शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
4
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
5
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
6
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
7
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
8
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
9
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
10
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
11
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
12
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
13
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
14
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
15
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
16
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
17
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
18
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
19
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
20
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  

धरणग्रस्तांच्या खांद्याला खांदा लावून लढू!, उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा आंदोलकांना पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2023 19:06 IST

जिल्ह्याचे भूमिपूत्र असलेल्या मुख्यमंत्र्यांकडे धरणग्रस्तांसाठी वेळ नाही

नीलेश साळुंखेकोयनानगर : प्रकल्पग्रस्तांचा लढा १९६२ पासून सुरू असून, छत्रपतींच्या मावळ्यांना लढणे माहिती आहे. प्रशासनाने हुलकावणी दिल्याने आज चौथ्या पिढी न्यायासाठी लढत आहे, या प्रकल्पग्रस्तांच्या लढ्यात आम्ही सोबत असून, त्यांच्या प्रश्नावर खांद्याला खांदा लावून लढू,’ असे आश्वासन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी दिले.कोयनानगर येथील प्रकल्पग्रस्ताच्या आंदोलनाच्या सहाव्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सातारा जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी पदाधिकाऱ्यांसह आंदोलनस्थळी भेट देऊन जाहीर पाठिंबा व्यक्त करताना ते बोलत होते.यावेळी सुरेश पाटील, गजानन कदम, महेश शेलार, सीताराम पवार, राजाराम जाधव, आनंद ढमाल, परशुराम शिर्के, दाजी पाटील, बळीराम कदम, विनायक शेलार, संजय कांबळे, कमल कदम, अक्षय कदम, रामचंद्र कदम यांच्यासह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.हर्षद कदम म्हणाले, ‘महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार वेळोवेळी बैठका घेत होते. डॉ. भारत पाटणकर यांच्याकडून माहिती घेतली जात असे. मात्र आठ महिने झाले मुख्यमंत्री धरणग्रस्तांना वेळ देत नाही आता धरणग्रस्तांनी आक्रमकपणा धारण केला पाहिजे. इथल्या बेरोजगार तरुणांच्या मतावर लोकप्रतिनिधी निवडून येतात, त्यांनी हे काम केले पाहिजे. देशात, राज्यात मोठमोठे प्रकल्प धरणग्रस्तांच्या त्यागातून उभे राहिले आहेत आता संघर्ष अटळ आहे, या लढाईत आम्ही सर्व शिवसैनिक धरणग्रस्त आंदोलकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे.’तालुकाप्रमुख सुरेश पाटील म्हणाले, ‘धरणग्रस्तांना आंदोलनाची वेळ यायला नको होती. आता आंदोलकांनी आक्रमक होऊन शासकीय कार्यालयांना टाळे ठोकल्याशिवाय सरकारचे डोळे उघडणार नाही. ठाकरे गट धरणग्रस्त आंदोलकांच्या पाठीशी कायम राहील.’ यावेळी गजानन कदम, श्रीपती माने यांनी धरणग्रस्तांच्या व्यथा मांडल्या.फुकटचे श्रेय घेऊ नये...धरणग्रस्तांच्या प्रश्नांचा गाढा अभ्यास असणारे डॉ. भारत पाटणकर अनेक वर्षांपासून धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर लढत आहेत, त्यांचे श्रेय आहे. मात्र कुणी फलकबाजी करून फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, असा उपरोधक टोला हर्षद कदम यांनी लगावला.

मुख्यमंत्र्यांना प्रकल्पग्रस्तांची बैठक घेण्यासाठी पत्र दिले. मात्र जिल्ह्याचे भूमिपूत्र असलेल्या मुख्यमंत्र्यांकडे धरणग्रस्तांसाठी वेळ नाही. तसेच आता कोणाकडूनही आश्वासन नको कृती हवी. -सचिन कदम, संघटक, श्रमिक मुक्ती दल

टॅग्स :Satara areaसातारा परिसर