शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
6
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
7
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
8
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
9
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
10
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
11
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
12
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
13
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
14
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
15
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
16
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
17
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
18
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
19
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
20
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

तालुकाध्यक्षपदाबाबत पक्षश्रेष्ठींकडे बाजू मांडली : काळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:25 IST

दहिवडी : ‘राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्याला माण तालुकाध्यक्ष पदाच्या निवडीचे पत्र दिले होते. मात्र, मतदारसंघातील काही ...

दहिवडी : ‘राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्याला माण तालुकाध्यक्ष पदाच्या निवडीचे पत्र दिले होते. मात्र, मतदारसंघातील काही नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे व्यक्तिदोषातून चुकीची माहिती दिल्याने अध्यक्षपदाला स्थगिती मिळाली. याबाबत पक्षश्रेष्ठींकडे आपण बाजू मांडली आहे. मी २००६ पासून काँग्रेसचा शिपाई म्हणून काम करत आहे यापुढेही निष्ठेने काम करत राहणार आहे. त्यामुळे पदाबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय देतील तो मान्य असेल,’ असे मत राष्ट्रीय काँग्रेस युवकचे राज्य चिटणीस दादासाहेब काळे यांनी व्यक्त केले.

दादासाहेब काळे यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा तळागाळातील सर्व जातीधर्मांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे. प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्याला हा पक्ष नेहमीच न्याय देतो. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मंत्री बाळासाहेब थोरात, विश्वजित कदम, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे आदी वरिष्ठ नेतेमंडळींच्या मार्गदर्शनाखाली आपण माण खटाव युवकचे अध्यक्षपदाची व राज्य युवक चिटणीसपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. पक्षात किती आले अन् गेले तरी आम्ही प्रामाणिकपणे पक्षाचे काम करतो आहोत अन् काम करत राहणार आहे. समाजाच्या हितासाठी धनगर समाज आरक्षण कृती समितीत राज्यभर काम करत आहे. ओबीसी समन्वयक म्हणून काम करत आहे. त्यामुळे समाजबांधव आपल्याशी मोठ्या प्रमाणात जोडला गेला आहे.

माण तालुक्यात पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी आपणावर पक्षश्रेष्ठींनी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. मात्र निवडीनंतर मतदारसंघातील नेत्यांनी गैरसमजातून पक्षश्रेष्ठींकडे चुकीची माहिती दिल्याने आपल्या निवडीला स्थगिती देण्यात आली. या स्थगितीनंतर समाजबांधव व कार्यकर्त्यांनी या निर्णयाविरोधात आवाज उठवत निषेध व्यक्त केले. मात्र ते आपल्या प्रेमापोटी केले असून सर्वांनी शांत राहून सहकार्य करावे. पक्षश्रेष्ठींना तालुक्यातील राजकीय कुरघोड्या चांगल्याच माहीत आहेत. ते निश्चितच चांगल्या कार्याची दखल घेत आपल्याला न्याय देतील,’ असा विश्वासही पत्रकातून व्यक्त केला आहे.