शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

साताऱ्यात वारे अन् विजांच्या कडकडाटात बरसला वळीव, वीजपुरवठा खंडित 

By नितीन काळेल | Updated: April 7, 2023 17:16 IST

पिकांची मळणी सुरू असल्याने नुकसानाची भीती. तर आंब्यासह फळबागांना फटका बसू शकतो

सातारा : सातारा शहरात शुक्रवारी दुपारी जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटात वळवाचा पाऊस झाला. यामुळे काही काळ वीजपुरवठा खंडित झाला होता. तर पावसामुळे रस्त्यावरून पाणी वाहू लागल्याने विक्रेत्यांची धांदल उडाली. दरम्यान, जिल्ह्यातीलही अनेक भागांत पावसाने हजेरी लावली.सातारा शहरातील वातावरणात दोन दिवसांपासून बदल झाला होता. पारा वाढल्याने उकाडाही जाणवत होता. त्यातच ढगाळ वातावरणही तयार होत होते. शुक्रवारी सकाळपासून तर वातावरण पावसाळी झाले होते. दुपारी आभाळ भरून आले तसेच वारे वाहण्यास सुरुवात झाली. त्यानंतर चारच्या सुमारास विजांचा कडकडाट सुरू झाला. त्यानंतर पावसाचे टपोरे थेंब पडू लागले. काही क्षणातच वळवाचा पाऊस जोरदार पडू लागला. त्यामुळे डोंगर उतारावरील भागातील पाणी रस्त्यावरून वाहू लागले. परिणामी विक्रेत्यांची चांगलीच धावपळ उडाली. याचदरम्यान, जोरदार वारे वाहू लागले होते. तसेच विजांचा कडकडाटही सुरू झाला होता. त्यामुळे शहरातील अनेक भागांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. वीज कंपनी कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. तर वळवाच्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. यामुळे सातारकरांची काही काळासाठी का असेना उकाड्यापासून सुटका झाली.दरम्यान, जिल्ह्याच्या काही भागांतही शुक्रवारी वळवाचा पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण, अजूनही अनेक पिकांची मळणी सुरू आहे. त्यामुळे नुकसानाची भीती आहे. तर या पावसाचा आंब्यासह फळबागांना फटका बसू शकतो.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊस