शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

HSC/12th Exam: हूश.. पहिला पेपर अगदी विना विघ्न, विद्यार्थ्यांना जादा दहा मिनिटांचा फायदा

By प्रगती पाटील | Updated: February 21, 2024 16:45 IST

सातारा जिल्ह्यात ३८ हजार विद्यार्थ्यांची हजेरी 

सातारा : करिअरच्यादृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या बारावी परिक्षेचा पहिला पेपर विनाविघ्न पार पडला. वेळेपूर्वी परिक्षा केंद्रांवर दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांना सोडायला पालकांची मोठी गर्दी झाली होती. परिक्षा काळात दहा मिनिटे जादा मिळाल्याने मुलांना याचा फायदाही झाला. विशेष म्हणजे परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांना शांततापूर्ण वातावरणात पेपर सोडवता यावा या उद्देशाने शिक्षण विभागाकडून प्रत्येक केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परीक्षा केंद्र पासून शंभर मीटरच्या अंतरात प्रवेश बंदीचे आदेशही लागू करण्यात आले होते. जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील परीक्षा केंद्रांवर सज्ज असलेल्या यंत्रणेच्या देखरेखीखाली  बारावीच्या परीक्षेला झाली आहे. बारावी परीक्षेसाठी जिल्ह्यातून ३८ हजार विद्यार्थी बसले. जिल्ह्यातील बारावीची विद्यार्थी संख्या लक्षात घेऊन परीक्षा केंद्र सज्ज केली आहेत. जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाकडून कॉपीमुक्त परीक्षा पार पाडावी यासाठी सर्व केंद्रांवरील सोयीसुविधांची पाहणी करण्यात आली आहे.भरारी पथक यांचीही नेमणूकपरीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी केंद्रनिहाय भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. शिक्षण विभागाकडून सहा भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. यामध्ये शिक्षणाधिकारी माध्यमिक, शिक्षणाधिकारी प्राथमिक, शिक्षणाधिकारी योजना, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य, महिला अधिकारी आणि बोर्ड पथकाचा समावेश आहे. याशिवाय जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांचाही पथकात समावेश आहे.

इलेक्ट्राॅनिक गॅझेटवर बंदीफसवणुक मुक्त परीक्षा मोहिमेवर भर देऊन निष्पक्ष परीक्षा सुनिश्चित करण्यासाठी मंडळाने कडक व्यवस्था केली आहे. परीक्षा हॉलमध्ये मोबाइल फोन, ब्लूटूथ उपकरणे आणि स्मार्ट घड्याळे यासारखी इलेक्ट्रॉनिक गॅझेट घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. विद्यार्थ्यांना फक्त आवश्यक स्टेशनरी वस्तू आणण्याची परवानगी आहे. याशिवाय परीक्षा शिफ्ट संपेपर्यंत विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमधून बाहेर पडू दिले जाणार नाही.

पालकांना धास्ती मुलांची मस्तीबारावी परिक्षेच्या पहिल्या दिवशी खुप दिवसांनी मित्र मैत्रीणी भेटल्यामुळे त्यांच्यात गप्पांचा माहोल होता. या उलट परिक्षा केंद्राबाहेर मुलांना सोडून गेलेल्या पालकांना मात्र पेपर कसा असेल? वेळ पुरेल का? नक्की अभ्यास झालाय का? यासारखे प्रश्न सतावत होते. त्यामुळे परिक्षा केंद्राबाहेर पालकांच्या चेहऱ्यावरची धास्ती आणि केंद्रात मुलांची मस्ती असा माहोल पहायला मिळाला.

दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी शिक्षण विभागाकडून सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. परीक्षा शांततेच्या आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. परीक्षेचा पहिला दिवस विनाविघ्न पार पडला आहे. शेवटच्या पेपरपर्यंत यंत्रणा कटाक्षाने सुरळीत परिक्षा पार पाडण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. - प्रभावती कोळेकर, शिक्षणाधिकारी माध्यमिक

टॅग्स :Satara areaसातारा परिसरHSC / 12th Exam12वी परीक्षाStudentविद्यार्थी