शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

माणुसकीने-प्रेमाने सांगण्याची वेळ गेली; आता, कायदा आणि नियम याचाच धाक दाखविण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 18:25 IST

आत्तापर्यंत जिल्ह्यात लागण झालेले २१ रुग्ण आढळले. यातील प्राथमिक लागण झालेला एकही रुग्ण स्थानिक नाही. कोणी दुबईवरून आले, कोणी कॅलिफोर्नियातून, कोणी मुंबईहून तर कोणी पुण्यातून. प्रवास करू नका, बाहेर जाऊ नका, असे कितीही सांगितले तरी मनावर कोण घेतं.

ठळक मुद्दे मग एक हजार प्रवासी आले तरी कोठून ! जिल्ह्याची सीमा तर पंधरा दिवसांपासून बंद 

दीपक शिंदे ।सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव वाढू लागला तसा जिल्ह्याच्या सीमा लॉक करण्यात आल्या; पण या लॉकचा प्रभाव काही दिसून आला नाही. सब लॉक तरीही सबकुछ खुला, अशीच स्थिती पाहायला मिळते. बरोबर एक महिन्यापूर्वी २३ मार्चला जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची संख्या ही ३८९ होती. एक महिन्यानंतर आता २३ एप्रिल रोजी ही संख्या ११७३ आहे. याचाच अर्थ कोणीतरी दरवाजा खुला सोडत आहे.

जिल्ह्याच्या बाहेरून येणा-या आणि विशेषत: पुणे, मुंबईवरून येणाºया लोकांमुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव वाढू शकतो. यामुळे जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या. सातारा जिल्ह्यातून कोणालाही बाहेर जाता येत नाही आणि कोणालाही आत येता येत नाही. तरी देखील सुमारे साडेसातशे लोक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. शासकीय आकडेवारीच रोज बदलत आहे. दररोज जिल्ह्यात दाखल होणाऱ्यांची संख्या वाढत असल्यामुळे हे लोक येतात तरी कोठून? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

आत्तापर्यंत जिल्ह्यात लागण झालेले २१ रुग्ण आढळले. यातील प्राथमिक लागण झालेला एकही रुग्ण स्थानिक नाही. कोणी दुबईवरून आले, कोणी कॅलिफोर्नियातून, कोणी मुंबईहून तर कोणी पुण्यातून. प्रवास करू नका, बाहेर जाऊ नका, असे कितीही सांगितले तरी मनावर कोण घेतं. या हेकेखोरीमुळे एक महिन्यात एकाचे एकवीस झाले. कºहाड आणि जावळी तालुक्यातील बाधितांमुळे ही संख्या आणखी वाढली.

योग्य खबरदारी आणि लोकांचा संपर्क टाळणे अशा प्राथमिक गोष्टी पाळणे गरजेचे आहे; पण त्यामध्येही नागरिक गंभीर नाहीत. त्यामुळेच अशा उद्रेकाला सामोरे जावे लागते. अजूनही सावरण्याची वेळ आहे. क-हाड आणि मलकापूर पूर्ण बंद केले गेले आहे. जिल्ह्यात थोडीफार उसंत आहे; पण हे प्रमाण वाढले तर तालुकेही लॉकडाऊन करावे लागतील, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे प्रशासनाने ही नाकेबंदी आणखी कडक करण्याची गरज निर्माण झाली आहे.प्रशासन अजूनही दाखवतंय माणुसकीलोकांची अडचण व्हायला नको म्हणून जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक दोघेही अजूनही माणुसकी दाखवून सर्वांना विनवणी करत आहेत. काही पाच-दहा टक्के लोकांमुळे अडचणी निर्माण होत असल्याचे सांगत आहेत; पण या पाच दहा टक्क्यांना सुधारण्याची वेळ आली आहे. त्यासाठी पोलीस अधीक्षक स्वत:च रस्त्यावर उतरल्या आहेत. आता माणुसकीने आणि प्रेमाने सांगण्याची वेळ निघून गेली आहे. आता, कायदा आणि नियम याचाच धाक दाखविण्याची गरज आहे.जिल्ह्यातून बाहेर पडण्यासाठी पासची प्रतीक्षासातारा जिल्ह्यात बाहेरून येणाºया लोकांना बंदी आहे. त्याप्रमाणेच पुणे, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांतही जाता येत नाही. त्यामुळे एका जिल्ह्यातून बाहेर पडण्यासाठी पास दिला तरी दुसºया जिल्ह्यातील यंत्रणा जिल्हाबंदीचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करू शकते. त्यामुळे पोलीस अधीक्षक पातळीवरून कोणालाच जिल्ह्याबाहेर जाण्याची परवानगी दिली जात नाही. त्यामुळे अनेकजण गेल्या एक महिन्यापासून पास मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.गेल्या महिनाभरात बाहेरून आलेले प्रवासी२१ मार्च267२५ मार्च411३१ मार्च543५ एप्रिल666१० एप्रिल835१५ एप्रिल917२० एप्रिल1087२४ एप्रिल1214

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcorona virusकोरोना वायरस बातम्या