शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

घडतंय बिघडतंय : सह्याद्री कारखाना निवडणुकीत दोघांच्या भांडणात, सत्ताधाऱ्यांचाच लाभ!

By प्रमोद सुकरे | Updated: April 7, 2025 13:32 IST

म्हणे, बाळासाहेब शत्रू, पण विरोधकांची परस्परांवरच टीका

प्रमोद सुकरेकऱ्हाड : दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होतो, असे म्हटले जाते. त्याचा प्रत्यय सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक निकालातून समोर आला आहे. भाजपचे आमदार मनोज घोरपडे व भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्यातील अंतर्गत वाद या निवडणुकीत चव्हाट्यावर आला. त्यांनी कारखाना निवडणुकीत सत्ताधारी अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात स्वतंत्र २ पॅनल उभी केली. साहजिकच त्याचा फायदा सत्ताधाऱ्यांना झाला किंवा त्यांनी उचलला. सत्ताधारी बाळासाहेब पाटील यांचे पॅनल या निवडणुकीत मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कऱ्हाड उत्तरमध्ये ऐतिहासिक सत्तांतर झाले. भाजपचे मनोज घोरपडे यांनी 'कमळ' फुलवले. यामुळे मतदारसंघात वेगळाच माहोल होता. सह्याद्री कारखान्याची पहिलीच निवडणूक अन् कार्यक्षेत्रातील सुमारे ७५ टक्के मतदार याच कराड उत्तरमधील असल्याने परिवर्तन करण्याचा चंग विरोधकांनी बांधला होता.

सत्ताधारी अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात विरोधक एकच तगडे पॅनल उभे करतील, अशी व्यूहरचना होताना दिसत होती. पण, त्याला दृष्ट लागली. शेवटच्या क्षणी जागा वाटपावरून मतभेद झाले. विरोधकांच्यात फूट पडून तिरंगी लढतीचे चित्र समोर आले. अगदी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवसापर्यंत पुन्हा ही लढाई एकास एक व्हावी म्हणून प्रयत्न झाले खरे, पण त्यात विरोधकांना यश आले नाही.

वास्तविक जेव्हा विरोधकांच्यात फूट पडून त्यांचीच दोन पॅनल रिंगणात उतरली. तेव्हाच त्यांचे कार्यकर्ते मनात हरलेले दिसले. आता या तिरंगी लढतीचा फायदा सत्ताधाऱ्यांनाच होणार असे ते खासगीत बोलू लागले आणि मनात हरलेले सैनिक रणांगणात जिंकू शकत नाही, त्याचे प्रत्यंतर रविवारी निकालातून दिसून आले.

तिरंगी लढतीची तीच चूकआजवर कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघात जेव्हा जेव्हा तिरंगी लढत झाली. तेव्हा त्याचा फायदा बाळासाहेब पाटील यांनाच झाल्याचा इतिहास आहे. पण, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकास एक लढत झाली. अन् उत्तरेत परिवर्तन झाले. खरंतर हा अनुभव ताजा असतानाच पुन्हा विरोधकांनी तिरंगी लढतीची चूक केली. त्याचा फायदा पुन्हा एकदा बाळासाहेब पाटील यांनाच झाला, हे समोर आले आहे.

विमानाचे ‘उड्डाण’ झालेच नाहीया निवडणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निवास थोरात यांनी तिसरे पॅनेल रिंगणात उतरवले. जाहीर सभा अन् प्रत्यक्ष मतदार भेटीगाठीसाठी त्यांनी धडाका लावला. पण, त्यांना प्रत्यक्ष मिळालेली अत्यल्प मते पाहता त्यांच्या विमानाने या निवडणुकीत ‘उड्डाण’च केलेच नाही असे म्हटले जात आहे.

म्हणे, बाळासाहेब शत्रू पण परस्परांवरच टीकाया निवडणुकीत विरोधकांचीच दोन पॅनल रिंगणात उतरली. त्यांनी पत्रकार परिषदांमध्ये बोलताना आमचा मुख्य शत्रू सत्ताधारी बाळासाहेब पाटील असल्याचे सांगितले. पण, प्रत्यक्ष प्रचार सभा, बैठकांमध्ये परस्परांवरच टीका केली. त्यांच्यातील टोकाचा संघर्ष चव्हाट्यावर आला. साहजिकच काठावरच्या मतदारांनी ‘कपबशी’'तूनच चहा पिणे पसंत केले.

‘मनो-धैर्य’ विस्कटले, गणित फिस्कटले!कऱ्हाड उत्तरमधून भाजपच्या माध्यमातून आमदारकीसाठी मनोज घोरपडे आणि धैर्यशील कदम हे दोघेही इच्छुक होते. घोरपडेंना उमेदवारी मिळाली. सगळे एकवटले अन् परिवर्तन झाले. पण, 'सह्याद्री'च्या या निवडणुकीत 'मनो-धैर्य' विस्कटलेले दिसले अन गणित फिस्कटले. 'आता म्हणा ''रामकृष्ण'' हरी, पुन्हा बसले तेच सत्तेवरी!' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

तिरंगी लढत झाली की घडविली?सह्याद्री सहकारी साखर कारखान्यात तिरंगी लढत झाली, हे खरे आहे. पण, ही तिरंगी लढत नक्की अंतर्गत वादामुळे घडली की कोणी घडवून आणली, याबाबत कार्यक्षेत्रात उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

..पण ‘छत्री’ उघडलीच नाहीया निवडणुकीत सभासद परिवर्तनाच्या बाजूने मतांचा पाऊस पाडतील, असे सुरुवातीला बोलले जात होते. निवडणुकीदरम्यान वळवाच्या पावसाचे संकटही आले. पण, सभासदांनी 'छत्री' उघडीच नाही. त्यांनी जुन्याच आडोशाला जाणे पसंत केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूक 2024Balasaheb Patilबाळासाहेब पाटीलdhairyashil kadamधैर्यशील कदम