शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Satara: पुलाच्या कामावेळीच कण्हेर योजनेची जलवाहिनी फुटली, दोन दिवसांपासून पाणीपुरवठा बंद

By सचिन काकडे | Updated: March 13, 2024 14:15 IST

सातारा : शाहूपुरी भागाला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी पुलासाठी सुरू असलेल्या खोदकामावेळी फुटल्याने या भागाचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. ...

सातारा : शाहूपुरी भागाला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी पुलासाठी सुरू असलेल्या खोदकामावेळी फुटल्याने या भागाचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. ऐन उन्हाळ्यात ही परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. पालिकेने जलवाहिनीची तातडीने दुरुस्ती करून पाणीपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.सातारा पालिकेच्या वतीने शाहूपुरी चौकालगत असलेल्या जुन्या पुलाच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. बुधवारी सकाळी या कामासाठी खोदकाम सुरू असतानाच कण्हेर योजनेची मुख्य जलवाहिनी फुटली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले शिवाय शाहूपुरीचा दैनंदिन पाणीपुरवठाही ठप्प झाला. मंगळवारी पाणीकपात व बुधवारी पाणीच न आल्याने येथील नागरिकांना कित्येक अडचणींचा सामना करावा लागला.जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे; परंतु हे काम पूर्ण न झाल्यास येथील रहिवाशांना गुरुवारी तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकताे. त्यामुळे जीवन प्राधिकरणे शाहूपुरी भागाला तात्पुरत्या स्वरुपात कृष्णा योजनेतून पाणीपुरवठा करावा, कोटेश्वर उपसा केंद्रातील पंप नादुरुस्त असतील तर ते तातडीने दुरुस्त करून घ्यावेत, अशी मागणी भारत भोसले यांनी निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, काम पूर्ण होईपर्यंत नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

महानुभव मठाजवळही गळती..साताऱ्यातील महानुभव मठाजवळ असलेल्या जीवन प्राधिकरणच्या जलवाहिनीला बुधवारी सकाळी गळती लागली. या गळतीमुळे हजारो लीटर पाणी वाया गेल्याने महानुभव मठ व आकाशवाणी झोपडपट्टी परिसराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. जलवाहिनीवरुन अवजड वाहन गेल्याने हा प्रकार घडल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणी