शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

पावसाची दडी! कोयनेतील आवक बंद; धरण भरण्यासाठी २१ टीएमसीची गरज

By नितीन काळेल | Updated: August 18, 2023 12:41 IST

पावसाअभावी चिंता निर्माण

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात दहा दिवसांपासून पावसाची दडी असल्याने धरणातील पाणीसाठ्यातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली नाही. त्यातच कोयना धरणात दोन दिवसांपासून आवक बंद झाली आहे. त्यामुळे सध्या ८४ टीएमसीच पाणीसाठा आहे. अजुनही धरण भरण्यासाठी २१ टीएमसीची गरज आहे. मात्र, पावसाअभावी चिंता वाढली आहे.पावसाळ्याचे अडीच महिने उलटून गेले आहेत. आतापर्यंत पश्चिम भागातच दमदार पाऊस झाला. यामुळे गेल्या दीड महिन्यात धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडीसह कोयना धरणात चांगला पाणीसाठा वाढला. पण, मागील दहा दिवसांपासून बहुतांशी भागात पावसाची दडी आहे. धरणक्षेत्रातही अत्यल्प पाऊस पडत आहे. यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक थांबली आहे. परिणामी पाणीसाठ्यात वाढ होताना दिसून येत नाही. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनेला अवघा ९ तर नवजा येथे १३ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. तर महाबळेश्वरला ३० मिलीमीटर पाऊस पडला आहे. एक जूनपासून आतापर्यंत कोयनेला ३२६९ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. तर महाबळेश्वरला ४३५५ आणि सर्वाधिक पावसाची नोंद नवजा येथे ४६४७ मिलीमीटर पडलेला आहे.यंदा या भागात पावसाचे प्रमाण चांगले राहिले असलेतरी धरणे भरण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे. कारण, प्रमुख धरणे भरण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यातच जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण कोयना आहे. या धरणाची पाणीसाठवण क्षमता १०५.२५ आहे. सध्या या धरणात ८४.१० टीएमसी पाणीसाठा आहे. त्यातच दोन दिवसांपासून धरणातील आवक बंद आहे. हे धरण भरण्यासाठी अजून २१ टीएमसी पाणी लागणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरण