शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
3
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
4
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
5
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
6
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
8
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
9
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
10
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
11
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
12
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
13
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
14
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
15
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
16
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
18
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
19
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
20
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल

असाह्य लोकांचा विचार करा

By admin | Updated: August 26, 2016 23:12 IST

सुधा मूर्ती : सातारा येथे पहिला ‘लक्ष्मीबाई भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान

सातारा : ‘स्वत:चे जीवन आनंदी आणि सुखी होण्यासाठी भौतिक सुविधा मिळाव्यात, याचा सतत विचार सुरू असतो; परंतु त्या पलीकडे एक जीवन आहे, त्याचा विचार करावा. समाजातील हतबल, असाह्य लोकांचाही विचार केला पाहिजे. त्यासाठी जास्त पैसा गरजेचा नाही, तर समाजासाठी काम करण्याची मनोवृत्ती पाहिजे. त्यांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे, असे समजून काम केले पाहिजे,’ असे आवाहन इन्फोसिस फाउंडेशनच्या चेअरपर्सन डॉ. सुधा मूर्ती यांनी केले. रयत शिक्षण संस्थेच्या वतीने देण्यात येणारा पहिला ‘लक्ष्मीबाई भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार’ डॉ. मूर्ती यांंना प्रा. एन. डी. पाटील, माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या कार्यक्रमावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम, डॉ. अनिल पाटील, प्रा. एन. डी. पाटील, डॉ. दीनानाथ पाटील, उत्तमराव आवरे उपस्थित होते. डॉ. मूर्ती म्हणाल्या, ‘साताऱ्याला आल्याबद्दल मला विशेष आनंद आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांची ही कर्मभूमी आहे. उत्तर कर्नाटक आणि महाराष्ट्रासाठी छत्रपती शिवाजी महाराज काय आहेत, हे मला आई नेहमी सांगत असे. आई इतिहासाची शिक्षिका असल्याने शिवाजी महाराजांच्या अनेक गोष्टी सांगत असे. त्यामुळे मला नेहमी त्यांच्याबद्दल आकर्षण वाटते आणि आज त्यांच्या कर्मभूमीत यायला मिळाले, हे माझे भाग्य आहे.’ शिवरायांनी देशाला आत्मविश्वास, धैर्य, आत्मसन्मान दिला, असे सांगून डॉ. सुधा मूर्ती म्हणाल्या, ‘समाज शिक्षित व्हावा, यासाठी नेहमीच स्त्रियांनी त्याग केल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यापैकीच लक्ष्मीबाई पाटील यांचे उदाहरण म्हणता येईल. अनेक मान्यवरांनी स्तुती केली; परंतु मी स्तुतीबद्दल जास्त विचार करीत नाही. एका कानाने ऐकते आणि सोडून देते. गर्व नको म्हणून विचार करीत नाही. जीवनाबद्दल विचार करताना आपण आपल्या जीवनात भौतिक सुविधा आणि सुख कसे मिळेल, याबद्दल नेहमी विचार करीत असतो. त्यासाठी धडपडत असतो; परंतु त्या पलीकडेही एक जीवन आहे, त्याचा विचार करायला हवा. त्यासाठी काय करता येईल, हे बघावे. त्यासाठी जास्त पैसा पाहिजे, असणे गरजेचे नाही, तर जे शोषित आहेत, असाह्य आहेत, दुर्बल आहेत त्यांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. त्यांना मदत करण्याची मनोवृत्ती पाहिजे.’ साधे सरळ जीवन कसे जगावे आणि समाजासाठी कसे जगावे, हे महाराष्ट्राकडून मी शिकले. समाजकार्यात महाराष्ट्राचे स्थान सगळ्यात वरचे आहे. त्यामुळे मला महाराष्ट्राबद्दल प्रेम आहे. मला महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही पाहिजे, असेही डॉ. मूर्ती म्हणाल्या. कार्यक्रमाचे प्राचार्य गणेश ठाकूर यांनी प्रास्ताविक केले. शिवलिंग मेणकुदळे यांनी सूत्रसंचालन केले. पुरस्काराने स्फूर्ती मिळेल हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद वाटतो, असे सांगून मूर्ती म्हणाल्या, त्यासाठी मी योग्य आहे की नाही, हे माहीत नाही; परंतु आता हा पुरस्कार मिळाल्याने माझी जबाबदारी वाढली आहे. आता आणखी जबाबदारीने आणि जोमाने काम केले पाहिजे. ज्यांच्या नावाने पुरस्कार मिळाला आहे, त्यांच्यासारखे वागायला पाहिजे. कधी माझ्या कामात शिथिलता आली तर हा पुरस्कार बघितल्यानंतर मला स्फूर्ती मिळेल,’ (प्रतिनिधी)