शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
4
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
5
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
6
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
7
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
8
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
9
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
10
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
11
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
12
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
13
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
14
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
15
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
16
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
17
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
18
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
19
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
20
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा

सातारा जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढली, माणसांच्या बरोबरीने जनावरेही तहानली 

By नितीन काळेल | Updated: December 8, 2023 19:07 IST

सातारा : जिल्ह्यात पर्जन्यमान कमी झाल्याने दुष्काळाची दाहकता वाढत चालली आहे. त्यामुळे टंचाईत वाढ होत असून आता माणसांच्या बरोबरीने ...

सातारा : जिल्ह्यात पर्जन्यमान कमी झाल्याने दुष्काळाची दाहकता वाढत चालली आहे. त्यामुळे टंचाईत वाढ होत असून आता माणसांच्या बरोबरीने जनावरेही तहानली आहेत. सध्या ६७ गावे आणि २६५ वाड्यांच्या घशाला कोरड पडली असून ६१ टॅंकरवर ९७ हजार नागरिक आणि ६९ हजार पशुधनाची तहान अवलंबून आहे.जिल्ह्यात मागील चार वर्षांत चांगला पाऊस झाला होता. यामुळे उन्हाळ्यातच टंचाईची स्थिती उद्भवलेली. पण, टंचाईग्रस्त गावांची संख्या जेमतेमच असायची. जून-जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्यानंतर टॅंकर बंद व्हायचे. पण, यंदा पावसाने जिल्ह्यावरच संकट निर्माण केलेले आहे. सर्वच जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. तसेच बहुतांशी धरणेही भरलेली नाहीत. यामुळे दुष्काळाची दाहकता वाढलेली आहे. त्याचबरोबर टंचाईची समस्या उग्र स्वरुप धारण करत आहे. आताच ६७ गावे आणि २६५ वाड्यांना टॅंकरचा आधार आहे. त्यामुळे उन्हाळ्यात भयावह स्थिती निर्माण होणार आहे.माण तालुका दुष्काळी. या तालुक्यात यावर्षी कमी पाऊस झाला. त्यामुळे उन्हाळ्यापासून सुरू असणारा टॅंकर अजून बंद झालेला नाही. सध्या ३१ गावे आणि २२८ वाड्यांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतोय. यासाठी ३५ टॅंकर सुरू करण्यात आले असून यावर सुमारे ४८ हजार नागरिक अवलंबून आहेत. पांगरी, वडगाव, पाचवड, माेगराळे, बिजवडी, अनभुलेवाडी, राजवडी, मोही, थदाळे, डंगिरेवाडी, वावरहिरे, हसतनपूर, पळशी, पिंपरी, भाटकी, खडकी, वरकुटे म्हसवड, ढाकणी, कारखेल, वाकी, संभूखेड, रांजणी, भालवडी, खुटबाव, मार्डी, वारुगड, परकंदी, पांढरवाडी, उकिर्डे, सुरुपखानवाडी, विरळी, कुरणेवाडी आदी गावांसह वाड्यांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय.खटाव तालुक्यातही टंचाई आहे. ६ गावे आणि ९ वाड्यांसाठी ३ टॅंकर सुरू आहेत. यावर ४ हजार ८६९ नागरिक आणि २ हजार १४० पशुधन अवलंबून आहे. मांजरवाडी, नवलेवाडी, मांडवे, नागाचे कुमठे, गोसाव्याचीवाडी, धारपुडी या गावांसाठी टॅंकर सुरू करण्यात आलेले आहेत.फलटण तालुक्यातही कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील १० गावे आणि २८ वाड्यांना टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. १२ हजार २३६ नागरिकांना टॅंकरचा आधार आहे. तालुक्यात सध्या ८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सासवड, दुधेबावी, वडले, मिरगाव, आरडगाव, आंदरुड, घाडगेमळा येथे टॅंकर सुरू आहेत. कोरेगावमध्येही टंचाईत वाढ झालेली आहे. १९ गावांसाठी १४ टॅंकर सुरू असून त्यावर ३१ हजार नागरिक आणि अडीच हजार पशुधन अवलंबून आहे. चवणेश्वर, होलेवाडी, विखळे, फडतरवाडी, जाधववाडी, होसेवाडी, सिध्दाऱ्थनगर, गुजरवाडी, अनभुलेवाडी, नायगाव, नांदवळ, पिंपोडे बुद्रुक येथे टॅंकरने पाणीपुरवठा होतोय. वाई तालुक्यात एका गावासाठीच टॅंकर सुरू आहे. जिल्ह्यातील खंडाळा, पाटण, जावळी, महाबळेश्वर, सातारा आणि कऱ्हाड या तालुक्यात टॅंकर बंद आहेत. यावर्षी खंडाळा तालुक्यात उन्हाळ्यातही टॅंकर सुरू नव्हता. 

माणमध्ये माणसांपेक्षा जनावरे अधिक बाधित..जिल्ह्यात टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. तसेच पशुधनालाही फटका बसत आहे. माण तालुक्यात ४८ हजार नागरिकांना टॅंकरचा आधार आहे. पण, त्यापेक्षा अधिक म्हणजे ५३ हजार पशुधन टंचाईने बाधित आहे. यांनाही टॅंकरच्या पाण्याचाच आधार आहे. फलटणमध्ये ११ हजार जनावरे टॅंकरवर अवलंबून आहेत. त्याचबरोबरच सध्या ११ शासकीय आणि खासगी ५० असे मिळून ६१ टॅंकरने पाणीपुरवठा केला जातोय. आगामी काळात टॅंकरच्या संख्येत वाढ होणार आहे. तर सध्या १७ विहिरी आणि ३५ बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरdroughtदुष्काळ