शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

सातारा जिल्ह्यात झपाट्याने वाढतोय लम्पीचा प्रसार; ३० जनावरांचा मृत्यू, ६२९ जनावरे बाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 17:26 IST

नाकाबंदी करून तपासणीची सूचना

सातारा : जिल्ह्यात तीन वर्षांनी लम्पी चर्मरोगाचे संकट पुन्हा वाढले असून, दीड महिन्यांत ६२९ जनावरांना बाधा झाली आहे. त्यापैकी सध्या २४६ जनावरांवर उपचार सुरू आहेत, तर ३० पशुधनाचा रोगामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे पशुसंवर्धन विभागाने हालचाली वाढवल्या असून, काही प्रमाणात निर्बंधही घालण्यात येणार आहेत. तसेच पशुसंवर्धनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही जिल्ह्याच्या सीमेवर लम्पी बाधित जनावर येऊ नयेत यासाठी तपासणीबाबत सूचना दिल्या आहेत.

राज्यात मागील तीन वर्षांपूर्वी लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव सुरू झाला. सातारा जिल्ह्यातही या रोगाचा मोठा परिणाम झाला होता. एका वर्षात हजारो जनावरांना लम्पीने बाधित केले होते, तर दीड हजाराहून अधिक पशुधनाचा रोगामुळे मृत्यू झाला होता. त्याच काळात गोवंशीय जनावरांचे लसीकरण करण्यात आले. त्यामुळे त्यानंतर लम्पी बाधित पशुधनाचा आकडा कमी होत गेला.तरीही मागील दोन वर्षांत हा आकडा कमी असला तरी माहितीवर उपचार सुरू होते. मात्र, मागील दीड महिन्यापासून लम्पी चर्मरोग पुन्हा वाढत आहे. बाधित जनावरांची संख्या दररोज वाढत असून, आतापर्यंत ३० जनावरांचा मृत्यू झाला आहे. सध्या २४६ जनावरांवर उपचार सुरू असून, ३५३ जनावरे रोगातून बरी झाली आहेत. जिल्ह्यातील लम्पी रोगाचा प्रसार पाहता प्रशासनाने आटोकाट उपाययोजना केल्या आहेत. जनावरांचे लसीकरण सुरू आहे.जिल्ह्यात लम्पी रोगाच्या पार्श्वभूमीवर गावागावांत जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच शेतकरी मेळाव्यांतून रोगासंदर्भात माहिती दिली जाणार आहे. यासाठी पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी सूचनाही दिल्या आहेत. बाधित क्षेत्रात जनावरांना उपचार करणे, गोवंशीय पशुधनाचे लसीकरण करणे, तसेच सोशल मीडिया, फ्लेक्स, पत्रके आणि गावांतून दवंडी करून लम्पी रोगाबाबत जनजागृती करावी, असेदेखील आयुक्तांनी सांगितले आहे.

शासकीय रुग्णालयात मोफत उपचार उपलब्धजिल्ह्यात काही तालुक्यांत लम्पी रोगाचे प्रादुर्भाव अधिक आहे, त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने मोहीम तीव्र केली आहे. लम्पी झाल्यानंतर शेतकरी अनेकदा खासगी डॉक्टरांकडे उपचारासाठी जातात, ज्यामुळे त्यांना आर्थिक भार सहन करावा लागतो. या परिस्थितीत पशुसंवर्धन विभागाने शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात लम्पी बाधित जनावरांना मोफत उपचार करून घेण्याचा आग्रह धरला आहे.

आतापर्यंत आकडेवारी :

  • बाधित जनावरे : ६२९
  • रोगमुक्त पशुधन : ३५३
  • जनावरांचा मृत्यू : ३०
  • उपचार सुरू : २४६

सावधगिरी बाळगा :

  • बाधित जनावरांना सामान्य पशुधनापासून वेगळे ठेवा.
  • गोठा वारंवार निर्जंतूक करा.
  • सायंकाळी कडुलिंबाचा पाला जाळून धूर करा.
  • माशी, डास यांचे प्रमाण कमी करण्याची काळजी घ्या.
  • पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण करा.

जिल्ह्यात लम्पी बाधित जनावरे आढळून येत आहेत. यासंदर्भात पशुसंवर्धन विभागाचे आयुक्तांनी उपाययोजना केल्या आहेत. सध्या पावसाळा असल्यामुळे पाऊस पडल्यावर गोचीड, गोमाशी आणि माशांची संख्या वाढते, ज्यामुळे रोगाच्या प्रसाराची शक्यता जास्त आहे. शेतकऱ्यांनी सायंकाळच्या ५ ते ६ वाजता गोठ्यात औषध फवारणी करावी आणि लिंबाच्या पानाचा धूर करावा. तसेच जनावरे आजारी पडल्यास शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात मोफत तपासणी आणि उपचार करावेत. - डॉ. दिनकर बोर्डे, उपायुक्त पशुसंवर्धन विभाग