शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

Satara: नवजामध्ये पावसाचा साडे चार हजार मिलीमीटरचा टप्पा पार

By नितीन काळेल | Updated: August 11, 2023 12:57 IST

पश्चिमेकडे उघडझाप सुरूच : कोयनेतील साठा चार दिवसानंतर ८३ टीएमसीवर

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची उघडझाप सुरू असून शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत सर्वाधिक नोंद नवजाला २५ मिलीमीटरची झाली. त्याचबरोबर नवजाच्या पावसाने यंदा साडे चार हजार मिलीमीटरचा टप्पाही पार केला. तर कोयना धरण पाणीसाठ्याने चार दिवसानंतर ८३ टीएमसीचा टप्पा ओलांडला आहे.पश्चिम भागातील ४० दिवसांच्या चांगल्या हजेरीनंतर पावसाने उघडझाप सुरू केली आहे. यामुळे चिंता वाढू लागली आहे. कारण, हवामान विभागाच्या अंदाजानुसार अजूनही १० दिवस पावसाची दडी राहणार आहे. परिणामी धरणातील पाणीसाठा वेगाने वाढणार नाही. त्यातच पश्चिम भागातच धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी आणि कोयनासारखे मोठे पाणी प्रकल्प आहेत. या सर्व सहा धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ही जवळपास १४८ टीएमसी आहे. सध्या यामधील काही धरणक्षेत्रात पावसाची दडी आहे. तर कोयना क्षेत्रातच उघडझाप आहे. त्यामुळे कोयनेत सावकाशपणे आवक होत आहे. त्यामुळे पाणीसाठा वेगाने वाढत नाही. इतर धरणांचीही अशीच स्थिती आहे.शुक्रवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगरला १९ मिलीमीटर पाऊस पडला. तर नवजा येथे २५ आणि महाबळेश्वरला २३ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. एक जूनपासूनचा विचार करता नवजाच्या पावसाने साडे चार हजार मिलीमीटरचा टप्पाही पार केला आहे. आतापर्यंत तेथे ४५०४ मिलीमीटर पाऊस पडला. तर कोयनेला ३१६७ आणि महाबळेश्वर येथे ४१९२ मिलीमीटर पर्जन्यमान झाले आहे. सकाळच्या सुमारास कोयना धरणात २५८६ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरण पाणीसाठा ८३.०६ टीएमसी झालेला. मागील चार दिवसांपासून कोयनेतून होणारा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊस