शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

HSC/12th Exam: हूश.. पहिला पेपर अगदी विना विघ्न, विद्यार्थ्यांना जादा दहा मिनिटांचा फायदा

By प्रगती पाटील | Updated: February 21, 2024 16:45 IST

सातारा जिल्ह्यात ३८ हजार विद्यार्थ्यांची हजेरी 

सातारा : करिअरच्यादृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या बारावी परिक्षेचा पहिला पेपर विनाविघ्न पार पडला. वेळेपूर्वी परिक्षा केंद्रांवर दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांना सोडायला पालकांची मोठी गर्दी झाली होती. परिक्षा काळात दहा मिनिटे जादा मिळाल्याने मुलांना याचा फायदाही झाला. विशेष म्हणजे परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांना शांततापूर्ण वातावरणात पेपर सोडवता यावा या उद्देशाने शिक्षण विभागाकडून प्रत्येक केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परीक्षा केंद्र पासून शंभर मीटरच्या अंतरात प्रवेश बंदीचे आदेशही लागू करण्यात आले होते. जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील परीक्षा केंद्रांवर सज्ज असलेल्या यंत्रणेच्या देखरेखीखाली  बारावीच्या परीक्षेला झाली आहे. बारावी परीक्षेसाठी जिल्ह्यातून ३८ हजार विद्यार्थी बसले. जिल्ह्यातील बारावीची विद्यार्थी संख्या लक्षात घेऊन परीक्षा केंद्र सज्ज केली आहेत. जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाकडून कॉपीमुक्त परीक्षा पार पाडावी यासाठी सर्व केंद्रांवरील सोयीसुविधांची पाहणी करण्यात आली आहे.भरारी पथक यांचीही नेमणूकपरीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी केंद्रनिहाय भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. शिक्षण विभागाकडून सहा भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. यामध्ये शिक्षणाधिकारी माध्यमिक, शिक्षणाधिकारी प्राथमिक, शिक्षणाधिकारी योजना, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य, महिला अधिकारी आणि बोर्ड पथकाचा समावेश आहे. याशिवाय जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांचाही पथकात समावेश आहे.

इलेक्ट्राॅनिक गॅझेटवर बंदीफसवणुक मुक्त परीक्षा मोहिमेवर भर देऊन निष्पक्ष परीक्षा सुनिश्चित करण्यासाठी मंडळाने कडक व्यवस्था केली आहे. परीक्षा हॉलमध्ये मोबाइल फोन, ब्लूटूथ उपकरणे आणि स्मार्ट घड्याळे यासारखी इलेक्ट्रॉनिक गॅझेट घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. विद्यार्थ्यांना फक्त आवश्यक स्टेशनरी वस्तू आणण्याची परवानगी आहे. याशिवाय परीक्षा शिफ्ट संपेपर्यंत विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमधून बाहेर पडू दिले जाणार नाही.

पालकांना धास्ती मुलांची मस्तीबारावी परिक्षेच्या पहिल्या दिवशी खुप दिवसांनी मित्र मैत्रीणी भेटल्यामुळे त्यांच्यात गप्पांचा माहोल होता. या उलट परिक्षा केंद्राबाहेर मुलांना सोडून गेलेल्या पालकांना मात्र पेपर कसा असेल? वेळ पुरेल का? नक्की अभ्यास झालाय का? यासारखे प्रश्न सतावत होते. त्यामुळे परिक्षा केंद्राबाहेर पालकांच्या चेहऱ्यावरची धास्ती आणि केंद्रात मुलांची मस्ती असा माहोल पहायला मिळाला.

दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी शिक्षण विभागाकडून सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. परीक्षा शांततेच्या आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. परीक्षेचा पहिला दिवस विनाविघ्न पार पडला आहे. शेवटच्या पेपरपर्यंत यंत्रणा कटाक्षाने सुरळीत परिक्षा पार पाडण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. - प्रभावती कोळेकर, शिक्षणाधिकारी माध्यमिक

टॅग्स :Satara areaसातारा परिसरHSC / 12th Exam12वी परीक्षाStudentविद्यार्थी