शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

असाह्य लोकांचा विचार करा

By admin | Updated: August 26, 2016 23:12 IST

सुधा मूर्ती : सातारा येथे पहिला ‘लक्ष्मीबाई भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान

सातारा : ‘स्वत:चे जीवन आनंदी आणि सुखी होण्यासाठी भौतिक सुविधा मिळाव्यात, याचा सतत विचार सुरू असतो; परंतु त्या पलीकडे एक जीवन आहे, त्याचा विचार करावा. समाजातील हतबल, असाह्य लोकांचाही विचार केला पाहिजे. त्यासाठी जास्त पैसा गरजेचा नाही, तर समाजासाठी काम करण्याची मनोवृत्ती पाहिजे. त्यांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे, असे समजून काम केले पाहिजे,’ असे आवाहन इन्फोसिस फाउंडेशनच्या चेअरपर्सन डॉ. सुधा मूर्ती यांनी केले. रयत शिक्षण संस्थेच्या वतीने देण्यात येणारा पहिला ‘लक्ष्मीबाई भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार’ डॉ. मूर्ती यांंना प्रा. एन. डी. पाटील, माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या कार्यक्रमावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम, डॉ. अनिल पाटील, प्रा. एन. डी. पाटील, डॉ. दीनानाथ पाटील, उत्तमराव आवरे उपस्थित होते. डॉ. मूर्ती म्हणाल्या, ‘साताऱ्याला आल्याबद्दल मला विशेष आनंद आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांची ही कर्मभूमी आहे. उत्तर कर्नाटक आणि महाराष्ट्रासाठी छत्रपती शिवाजी महाराज काय आहेत, हे मला आई नेहमी सांगत असे. आई इतिहासाची शिक्षिका असल्याने शिवाजी महाराजांच्या अनेक गोष्टी सांगत असे. त्यामुळे मला नेहमी त्यांच्याबद्दल आकर्षण वाटते आणि आज त्यांच्या कर्मभूमीत यायला मिळाले, हे माझे भाग्य आहे.’ शिवरायांनी देशाला आत्मविश्वास, धैर्य, आत्मसन्मान दिला, असे सांगून डॉ. सुधा मूर्ती म्हणाल्या, ‘समाज शिक्षित व्हावा, यासाठी नेहमीच स्त्रियांनी त्याग केल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यापैकीच लक्ष्मीबाई पाटील यांचे उदाहरण म्हणता येईल. अनेक मान्यवरांनी स्तुती केली; परंतु मी स्तुतीबद्दल जास्त विचार करीत नाही. एका कानाने ऐकते आणि सोडून देते. गर्व नको म्हणून विचार करीत नाही. जीवनाबद्दल विचार करताना आपण आपल्या जीवनात भौतिक सुविधा आणि सुख कसे मिळेल, याबद्दल नेहमी विचार करीत असतो. त्यासाठी धडपडत असतो; परंतु त्या पलीकडेही एक जीवन आहे, त्याचा विचार करायला हवा. त्यासाठी काय करता येईल, हे बघावे. त्यासाठी जास्त पैसा पाहिजे, असणे गरजेचे नाही, तर जे शोषित आहेत, असाह्य आहेत, दुर्बल आहेत त्यांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. त्यांना मदत करण्याची मनोवृत्ती पाहिजे.’ साधे सरळ जीवन कसे जगावे आणि समाजासाठी कसे जगावे, हे महाराष्ट्राकडून मी शिकले. समाजकार्यात महाराष्ट्राचे स्थान सगळ्यात वरचे आहे. त्यामुळे मला महाराष्ट्राबद्दल प्रेम आहे. मला महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही पाहिजे, असेही डॉ. मूर्ती म्हणाल्या. कार्यक्रमाचे प्राचार्य गणेश ठाकूर यांनी प्रास्ताविक केले. शिवलिंग मेणकुदळे यांनी सूत्रसंचालन केले. पुरस्काराने स्फूर्ती मिळेल हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद वाटतो, असे सांगून मूर्ती म्हणाल्या, त्यासाठी मी योग्य आहे की नाही, हे माहीत नाही; परंतु आता हा पुरस्कार मिळाल्याने माझी जबाबदारी वाढली आहे. आता आणखी जबाबदारीने आणि जोमाने काम केले पाहिजे. ज्यांच्या नावाने पुरस्कार मिळाला आहे, त्यांच्यासारखे वागायला पाहिजे. कधी माझ्या कामात शिथिलता आली तर हा पुरस्कार बघितल्यानंतर मला स्फूर्ती मिळेल,’ (प्रतिनिधी)