शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
2
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
3
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
4
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
5
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
6
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
7
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
8
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
9
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
10
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
11
ओठ फुटलेत, कोरडे झालेत... ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप बाम की ऑइल काय आहे बेस्ट?
12
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
13
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
14
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?
15
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
16
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
17
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
18
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
19
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
20
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड

घडतंय बिघडतंय : सह्याद्री कारखाना निवडणुकीत दोघांच्या भांडणात, सत्ताधाऱ्यांचाच लाभ!

By प्रमोद सुकरे | Updated: April 7, 2025 13:32 IST

म्हणे, बाळासाहेब शत्रू, पण विरोधकांची परस्परांवरच टीका

प्रमोद सुकरेकऱ्हाड : दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होतो, असे म्हटले जाते. त्याचा प्रत्यय सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक निकालातून समोर आला आहे. भाजपचे आमदार मनोज घोरपडे व भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्यातील अंतर्गत वाद या निवडणुकीत चव्हाट्यावर आला. त्यांनी कारखाना निवडणुकीत सत्ताधारी अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात स्वतंत्र २ पॅनल उभी केली. साहजिकच त्याचा फायदा सत्ताधाऱ्यांना झाला किंवा त्यांनी उचलला. सत्ताधारी बाळासाहेब पाटील यांचे पॅनल या निवडणुकीत मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कऱ्हाड उत्तरमध्ये ऐतिहासिक सत्तांतर झाले. भाजपचे मनोज घोरपडे यांनी 'कमळ' फुलवले. यामुळे मतदारसंघात वेगळाच माहोल होता. सह्याद्री कारखान्याची पहिलीच निवडणूक अन् कार्यक्षेत्रातील सुमारे ७५ टक्के मतदार याच कराड उत्तरमधील असल्याने परिवर्तन करण्याचा चंग विरोधकांनी बांधला होता.

सत्ताधारी अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात विरोधक एकच तगडे पॅनल उभे करतील, अशी व्यूहरचना होताना दिसत होती. पण, त्याला दृष्ट लागली. शेवटच्या क्षणी जागा वाटपावरून मतभेद झाले. विरोधकांच्यात फूट पडून तिरंगी लढतीचे चित्र समोर आले. अगदी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवसापर्यंत पुन्हा ही लढाई एकास एक व्हावी म्हणून प्रयत्न झाले खरे, पण त्यात विरोधकांना यश आले नाही.

वास्तविक जेव्हा विरोधकांच्यात फूट पडून त्यांचीच दोन पॅनल रिंगणात उतरली. तेव्हाच त्यांचे कार्यकर्ते मनात हरलेले दिसले. आता या तिरंगी लढतीचा फायदा सत्ताधाऱ्यांनाच होणार असे ते खासगीत बोलू लागले आणि मनात हरलेले सैनिक रणांगणात जिंकू शकत नाही, त्याचे प्रत्यंतर रविवारी निकालातून दिसून आले.

तिरंगी लढतीची तीच चूकआजवर कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघात जेव्हा जेव्हा तिरंगी लढत झाली. तेव्हा त्याचा फायदा बाळासाहेब पाटील यांनाच झाल्याचा इतिहास आहे. पण, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकास एक लढत झाली. अन् उत्तरेत परिवर्तन झाले. खरंतर हा अनुभव ताजा असतानाच पुन्हा विरोधकांनी तिरंगी लढतीची चूक केली. त्याचा फायदा पुन्हा एकदा बाळासाहेब पाटील यांनाच झाला, हे समोर आले आहे.

विमानाचे ‘उड्डाण’ झालेच नाहीया निवडणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निवास थोरात यांनी तिसरे पॅनेल रिंगणात उतरवले. जाहीर सभा अन् प्रत्यक्ष मतदार भेटीगाठीसाठी त्यांनी धडाका लावला. पण, त्यांना प्रत्यक्ष मिळालेली अत्यल्प मते पाहता त्यांच्या विमानाने या निवडणुकीत ‘उड्डाण’च केलेच नाही असे म्हटले जात आहे.

म्हणे, बाळासाहेब शत्रू पण परस्परांवरच टीकाया निवडणुकीत विरोधकांचीच दोन पॅनल रिंगणात उतरली. त्यांनी पत्रकार परिषदांमध्ये बोलताना आमचा मुख्य शत्रू सत्ताधारी बाळासाहेब पाटील असल्याचे सांगितले. पण, प्रत्यक्ष प्रचार सभा, बैठकांमध्ये परस्परांवरच टीका केली. त्यांच्यातील टोकाचा संघर्ष चव्हाट्यावर आला. साहजिकच काठावरच्या मतदारांनी ‘कपबशी’'तूनच चहा पिणे पसंत केले.

‘मनो-धैर्य’ विस्कटले, गणित फिस्कटले!कऱ्हाड उत्तरमधून भाजपच्या माध्यमातून आमदारकीसाठी मनोज घोरपडे आणि धैर्यशील कदम हे दोघेही इच्छुक होते. घोरपडेंना उमेदवारी मिळाली. सगळे एकवटले अन् परिवर्तन झाले. पण, 'सह्याद्री'च्या या निवडणुकीत 'मनो-धैर्य' विस्कटलेले दिसले अन गणित फिस्कटले. 'आता म्हणा ''रामकृष्ण'' हरी, पुन्हा बसले तेच सत्तेवरी!' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

तिरंगी लढत झाली की घडविली?सह्याद्री सहकारी साखर कारखान्यात तिरंगी लढत झाली, हे खरे आहे. पण, ही तिरंगी लढत नक्की अंतर्गत वादामुळे घडली की कोणी घडवून आणली, याबाबत कार्यक्षेत्रात उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

..पण ‘छत्री’ उघडलीच नाहीया निवडणुकीत सभासद परिवर्तनाच्या बाजूने मतांचा पाऊस पाडतील, असे सुरुवातीला बोलले जात होते. निवडणुकीदरम्यान वळवाच्या पावसाचे संकटही आले. पण, सभासदांनी 'छत्री' उघडीच नाही. त्यांनी जुन्याच आडोशाला जाणे पसंत केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूक 2024Balasaheb Patilबाळासाहेब पाटीलdhairyashil kadamधैर्यशील कदम