शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

सगळं पावसानं केलं म्हणता.. पण लोकांसाठी पाऊस पडला पाहिजे; उदयनराजेंच्या प्रचाराच्या किश्श्यांनी सर्व जण लोटपोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 15:15 IST

सातारा : खासदार उदयनराजे भोसले हे आपल्या वेगळ्या आणि हटके स्टाइलसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचा मूड कधी तयार होईल आणि ...

सातारा : खासदार उदयनराजे भोसले हे आपल्या वेगळ्या आणि हटके स्टाइलसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचा मूड कधी तयार होईल आणि ते काय ॲक्शन करतील, याचा काही नेम नसतो. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर- पाचगणी दौऱ्यात पत्रकारांच्या प्रश्नांना अशीच हटके स्टाइलने उत्तरे देत त्यांनी सर्वांना हसून लोटपोट केले.खासदार उदयनराजे भोसले हे सध्या राजकीय दौऱ्यासाठी सकाळी ७:३० वाजताच जलमंदिर सोडतात. दिवसभर ते जिल्ह्याच्या विविध भागांत फिरत आहेत. गुरुवारी त्यांचा महाबळेश्वर आणि पाचगणी दौरा होता. यावेळी पत्रकारांनी त्यांना गाठले आणि काही प्रश्न विचारले. त्यांना आपल्या स्टाइलने उत्तर देत त्यांनी सुरुवातच धमाकेदार केली.

प्रश्न : दौऱ्यात लोकांचा प्रतिसाद कसा आहे?उत्तर : तुम्ही जो प्रश्न विचारला ना मला दौऱ्याचा... त्यावरून तुमचे पुढचे प्रश्न काय असतील, याचा विचार करून मला गुंगी आली. दौऱ्यात काय नेहमीप्रमाणे लोकांच्या भेटीगाठी सुरू आहेत. लपवून काय ठेवायचे. पहिलेच सांगितले उभा राहणार म्हणजे राहणार. जे काही असेल ते बघू नंतर.

प्रश्न : लोकांचा प्रतिसाद कसा आहे?उत्तर : तुम्हीच सांगा... कसा आहे. चांगला आहे ना... मग मला कशाला विचारताय...?

प्रश्न : तुमच्या विरोधात एक प्रबळ उमेदवार उतरविण्याचा विचार महाविकास आघाडी आणि शरद पवार करत आहेत?उत्तर : आजपर्यंत कधीही राजकारण केले नाही. केले तर संपूर्ण समाजकारण. लोकहिताची कामे केली. आढेवेढे घेतले नाहीत. कोणाला दुखवले नाही. लोकांचे प्रेम आहे. लोक ठरवतील काय करायचे ते. शेवटी ते लोकशाहीतील राजे आहेत.

प्रश्न : पक्षाकडून उमेदवारी कधी जाहीर होईल?उत्तर : आता इथं काय आहे... इथं आत गेल्यानंतर सगळे पक्षी बघितले. ते पक्षी काय ठरवताहेत ते विचारतो त्यांना. ते तर माझ्याबरोबर आहेत, बाकी मला काही माहिती नाही.

प्रश्न : चिन्ह जाहीर नाही... पण त्याच चिन्हावर जिल्हा पिंजून काढताय. अचानक घात होऊ शकतो का? वरून काही संकेत आहेत का?उत्तर : वरून म्हणजे कोठून... इतक्यात वरती बोलवू नका. जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत लोकांची सेवा करत राहणार. बाकी काय?

प्रश्न : शरद पवार यांनी कॉलर उडवून आव्हान दिले, असे म्हटले जाते?उत्तर : त्यांना काय बोलणार... ते वडीलधारे आहेत. अहो माझं बारसं जेवलेत ते. त्यांच्याबाबत मी काय बोलणार.

प्रश्न : पण, कॉलर उडवायची स्टाइल उदयनराजेंची दुसऱ्यांना ती कशी जमणार?उत्तर : अहो, मला सांगा. काय झालं. मी कासला गेलो होतो. घाटाई देवीची यात्रा होती. दर्शनासाठी गेलो. त्यावेळी कोणी म्हटले रजनीकांतची स्टाइल गॉगलची आहे. तुमची काय स्टाइल आहे. नाही आपली काही स्टाइल नाही. आपण काय कोणाचे वाईट केले नाही. लोकांच्या हिताचेच काम केले आहे. मग म्हटले काय काय करायचे. काय तरी केले पाहिजे. कोणी पण काहीही सांगू देत, केव्हाही तयार आहे. मग कॉलर उडविली आणि ती स्टाइल झाली. कॉलर आता घातली. माझे काही काढून घ्या; पण लोकांचा जीव आहे माझ्यावर, तो कोणी काढून घेऊ शकत नाही.प्रश्न : पेहराव आता बदललाय तुमचा..?उत्तर : अगोदर मी कुर्ता-पायजमा घालायचो... लोकांना वाटायचे लयं मोठ्या बापाचं पोरंग दिसतंय. पँट, शर्ट घातले तर वाटते लय सोफिस्टीकेटेट झाले. टेक्नॉक्रेट. आता विचार केला लंगोट तर घालून जाऊ शकत नाही. काय करायचे अंग तर झाकले पाहिजे. हे बरे वाटते. गर्मीच्या दिवसातही कपडे बरे वाटतात.

प्रश्न : राजकारणाच्या रेसिंगमध्ये कोणत्या गाड्या धावताहेत ?उत्तर : मला माझी फक्त गाडी माहिती आहे... इतरांच्या कोणाच्या गाड्या धावणार माहिती नाही. शेवटी प्रत्येकाला इच्छाशक्ती आहे. त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या गाड्या फिरवाव्यात.

प्रश्न : शशिकांत शिंदे, श्रीनिवास पाटील, पृथ्वीराज चव्हाण यांच्यापैकी जास्त मैत्रीचे संबंध कोणाबरोबर?उत्तर : सगळ्यांबरोबरच... वैचारिक मतभेद असू शकतात. कदाचित माझे चुकीचे असेल त्यांचे बरोबर असेल. पण, त्यांचे विचार त्यांच्याजवळ माझे माझ्याजवळ. आपण चर्चेतून मार्ग काढू शकतो. कोणाला कमी लेखायचा विषयच येत नाही. प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी योग्य आहे. श्रीनिवास पाटील, शशिकांत शिंदे ही सर्व मित्रमंडळी आहेत. श्रीनिवास पाटील साहेब तर आमच्या वडिलांचे खास. त्यांनी मला एकदा दिल्लीत सांगितले. तुमच्या बारशाला मी होतो. तेव्हा तुम्ही पाळण्यात होता. त्यांचा आशीर्वाद निश्चित अपेक्षित आहे. ज्यांना उभे राहायचे आहे, त्यांना राहू देत. पण, तुम्ही सगळे म्हणता ना पावसामुळे सगळं झालं. देवाची कृपादृष्टी आहे. पण मला वाटते पाऊस पडावा. कारण ही निवडणूक वगैरे सोडून द्या. लोकांचा सर्वांत महत्त्वाचा प्रश्न आहे तो आहे पाण्याचा...

टॅग्स :Satara areaसातारा परिसरlok sabhaलोकसभाUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसले