शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

मतं कमी पडली म्हणून फंड नाही : शाहूनगरमध्ये झळकला फलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 23:13 IST

सातारा : निवडणूक संपली की राजकारण संपते, असे म्हणतात; पण येथील शाहूनगर भागात एका अनोख्या फलकाने साºयांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

ठळक मुद्देडांबरासह रस्ताही झाला नामशेषगाडी घसरून काहींना गंभीर दुखापतही झाली आहेनिसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या परिसरात ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त

सातारा : निवडणूक संपली की राजकारण संपते, असे म्हणतात; पण येथील शाहूनगर भागात एका अनोख्या फलकाने साºयांचेच लक्ष वेधून घेतले आहे. ‘आपल्या विभागातून आमच्या उमेदवाराला कमी मतदान झाल्यामुळे आपल्या विभागासाठी फंड आलेला नाही,’ असा मजकूर या फलकावर लिहिला आहे. रस्त्यांसह मूलभूत सुविधांकडे लोकप्रतिनिधींनी केलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे हा फलक लावला गेल्याची कुजबूज परिसरात आहे.

येथील शाहूनगर परिसरात गेल्या काही वर्षांत मोठी वसाहत वाढली आहे. शहराचा विस्तार होत असताना या परिसराला नागरिकांनी भरभरून पसंती दिली. पण त्या तुलनेने येथे अपेक्षित विकास झाला नाही. आमदार-खासदारांबरोबरच स्थानिक लोकप्रतिनिधींनीही या परिसराच्या विकासाचे केवळ आश्वासन दिले असल्याचे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे. निवडणुकीच्या तोंडावर चकाचक रस्त्यांची आमिषे दाखवून प्रत्यक्षात मात्र या रस्त्यावर मुरूमही पडला नाही.

निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या परिसरात ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त आहे. महानगरांमध्ये नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने असलेल्या मुलांनी त्यांच्या पालकांसाठी शुद्ध हवेच्या ठिकाणी बंगले बांधून दिले आहेत; पण मूलभूत गरजांसाठी या ज्येष्ठांना किमान पोवई नाका परिसरापर्यंत जावे लागते. दुचाकी चालवत या रस्त्यावरून जाण्यामुळे गाडी घसरून काहींना गंभीर दुखापतही झाली आहे. येथेच इंग्रजी माध्यमाची एक मोठी शाळा आहे. या शाळेत मुलांना सोडायला येणाºया महिलाही दगडांवरून गाडी घसरल्यामुळे जखमी झाल्या आहेतपादचाºयांना काढावा लागतोय सांडपाण्यातून मार्गशाहूनगर परिसरात ५ हजारांपेक्षा जास्त लोकवस्ती आहे. बँक, भाजी मंडई, दवाखाना, पेट्रोल आदींसाठी येथील रहिवाशांना पोवईनाका परिसरात यावे लागते. शाहूनगरमधील प्रत्येक गल्ली-बोळातील रस्त्यावरचे डांबर खूप वर्षाआधीच गुल झाले आहे. रोज सकाळी फिरायला जाणाºयांना रस्त्यावरील सांडपाण्यातून मार्ग काढत जावे लागत आहे. या पाण्याची दुर्गंधीही प्रकृतीसाठी हानिकारक आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणSatara areaसातारा परिसर