शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

पोलिसांची भूमिका पार पाडतायत शिक्षक

By admin | Updated: March 20, 2016 23:50 IST

महामार्ग ओलांडण्यासाठी मदत : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी वाहतूक नियंत्रणाचे काम

भुर्इंज : पुणे-बंगळूर महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामामुळे भुर्इंज परिसरात मोठ्या प्रमाणावर कामे सुरु आहेत. त्यामुळे ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांची चांगलीच तारांबळ उडत आहे. विद्यार्थ्यांना महामार्ग ओलांडताना अक्षरश: जीव मुठीत धरुन कसरत करावी लागत असल्याने येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे शिक्षकच स्वत:चा वेळ खर्ची करुन नियमितपणे वाहतूक नियंत्रणाचे काम अव्याहतपणे करत आहेत. रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय अगदी महामार्गालगतच व गावापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर आहे. या विद्यालयात सुमारे २ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेसाठी महामार्ग ओलांडताना विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागते. शाळेच्या वेळेत महामार्गालगत विद्यार्थ्यांची अक्षरश: झुंबड उडत आहे. शाळेच्या वेळेत महामार्गावर एकही वाहतूक पोलिस आपले कर्तव्य बजावताना दिसत नाही. किंंबहुना रस्ता वाहतूक सुरक्षा हा विषयच संबंधित पोलिस विभागाच्या डायरीत नाही काय, असा प्रश्न पडण्याजोगी परिस्थिती आहे. मात्र येथील शिक्षकांनी पोलिसांच्या या असहकाराबाबत ओरड करण्याऐवजी पोलिसांची भूमिका स्वत:च बजावण्यास सुरुवात केली. विद्यार्थ्यांना महामार्ग सुरक्षितपणे ओलांडता यावा, यासाठी दररोज ४ शिक्षक आपला वेळ खर्ची करुन रस्ता वाहतूक नियंत्रणाचे काम करत आहेत. दोन्ही बाजूची वाहने थांबवून विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडण्यास या शिक्षकांची होत असलेली मदत म्हणजे एक प्रकारची विद्यार्थीसेवाच आहे. प्रत्येक ५ ते १० मिनिटांनी ठराविक संख्येने विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी दोन्ही बाजूच्या रस्त्यावर शिक्षक थांबलेले असतात. अनेकदा काही वाहनचालक या शिक्षकांना जुमानत नाहीत, मात्र तरीही हे शिक्षक त्याची पर्वा न करता आपल्या कर्तव्याशी इमान राखत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेताना दिसत आहेत. त्यासाठी सर्व शिक्षकांनी या सेवेसाठी दिवस वाटून घेतले असून घरी लवकर जाण्याची घाई न करता त्यांच्याकडून सुरु असलेल्या या कामाबद्दल परिसरातील नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे. (प्रतिनिधी) पोलिसांनी इकडेही पहावेविद्यार्थ्यांसह सर्वच पादचाऱ्यांना रस्ता सुरक्षितपणे ओलांडता आला पाहिजे. नागरिक म्हणून रस्ता सुरक्षासेवा हा त्यांचा अधिकार आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांनी या ठिकाणी आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. त्यादृष्टीने हे काम वाहतूक पोलिसांचे असून ते मात्र भलत्याच कामात दंग असतात. त्यामुळे शिक्षकांचीही सेवा पाहून पोलिसांनी शाळा सुटण्याच्या वेळेत महामार्गावर आपले कर्तव्य बजवावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.