शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

खासगी बसमधून मृतदेहाचा सातारा ते नेरूळ प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2022 12:00 IST

ट्रॅव्हल्स कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा कारणीभूत : अपघातग्रस्त तरुणीचा उपचाराअभावी मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : गोवा येथून मुंबईला येणाऱ्या तरुणीचा प्रवासातच मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे सातारा येथेच ती निपचित पडलेली असतानाही ट्रॅव्हल्सचालकांनी तिला रुग्णालयात घेऊन जाण्यास नकार दिला. परिणामी, मृत तरुणीचा सातारा ते नेरूळ असा प्रवास झाला.

तमिना आलीम (२२) असे मृत तरुणीचे नाव असून ती गोव्यातील एका बारमध्ये काम करते. तिचे कुटुंबीय मालाडला राहायला आहेत. शुक्रवारी गोव्यात तिच्या दुचाकीचा अपघात झाला होता. यामुळे आईने तिला मुंबईला बोलावून घेतले होते. त्यामुळे शनिवारी रात्री ती गोव्यावरून मालाडला येण्यासाठी आत्माराम ट्रॅव्हल्समधून प्रवास करत होती. यावेळी सोबत तिचा एक मित्रदेखील होता. रविवारी सकाळी ही ट्रॅव्हल्स सातारा येथे पोहोचली असता तमिना ही निपचित पडल्याचे आढळून आले, तर ट्रॅव्हल्सचा कर्मचारी तिला सीपीआर देत असल्याचे मित्राच्या निदर्शनास आले. यामुळे त्याने तत्काळ जवळच्या रुग्णालयात तिला घेऊन जाण्याची विनंती केली. मात्र, ट्रॅव्हल्सच्या चालकाने बस न थांबवता मुंबईच्या दिशेने प्रवासाला सुरुवात केल्याचा आरोप तमिनाच्या मित्राने केला आहे. नेरूळमध्ये बस आली असता हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. रुग्णालयात दाखल केले असता तिला मृत घोषित केले.

मृत्यूमागे नेमके कारण काय?शवविच्छेदनात डोक्यावर झालेल्या दुखापतीमध्ये तिचा मृत्यू झाल्याचे समोर आल्याचे वरिष्ठ पोलिस तानाजी भगत यांनी सांगितले. मात्र, तिच्या मृत्यूमागे इतर काही कारण आहे का? शिवाय कोणाच्या हलगर्जीमुळे तिचा मृत्यू झाला, हेदेखील तपासले जाणार असल्याचे भगत यांनी सांगितले. दरम्यान, ट्रॅव्हल्स कर्मचाऱ्यांनी वेळीच तिला रुग्णालयात दाखल केले असते, तर तिचे प्राणदेखील वाचू शकले असते.

 

टॅग्स :Bus Driverबसचालकsatara-acसातारा