शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

रेशनकार्डही नाही... अन् धान्यही नाही!

By admin | Updated: November 9, 2015 23:28 IST

पाटण : जनता दरबारात तक्रारींचा डोंगर

पाटण : तालुक्यातील अनेक लोकांना अद्याप रेशनकार्ड मिळालेली नाहीत. तर गावागावांतील धान्य दुकानदार धान्य देत नाहीत. याबाबत पाटणला घेतलेल्या जनता दरबारात तक्रारींचा डोंगर आल्यानंतर आमदार शंभूराज देसार्इंनी याबाबतच्या तक्रारींची स्वत: तहसीलदारांनी पंधरा दिवसांत चौकशी करावी. लोकांना धान्य वेळेत मिळाले पाहिजे, अशा सूचना केल्या.पाटण तहसील कार्यालयात शनिवारी घेण्यात आलेल्या जनता दरबारात आमदार देसाई बोलत होते. यावेळी तहसीलदार रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी अरविंद पाटील, उपसभापती डी. आर. पाटील, कोयना धरणाचे कार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर बागडे व सर्व शासकीय अधिकारी उपस्थित होते.म्हावशी येथील संस्थेमार्फत वाटप करण्यात येणाऱ्या धान्य वाटपाचा चालक ज्ञानदेव गावडे बिगर पावतीने धान्य वाटप करतात. कसलेही रेकॉर्ड ठेवत नाहीत. याला पुरवठा शाखेचे अधिकारी कर्मचारी जबाबदार आहेत, अशी तक्रार करण्यात आली. दारिद्र्यरेषेखाली समावेश करावी, अशी अनेक गरजू महिलांनी यावेळी मागणी केली. तर घरकूल मिळत नाही आणि रेशनकार्ड बोगस असल्याचे दुकानदार सांगत असून, धान्य देत नसल्याची तक्रार आमदार देसाई व तहसीलदारांसमोर करण्यात आली. मूळगाव येथील पाणलोट कामाची चौकशी करावी, अशी मागणी उत्तम मोळावडे यांनी केली. मरळी वीज कार्यालयातील कालेकर नावाचा अधिकारी लोकांना उर्मट बोलत असून, पापर्डे गावातील एका शेतकऱ्याची त्याने अडवणूक केल्यामुळे सहा महिने झाले तरी ट्रान्सफॉर्मर बसविला नाही. त्यामुळे शेतीला पाणी मिळत नाही, पिके वाळली आहेत. ‘पाटण तालुका डोंगरी असून, या तालुक्यात तीन डॉक्टर द्या,’ अशी मागणी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडे केली असल्याचे आमदार म्हणाले. शांतीसागर पतसंस्थेच्या ठेवीदारांना त्याचे पैसे मिळावे, अशी मागणी करण्यात आली. (प्रतिनिधी)आजीबार्इंकडे आमदारांचा मोबाईल नंबरघोट येथील सोनवले नावाच्या वृद्ध महिलेने जनता दरबारात ‘घरकूल द्या’ म्हणून पुन्हा मागणी केली. त्यावर आमदारांनी ‘आजीबाई तुमची दखल घेतली आहे. संबंधित अधिकारी तुमच्या घरी येतील नाही आले तर मला सांगा,’ त्यावेळी आजीबाई पटकन म्हणाल्या की, ‘तुमचा नंबर माझ्याकडे आहे.’ यावर उपस्थितांमध्ये आश्चर्य व्यक्त झाले.गवळीनगर रस्त्याचे काम अर्धवटमोरणा विभागातील गवळीनगर रस्त्याचे काम पवनचक्की कंपनीच्या ठेकेदाराने अर्धवट ठेवले असून, याबाबतची तक्रार गवळीनगर (कोकिसरे) येथील ग्रामस्थांनी यावेळी केली. तसेच मोरणा-गुरेघर प्रकल्पात पाणीसाठा वाढल्यामुळे आंबेघर तर्फ मरळीच्या शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. त्यांना मोबदला मिळावा, अशी तक्रार झाली