शहरं
Join us  
Trending Stories
1
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
2
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
3
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
4
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
5
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
6
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
7
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
8
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
9
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
10
कॅनरा बँकेला ११७ कोटींचा गंडा; अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये कारवाई
11
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा
12
मेड इन इंडिया 'ई-विटारा'ची १०० देशांमध्ये होणार निर्यात; पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारताच्या आत्मनिर्भर आणि..."
13
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
14
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
15
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
16
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
17
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
18
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
19
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
20
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?

‘पैसे घ्या, पण पिण्याचे पाणी द्या’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 16:10 IST

यावर्षी तारळी प्रकल्पाचे पाणी पिण्यासाठी द्या, पिण्याच्या पाण्यासाठी लागणारे पैसे भरण्याची ही तयारी आहे. मात्र, टँकर नको कॅनालद्वारे पाणी द्या, अशी मागणी धोंडेवाडीसह मानेवाडी, तुपेवाडी, दातेवाडी, दगडवाडी, पळसगाव, कातरखटाव, सूर्याचीवाडी, पिंपरी या

ठळक मुद्देतारळी, उरमोडी प्रकल्प । धोंडेवाडीसह नऊ गावांची पैसे भरण्याची तयारी, पिकांना मिळेना पाणी

संदीप कुंभार ।मायणी : सध्या उन्हाची तीव्रता खूप वाढत चालली आहे. त्यामुळे धोंडेवाडीसह नऊ गावांतील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. या ग्रामस्थांनी तारळी प्रकल्पाचे पिण्याचे पाणी देण्यासाठी ‘पैसे घ्या, पण कॅनालद्वारे पाणी द्या,’ अशी विनंती तारळी व उरमोडीप्रकल्प अधिकऱ्यांकडे केली आहे.

खटाव तालुक्याचा पूर्व भागाचा शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी दोन दशकांपूर्वी तारळी उपसा सिंचन योजना या प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली होती. मात्र, या प्रकल्पाला दोन दशके होऊन गेली तरी या प्रकल्पाचे काम अद्याप अपूर्णच आहे. त्यामुळे आजही उन्हाळा आला की, या भागातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी शासनाकडे टँकरची मागणी करावी लागत आहे.

यावर्षी तारळी प्रकल्पाचे पाणी पिण्यासाठी द्या, पिण्याच्या पाण्यासाठी लागणारे पैसे भरण्याची ही तयारी आहे. मात्र, टँकर नको कॅनालद्वारे पाणी द्या, अशी मागणी धोंडेवाडीसह मानेवाडी, तुपेवाडी, दातेवाडी, दगडवाडी, पळसगाव, कातरखटाव, सूर्याचीवाडी, पिंपरी या नऊ गावांनी तारळी व उरमोडी प्रकल्प अधिकाऱ्यांकडे केली आहे.

खटाव व माण तालुक्यांतील एकूण आठ हजार ८७६ हेक्टर इतक्या अवर्षणप्रवण क्षेत्राला सिंचनाचा लाभ तारळी प्रकल्पामुळे मिळणार आहे. त्यासाठी आजवर चारवेळा प्रशासकीय मान्यता घेण्यात आली. या मान्यतेमुळे प्रकल्पांतर्गत रखडलेले भूसंपादन, पुनर्वसन व २६ किलोमीटर कालव्याचे काम पूर्ण झाले. खटाव पूर्वभागात इतकाच दुष्काळी भाग हा माण तालुक्यातील आहे.

या माण तालुक्यातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी १४ मे पासून पाणी दिले जात आहे. मात्र, तेव्हापासून खटाव पूर्व भागाला पाणी द्यावे, अशी मागणी या नऊ गावांतील ग्रामस्थ करीत असताना सुद्धा याकडे प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष होताना दिसत आहे.

नऊ गावांतील ग्रामस्थांनी अनेकवेळा तारळी प्रकल्प अधिकारी उरमोडी प्रकल्प अधिकाºयांच्या कार्यालयात हेलपाटे घातले आहेत. संबंधित अधिका-यांकडून अनेकवेळा त्यांना सकारात्मक उत्तर मिळत असले तरी कारवाई मात्र आजपर्यंत झालेली नाही. त्यामुळे नक्की या उन्हाळ्यात पाणी पिण्यासाठी मिळणार की नाही, हा मात्र प्रश्न सध्यातरी मागे लागताना दिसत नाही. उन्हाळ्यात शेती केली जात नाही. त्यामुळे फक्त पिण्याच्या पाण्याची गरज आहे. या भागात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू नाहीत. यामुळे शासनाचा यावर्षीचा खर्चही वाचला आहे. सध्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर झाला आहे.

काम अजून अपूर्णधोंडेवाडीसह गावातील कॅनॉलचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, याच प्रकल्पाअंतर्गत असलेल्या अनफळे, मोराळे, मायणी व मरडवाक या गावांचा परिसरातील कॅनॉलची कामे अजून अपूर्ण आहेत. तर काही ठिकाणी काम सुरूही झाले नाही. त्यामुळे हे काम केव्हा पूर्ण होणार, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

 

या वर्षी शेतकऱ्यांनी पाण्यासाठी प्रकल्प अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून पैसे भरण्याची तयारी केली. मात्र, अधिकाºयांनी पुढील सूचनेअभावी हे पैसे असूनही पैसे भरायचे तरी कोठे? हा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी लॉकडाऊन आहे. लॉकडाऊन संपल्यावर अधिकार यांच्याविरुद्ध तीव्र आंदोलन उभे करून त्यांना तालुका बंदी केली जाईल.- हणमंत भोसले,उपसरपंच, धोंडेवाडी, तालुका खटाव

 

तारळी प्रकल्प व उरमोडी प्रकल्प विभागातील दोन्ही अधिकाऱ्यांचे एकमेकांशी समन्वय नाही. त्यामुळे दोन्ही विभागाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. यामुळे नेमके पाणी यावर्षी तरी देणार का, हा प्रश्न निर्माण झाला आहे.- रामचंद्र घोलप, सामाजिक कार्यकर्ते

 

टॅग्स :water transportजलवाहतूकSatara areaसातारा परिसर