शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

साताऱ्यात वारे अन् विजांच्या कडकडाटात बरसला वळीव, वीजपुरवठा खंडित 

By नितीन काळेल | Updated: April 7, 2023 17:16 IST

पिकांची मळणी सुरू असल्याने नुकसानाची भीती. तर आंब्यासह फळबागांना फटका बसू शकतो

सातारा : सातारा शहरात शुक्रवारी दुपारी जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटात वळवाचा पाऊस झाला. यामुळे काही काळ वीजपुरवठा खंडित झाला होता. तर पावसामुळे रस्त्यावरून पाणी वाहू लागल्याने विक्रेत्यांची धांदल उडाली. दरम्यान, जिल्ह्यातीलही अनेक भागांत पावसाने हजेरी लावली.सातारा शहरातील वातावरणात दोन दिवसांपासून बदल झाला होता. पारा वाढल्याने उकाडाही जाणवत होता. त्यातच ढगाळ वातावरणही तयार होत होते. शुक्रवारी सकाळपासून तर वातावरण पावसाळी झाले होते. दुपारी आभाळ भरून आले तसेच वारे वाहण्यास सुरुवात झाली. त्यानंतर चारच्या सुमारास विजांचा कडकडाट सुरू झाला. त्यानंतर पावसाचे टपोरे थेंब पडू लागले. काही क्षणातच वळवाचा पाऊस जोरदार पडू लागला. त्यामुळे डोंगर उतारावरील भागातील पाणी रस्त्यावरून वाहू लागले. परिणामी विक्रेत्यांची चांगलीच धावपळ उडाली. याचदरम्यान, जोरदार वारे वाहू लागले होते. तसेच विजांचा कडकडाटही सुरू झाला होता. त्यामुळे शहरातील अनेक भागांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. वीज कंपनी कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. तर वळवाच्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. यामुळे सातारकरांची काही काळासाठी का असेना उकाड्यापासून सुटका झाली.दरम्यान, जिल्ह्याच्या काही भागांतही शुक्रवारी वळवाचा पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण, अजूनही अनेक पिकांची मळणी सुरू आहे. त्यामुळे नुकसानाची भीती आहे. तर या पावसाचा आंब्यासह फळबागांना फटका बसू शकतो.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊस