान

सातारा : ‘स्वत:चे जीवन आनंदी आणि सुखी होण्यासाठी भौतिक सुविधा मिळाव्यात, याचा सतत विचार सुरू असतो; परंतु त्या पलीकडे एक जीवन आहे, त्याचा विचार करावा. समाजातील हतबल, असाह्य लोकांचाही विचार केला पाहिजे. त्यासाठी जास्त पैसा गरजेचा नाही, तर समाजासाठी काम करण्याची मनोवृत्ती पाहिजे. त्यांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे, असे समजून काम केले पाहिजे,’ असे आवाहन इन्फोसिस फाउंडेशनच्या चेअरपर्सन डॉ. सुधा मूर्ती यांनी केले. रयत शिक्षण संस्थेच्या वतीने देण्यात येणारा पहिला ‘लक्ष्मीबाई भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार’ डॉ. मूर्ती यांंना प्रा. एन. डी. पाटील, माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या कार्यक्रमावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम, डॉ. अनिल पाटील, प्रा. एन. डी. पाटील, डॉ. दीनानाथ पाटील, उत्तमराव आवरे उपस्थित होते. डॉ. मूर्ती म्हणाल्या, ‘साताऱ्याला आल्याबद्दल मला विशेष आनंद आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांची ही कर्मभूमी आहे. उत्तर कर्नाटक आणि महाराष्ट्रासाठी छत्रपती शिवाजी महाराज काय आहेत, हे मला आई नेहमी सांगत असे. आई इतिहासाची शिक्षिका असल्याने शिवाजी महाराजांच्या अनेक गोष्टी सांगत असे. त्यामुळे मला नेहमी त्यांच्याबद्दल आकर्षण वाटते आणि आज त्यांच्या कर्मभूमीत यायला मिळाले, हे माझे भाग्य आहे.’ शिवरायांनी देशाला आत्मविश्वास, धैर्य, आत्मसन्मान दिला, असे सांगून डॉ. सुधा मूर्ती म्हणाल्या, ‘समाज शिक्षित व्हावा, यासाठी नेहमीच स्त्रियांनी त्याग केल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यापैकीच लक्ष्मीबाई पाटील यांचे उदाहरण म्हणता येईल. अनेक मान्यवरांनी स्तुती केली; परंतु मी स्तुतीबद्दल जास्त विचार करीत नाही. एका कानाने ऐकते आणि सोडून देते. गर्व नको म्हणून विचार करीत नाही. जीवनाबद्दल विचार करताना आपण आपल्या जीवनात भौतिक सुविधा आणि सुख कसे मिळेल, याबद्दल नेहमी विचार करीत असतो. त्यासाठी धडपडत असतो; परंतु त्या पलीकडेही एक जीवन आहे, त्याचा विचार करायला हवा. त्यासाठी काय करता येईल, हे बघावे. त्यासाठी जास्त पैसा पाहिजे, असणे गरजेचे नाही, तर जे शोषित आहेत, असाह्य आहेत, दुर्बल आहेत त्यांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. त्यांना मदत करण्याची मनोवृत्ती पाहिजे.’ साधे सरळ जीवन कसे जगावे आणि समाजासाठी कसे जगावे, हे महाराष्ट्राकडून मी शिकले. समाजकार्यात महाराष्ट्राचे स्थान सगळ्यात वरचे आहे. त्यामुळे मला महाराष्ट्राबद्दल प्रेम आहे. मला महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही पाहिजे, असेही डॉ. मूर्ती म्हणाल्या. कार्यक्रमाचे प्राचार्य गणेश ठाकूर यांनी प्रास्ताविक केले. शिवलिंग मेणकुदळे यांनी सूत्रसंचालन केले. पुरस्काराने स्फूर्ती मिळेल हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद वाटतो, असे सांगून मूर्ती म्हणाल्या, त्यासाठी मी योग्य आहे की नाही, हे माहीत नाही; परंतु आता हा पुरस्कार मिळाल्याने माझी जबाबदारी वाढली आहे. आता आणखी जबाबदारीने आणि जोमाने काम केले पाहिजे. ज्यांच्या नावाने पुरस्कार मिळाला आहे, त्यांच्यासारखे वागायला पाहिजे. कधी माझ्या कामात शिथिलता आली तर हा पुरस्कार बघितल्यानंतर मला स्फूर्ती मिळेल,’ (प्रतिनिधी)