शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

रेशनकार्डही नाही... अन् धान्यही नाही!

By admin | Updated: November 9, 2015 23:28 IST

पाटण : जनता दरबारात तक्रारींचा डोंगर

पाटण : तालुक्यातील अनेक लोकांना अद्याप रेशनकार्ड मिळालेली नाहीत. तर गावागावांतील धान्य दुकानदार धान्य देत नाहीत. याबाबत पाटणला घेतलेल्या जनता दरबारात तक्रारींचा डोंगर आल्यानंतर आमदार शंभूराज देसार्इंनी याबाबतच्या तक्रारींची स्वत: तहसीलदारांनी पंधरा दिवसांत चौकशी करावी. लोकांना धान्य वेळेत मिळाले पाहिजे, अशा सूचना केल्या.पाटण तहसील कार्यालयात शनिवारी घेण्यात आलेल्या जनता दरबारात आमदार देसाई बोलत होते. यावेळी तहसीलदार रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी अरविंद पाटील, उपसभापती डी. आर. पाटील, कोयना धरणाचे कार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर बागडे व सर्व शासकीय अधिकारी उपस्थित होते.म्हावशी येथील संस्थेमार्फत वाटप करण्यात येणाऱ्या धान्य वाटपाचा चालक ज्ञानदेव गावडे बिगर पावतीने धान्य वाटप करतात. कसलेही रेकॉर्ड ठेवत नाहीत. याला पुरवठा शाखेचे अधिकारी कर्मचारी जबाबदार आहेत, अशी तक्रार करण्यात आली. दारिद्र्यरेषेखाली समावेश करावी, अशी अनेक गरजू महिलांनी यावेळी मागणी केली. तर घरकूल मिळत नाही आणि रेशनकार्ड बोगस असल्याचे दुकानदार सांगत असून, धान्य देत नसल्याची तक्रार आमदार देसाई व तहसीलदारांसमोर करण्यात आली. मूळगाव येथील पाणलोट कामाची चौकशी करावी, अशी मागणी उत्तम मोळावडे यांनी केली. मरळी वीज कार्यालयातील कालेकर नावाचा अधिकारी लोकांना उर्मट बोलत असून, पापर्डे गावातील एका शेतकऱ्याची त्याने अडवणूक केल्यामुळे सहा महिने झाले तरी ट्रान्सफॉर्मर बसविला नाही. त्यामुळे शेतीला पाणी मिळत नाही, पिके वाळली आहेत. ‘पाटण तालुका डोंगरी असून, या तालुक्यात तीन डॉक्टर द्या,’ अशी मागणी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडे केली असल्याचे आमदार म्हणाले. शांतीसागर पतसंस्थेच्या ठेवीदारांना त्याचे पैसे मिळावे, अशी मागणी करण्यात आली. (प्रतिनिधी)आजीबार्इंकडे आमदारांचा मोबाईल नंबरघोट येथील सोनवले नावाच्या वृद्ध महिलेने जनता दरबारात ‘घरकूल द्या’ म्हणून पुन्हा मागणी केली. त्यावर आमदारांनी ‘आजीबाई तुमची दखल घेतली आहे. संबंधित अधिकारी तुमच्या घरी येतील नाही आले तर मला सांगा,’ त्यावेळी आजीबाई पटकन म्हणाल्या की, ‘तुमचा नंबर माझ्याकडे आहे.’ यावर उपस्थितांमध्ये आश्चर्य व्यक्त झाले.गवळीनगर रस्त्याचे काम अर्धवटमोरणा विभागातील गवळीनगर रस्त्याचे काम पवनचक्की कंपनीच्या ठेकेदाराने अर्धवट ठेवले असून, याबाबतची तक्रार गवळीनगर (कोकिसरे) येथील ग्रामस्थांनी यावेळी केली. तसेच मोरणा-गुरेघर प्रकल्पात पाणीसाठा वाढल्यामुळे आंबेघर तर्फ मरळीच्या शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. त्यांना मोबदला मिळावा, अशी तक्रार झाली