शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

..मग संजय राऊत सरोगेट मदर बेबी; राजेश क्षीरसागर यांचा घणाघात

By नितीन काळेल | Updated: March 13, 2023 20:35 IST

'टीका करताना मर्यादा असतात ; त्यांना लोकं कंटाळलेत.'

सातारा :राजकारणात टीका करताना मर्यादा पाळाव्या लागतात. पण, खा. संजय राऊत ज्येष्ठ असूनही काहीतरी बोलत सुटतात. त्यांना लोकं कंटाळलेत. त्यांनी आमच्या ५० आमदारांवर टेस्टट्यूब बेबीची टीका केली. त्यांनीच राऊतांना मतदान केले होते. मग राऊत सरोगेट मदर बेबी ठरले,’ असा घणाघात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केला.

सातारा येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सातारा लोकसभा मतदारसंघ संपर्कप्रमुखपदी निवड झाल्यानंतर प्रथमच ते साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी शिवसेनेची (शिंदे गट) बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद झाली. यावेळी जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव उपस्थित होते.

राजेश क्षीरसागर म्हणाले, ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार राज्यात शिवसेनेची बांधणी सुरू आहे. विधानसभा, लोकसभा मतदारसंघनिहाय संपर्कप्रमुखपदाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सातारा लोकसभा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच साताऱ्यात आलो. या ठिकाणचे शिवसेनेचे चित्र चांगले दिसून आले. येथे पक्षाची भक्कम बांधणी झाली आहे. जिल्ह्यात आठपैकी दोन आमदार पक्षाचे आहेत. आगामी काळात सातारा जिल्हा हा शिवसेनेचाच होईल, असा विश्वास आहे.

राज्य शासन विकासाच्या दिशेने जात आहे. सातारा जिल्ह्यातील नियोजन समितीचा निधी लॅप्स होणार नाही. अजून काही दिवस आहेत. साताऱ्याचे पालकमंत्री निधी खर्चासाठी सक्षम आहेत. त्यामुळे मार्चअखेर निधी कामावर खर्च होईल, असेही क्षीरसागर यांनी स्पष्ट केले. याचबरोबर त्यांनी सातारा लाेकसभा मतदारसंघाचा उमेदवार ठरविण्याचा अधिकार मला नाही. पण, निवडणुकीत कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, हे पाहू असा विश्वासही पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

सातारा लोकसभेसाठी सक्षम उमेदवार...

पत्रकार परिषदेत भाजपचे जिल्हाध्यक्ष व आ. जयकुमार गोरे यांनी राज्याचे पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतीत, असे वक्तव्य केल्याचा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला. यावर क्षीरसागर यांनी आता मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आहेत आणि पुढचेही म्हणून मी त्यांच्याकडेच पाहतो, असे उत्तर दिले, तर सातारा लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजपने तयारी केल्याच्या प्रश्नावर त्यांनी पूर्वी भाजप-सेनेत कटशहाचे राजकारण होते. पण, आता तसे नाही. आता बरोबर आहोत. जागा वाटपाचा प्रश्न हा निवडणुकीपूर्वी असतो. त्यावेळी काय ते ठरेल. पण सातारा मतदारसंघात शिवसेना सक्षम उमेदवार देऊ शकते, असा दावाही केला.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतsatara-acसाताराPoliticsराजकारण