शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सातारा जिल्ह्यात डेंग्यू रुग्णसंख्या शंभरीपार, चिकुनगुण्याचाही प्रादुर्भाव वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 17:07 IST

कोरोनाची लाट ओसरू लागली असली तरी दुसरीकडे डेंग्यू व चिकुनगुण्याचा प्रादुर्भाव वाढू लागला

सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोनाची लाट ओसरू लागली असली तरी दुसरीकडे डेंग्यू व चिकुनगुण्याचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने नागरिकांचा ताप चांगलाच वाढला आहे. जिल्हा हिवताप विभागाच्या नोंदीनुसार जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांत डेंग्यूचे ११० तर चिकुनगुुण्याचे तब्बल २८ रुग्ण आढळून आले असून, डेंग्यू बाधितांमध्ये सातारा तालुका आघाडीवर आहे.पावसाळा सुरू झाल्यापासून जिल्ह्यात साथरोगांत वाढ झाली आहे. थंडी, ताप, अंगदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी अशा व्याधींनी नागरिक त्रस्त झाले आहेत. बहुतांश रुग्णांमध्ये डेंग्यू व चिकुनगुण्यासदृश लक्षणे आढळून आल्याने जिल्हा हिवताप विभागाकडून गृहभेटीद्वारे सर्वेक्षण करण्यात आले. डेंग्यू अळ्या नष्ट करण्याबरोबरच संशयित नागरिकांचे मलेरिया चाचणीसाठी रक्ताचे नमुने देखील घेण्यात आले. अनेकांना जिल्हा रुग्णालयात डेंग्यू चाचणी करण्याचा सल्ला देण्यात आला.हिवताप विभागाच्या नोंदीनुसार आठ दिवसांत जिल्ह्यातील डेंग्यू बाधितांची संख्या ११० वर पोहोचली असून, सातारा तालुक्यात सर्वाधिक ७२ रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच चिकुनगुण्याचे २८ रुग्ण असून, स्वाईन फ्लूचे रुग्ण देखील आढळून येत आहेत. डेंग्यू, चिकुनगुण्याचे रुग्ण वाढू लागल्याने जिल्ह्याचा आरोग्य विभाग अलर्ट झाला असून, सर्व आरोग्य केंद्रांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

थोडी काळजी घ्या...

जिल्हा आरोग्य व हिवताप विभागाकडून खबरदारीच्या उपाययोजना राबविल्या जात असल्या तरी नागरिकांनी देखील काळजी घेणे गरजेचे आहे. घर व परिसराची नियमित स्वच्छता ठेवणे, घराजवळील पाण्याची डबकी बुजविणे, भंगार साहित्याची विल्हेवाट लावणे, भांड्यांमध्ये जास्त काळ पाणी भरून ठेवू नये, आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा, कोणताही आजार अंगावर न काढता रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत, असे आवाहन हिवताप विभागाकडून करण्यात आले आहे

तालुकानिहाय डेंग्यू रुग्णसातारा ७२, कऱ्हाड १२, वाई २, कोरेगाव ११, खटाव ९, खंडाळा १, पाटण १, जावळी १

टॅग्स :Satara areaसातारा परिसरdengueडेंग्यू