शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

खासगी बसमधून मृतदेहाचा सातारा ते नेरूळ प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2022 12:00 IST

ट्रॅव्हल्स कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा कारणीभूत : अपघातग्रस्त तरुणीचा उपचाराअभावी मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : गोवा येथून मुंबईला येणाऱ्या तरुणीचा प्रवासातच मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे सातारा येथेच ती निपचित पडलेली असतानाही ट्रॅव्हल्सचालकांनी तिला रुग्णालयात घेऊन जाण्यास नकार दिला. परिणामी, मृत तरुणीचा सातारा ते नेरूळ असा प्रवास झाला.

तमिना आलीम (२२) असे मृत तरुणीचे नाव असून ती गोव्यातील एका बारमध्ये काम करते. तिचे कुटुंबीय मालाडला राहायला आहेत. शुक्रवारी गोव्यात तिच्या दुचाकीचा अपघात झाला होता. यामुळे आईने तिला मुंबईला बोलावून घेतले होते. त्यामुळे शनिवारी रात्री ती गोव्यावरून मालाडला येण्यासाठी आत्माराम ट्रॅव्हल्समधून प्रवास करत होती. यावेळी सोबत तिचा एक मित्रदेखील होता. रविवारी सकाळी ही ट्रॅव्हल्स सातारा येथे पोहोचली असता तमिना ही निपचित पडल्याचे आढळून आले, तर ट्रॅव्हल्सचा कर्मचारी तिला सीपीआर देत असल्याचे मित्राच्या निदर्शनास आले. यामुळे त्याने तत्काळ जवळच्या रुग्णालयात तिला घेऊन जाण्याची विनंती केली. मात्र, ट्रॅव्हल्सच्या चालकाने बस न थांबवता मुंबईच्या दिशेने प्रवासाला सुरुवात केल्याचा आरोप तमिनाच्या मित्राने केला आहे. नेरूळमध्ये बस आली असता हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. रुग्णालयात दाखल केले असता तिला मृत घोषित केले.

मृत्यूमागे नेमके कारण काय?शवविच्छेदनात डोक्यावर झालेल्या दुखापतीमध्ये तिचा मृत्यू झाल्याचे समोर आल्याचे वरिष्ठ पोलिस तानाजी भगत यांनी सांगितले. मात्र, तिच्या मृत्यूमागे इतर काही कारण आहे का? शिवाय कोणाच्या हलगर्जीमुळे तिचा मृत्यू झाला, हेदेखील तपासले जाणार असल्याचे भगत यांनी सांगितले. दरम्यान, ट्रॅव्हल्स कर्मचाऱ्यांनी वेळीच तिला रुग्णालयात दाखल केले असते, तर तिचे प्राणदेखील वाचू शकले असते.

 

टॅग्स :Bus Driverबसचालकsatara-acसातारा