शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
3
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
4
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
5
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
6
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
7
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
8
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
9
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
10
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
11
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
12
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
13
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
14
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
15
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
16
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
17
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
18
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
19
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
20
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र

सांगा..‘कृष्णे’तील ६५ कोटींचे कर्ज कुणाचे?

By admin | Updated: December 3, 2015 00:40 IST

७८४ वाहनधारकांना नोटिसा : जुन्या संचालक मंडळाने कशाच्या आधारावर कर्ज उचलले?

कऱ्हाड : रेठरे बुद्रुक, ता. कऱ्हाड येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सन २०१४-१५ च्या ऊस गळित हंगामासाठी ऊसवाहतूक करणाऱ्या ७८४ वाहनधारकांना न घेतलेल्या कर्जापोटी प्रत्येकी ७ लाख रुपये अशा एकूण ६५ कोटी २ लाखांच्या परतफेड करण्याच्या बोगस नोटिसा बँक आॅफ इंडियाच्या कऱ्हाड शाखेतून बजावण्यात आल्या आहेत. या नोटिसांमुळे सर्व वाहनधारक हवालदिल झाले असून, याबाबत चौकशी करण्यात यावी, असे निवेदन सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांना देण्यात आले आहे. निवेदनातील माहिती अशी, सन २०१४-१५ च्या गळित हंगामासाठी ऊस वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या ७८४ वाहनधारकांच्या मालकांनी कोणत्याही प्रकारचे कर्ज बँक आॅफ इंडियाकडून घेतले नाही. तसेच बहुतांश वाहनमालकांनी कोणत्याही प्रकारचा करार या कारखान्याशी केलेला नाही. असे असतानाही एकूण ७८४ वाहनमालकांना प्रत्येकी ७ लाख रुपये असे एकूण ६५ कोटी २ लाखांची परतफेड करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. कर्ज नसतानाही नोटिसा आल्यामुळे सर्व वाहनमालक हवालदिल झाले आहेत. नोटिसा आल्यामुळेच आम्हाला कर्जाबाबत माहिती मिळाल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. कर्ज असताना गेल्या वर्षभरात बँकेने कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार न करता अचानक नोटीस कशी बजावली? असा प्रश्न वाहनमालक उपस्थित करत आहेत. तसेच बँकेकडून सन २०१४-१५ सालात कर्ज प्रकरणासाठी फसवून सह्या घेण्यात आल्या असल्याचे वाहनमालकांचे म्हणणे आहे. तत्कालीन अध्यक्ष अविनाश मोहिते व त्यांच्या संचालक मंडळाने कशाच्या आधाराने कोट्यवधींचे कर्ज उचलले, मिळालेली रक्कम अध्यक्ष अविनाश मोहिते व संचालक मंडळाने नेमकी कोठे खर्ची घातली, की या कोट्यवधींच्या रकमेचा अपहार अथवा गैरमार्गासाठी अवलंब झाला आहे, या प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे आहे. कारखान्याच्या माहितीनुसार ७८५ ठेकेदारांच्या नावे ८३१ करारप्रकरणे झाली आहे. या प्रकरणांपैकी २७८ प्रकरणे अशी आहेत की, ज्यामध्ये संबंधित वाहनमालकांनी व बैलगाडीधारकांनी कारखान्यांशी कोणताही करार केलेला नाही. तसेच कारखान्याकडून किंवा बँकेकडून कोणतीही अ‍ॅडव्हान्स रक्कम उचललेली नाही. तरीही तत्कालीन अध्यक्ष अविनाश मोहिते व संचालक मंडळाने २७८ लोकांच्या नावे १९ कोटी ४६ लाखांची कर्जे घेतली आहेत. वाहनमालकांची कोणतीही परवानगी नसताना, तसेच कारखान्याशी कोणताही संबंध नसताना कोट्यवधी रुपये उचलून बोगस कर्ज प्रकरणे करून आमची फसवणूक केली आहे. आमच्या नावे कर्ज उचलण्याचा मोहिते यांचा प्रकार म्हणजे आमच्याबरोबर बँकेचीही शुद्ध फसवणूक आहे. कारखान्याकडून ८३१ करारांपैकी ५५३ करारधारकांना प्रत्येक वाहनामागे कमीत कमी ५० हजारांपासून जास्तीत जास्त ५ लाखांपर्यंत रक्कम करारापोटी अ‍ॅडव्हान्स म्हणून देण्यात आली. ही रक्कम संबंधित वाहनधारकांकडून परतफेड करण्यात आली असतानाही, प्रत्येकाला बँकेकडून प्रत्येकी ७ लाखांची परतफेडीची नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे तत्कालीन अध्यक्ष व संचालक मंडळाच्या या बेजबाबदार कारभाराची सखोल चौकशी करावी, तसेच करार नसतानाही कर्ज प्रकरणे कशी केली, तो पैसा कोठे वापरला, याची सखोल चौकशी करून वाहनमालकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. (प्रतिनिधी) बँकेकडून अनाधिकाराने नोटिसा : अविनाश मोहिते - डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या संचालक मंडळाच्या काळातील कर्जाची जबाबदारी आमच्या संचालक मंडळाने घेतली. मात्र आमच्या संचालक मंडळाने काढलेल्या कर्जाची जबाबदारी न घेता आणि कारखान्याची जाबाबदारी असताना शेतकऱ्यांना नोटीसा पाठविण्यात येत आहेत. बँकेने कारखान्याला कर्ज दिले आणि कारखान्याने तोडणी वाहतूकदारांना उचल दिली असताना बँकेने अनाधिकाराने नोटीसा पाठविल्या आहेत,’ असा आरोप कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी एका पत्रकान्वये केला आहे. - आपल्या पत्रकात मोहिते पुढे म्हणाले की, सहा वर्षांपूर्वी डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या काळात आयडीबीआय बँकेचे बेसल डोससाठी शेतकऱ्यांच्या नावे कर्ज उचलण्यात आले होते. ते कर्ज थकित झाल्यानंतर आम्ही कोणत्याही शेतकऱ्यांना नोटिसा जाणार नाहीत, याची काळजी घेतली होती. आता बँक आॅफ इंडियाचे तोडणी वाहतुकीचे कर्ज थकित आहे. ते भरण्यास विद्यमान संचालक मंडळाने नकार दिला आहे. तसेच त्या कर्जाचे पुनर्गठणही करण्यात आलेले नाही. त्यामुळे बँकेने तोडणी वाहतूकदार व शेतकरी सभासदांना त्यांच्याकडे असलेल्या कागदपत्रांच्या आधारे नोटिसा पाठविलेल्या आहेत.’ - ‘हा संपूर्ण विषय क्लिष्ट आणि कायदेशीर स्वरूपाचा आहे. आम्हा संचालकांना व संस्थापक पॅनेलला बदनाम करण्यासाठी व अपुऱ्या माहितीच्या आधाराने बदनामीकारक माहिती माध्यमांकडे पाठविले जात आहे. संबंधितांवर कायदेशीर कारवाई करणार आहोत,’ असेही माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी पत्रकात म्हटले आहे.