शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

धरणग्रस्तांच्या खांद्याला खांदा लावून लढू!, उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा आंदोलकांना पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2023 19:06 IST

जिल्ह्याचे भूमिपूत्र असलेल्या मुख्यमंत्र्यांकडे धरणग्रस्तांसाठी वेळ नाही

नीलेश साळुंखेकोयनानगर : प्रकल्पग्रस्तांचा लढा १९६२ पासून सुरू असून, छत्रपतींच्या मावळ्यांना लढणे माहिती आहे. प्रशासनाने हुलकावणी दिल्याने आज चौथ्या पिढी न्यायासाठी लढत आहे, या प्रकल्पग्रस्तांच्या लढ्यात आम्ही सोबत असून, त्यांच्या प्रश्नावर खांद्याला खांदा लावून लढू,’ असे आश्वासन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी दिले.कोयनानगर येथील प्रकल्पग्रस्ताच्या आंदोलनाच्या सहाव्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सातारा जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी पदाधिकाऱ्यांसह आंदोलनस्थळी भेट देऊन जाहीर पाठिंबा व्यक्त करताना ते बोलत होते.यावेळी सुरेश पाटील, गजानन कदम, महेश शेलार, सीताराम पवार, राजाराम जाधव, आनंद ढमाल, परशुराम शिर्के, दाजी पाटील, बळीराम कदम, विनायक शेलार, संजय कांबळे, कमल कदम, अक्षय कदम, रामचंद्र कदम यांच्यासह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.हर्षद कदम म्हणाले, ‘महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार वेळोवेळी बैठका घेत होते. डॉ. भारत पाटणकर यांच्याकडून माहिती घेतली जात असे. मात्र आठ महिने झाले मुख्यमंत्री धरणग्रस्तांना वेळ देत नाही आता धरणग्रस्तांनी आक्रमकपणा धारण केला पाहिजे. इथल्या बेरोजगार तरुणांच्या मतावर लोकप्रतिनिधी निवडून येतात, त्यांनी हे काम केले पाहिजे. देशात, राज्यात मोठमोठे प्रकल्प धरणग्रस्तांच्या त्यागातून उभे राहिले आहेत आता संघर्ष अटळ आहे, या लढाईत आम्ही सर्व शिवसैनिक धरणग्रस्त आंदोलकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे.’तालुकाप्रमुख सुरेश पाटील म्हणाले, ‘धरणग्रस्तांना आंदोलनाची वेळ यायला नको होती. आता आंदोलकांनी आक्रमक होऊन शासकीय कार्यालयांना टाळे ठोकल्याशिवाय सरकारचे डोळे उघडणार नाही. ठाकरे गट धरणग्रस्त आंदोलकांच्या पाठीशी कायम राहील.’ यावेळी गजानन कदम, श्रीपती माने यांनी धरणग्रस्तांच्या व्यथा मांडल्या.फुकटचे श्रेय घेऊ नये...धरणग्रस्तांच्या प्रश्नांचा गाढा अभ्यास असणारे डॉ. भारत पाटणकर अनेक वर्षांपासून धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर लढत आहेत, त्यांचे श्रेय आहे. मात्र कुणी फलकबाजी करून फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, असा उपरोधक टोला हर्षद कदम यांनी लगावला.

मुख्यमंत्र्यांना प्रकल्पग्रस्तांची बैठक घेण्यासाठी पत्र दिले. मात्र जिल्ह्याचे भूमिपूत्र असलेल्या मुख्यमंत्र्यांकडे धरणग्रस्तांसाठी वेळ नाही. तसेच आता कोणाकडूनही आश्वासन नको कृती हवी. -सचिन कदम, संघटक, श्रमिक मुक्ती दल

टॅग्स :Satara areaसातारा परिसर