शहरं
Join us  
Trending Stories
1
Video : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या केरळ दौऱ्यादरम्यान अपघात; हेलिकॉप्टर उतरताच हेलिपॅड खचले, थोडक्यात टळली दुर्घटना 
2
Ladki Bahin Yojana : खूशखबर! भाऊबीजेआधी लाडक्या बहि‍णींसाठी खास ओवाळणी; ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार?
3
अवघ्या ५ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न, तरुणानं धावत्या ट्रेनसमोर मारली उडी! व्हिडीओत म्हणाला, "सगळ्यांनी ऐका, माझी बायको.."
4
Gold Silver Price Drop: सोन्या चांदीचे दर जोरदार आपटले; ४ वर्षातील सर्वात मोठी घसरण, काय आहे यामागचं कारण
5
आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी; राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी, निवडणुकांची चाचपणी
6
का रे दुरावा? सुयश टिळक आणि आयुषी भावेच्या नात्यात बिनसलं, दिवाळीलाही एकत्र दिसलं नाही जोडपं
7
ट्रम्प यांचा PM मोदींशी फोनवरून संवाद; ट्रेडवर चर्चा, रशियन तेल खरेदीसंदर्भा पुन्हा मोठा दावा!
8
"शेजाऱ्यांशी बोलताना मागून ड्रेसला लागली आग, अभिनेत्रीला...", ऐन दिवाळीत घडली दुर्घटना
9
पाकिस्तानच्या थाळीतून टोमॅटो गायब! लाहोर, कराचीत महागाईचा भडका; अफगाणिस्तानने शिकवला 'हा' धडा
10
ट्रम्प-पुतिन भेट रद्द; व्हाईट हाऊसने फेटाळले बुडापेस्ट शिखर परिषदेचे वृत्त
11
आजचे राशीभविष्य : बुधवार २२ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ संभवतो, व्यापारी वर्गाचे गुंतलेले पैसे मिळतील
12
PM मोदींचा स्वदेशी नारा; जनतेला पत्र; ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ बुलंद करण्यासाठी प्रयत्न करा
13
बाधित क्षेत्र ३ हेक्टर मानून मदत; राज्य सरकारचा निर्णय, पूरग्रस्त शेतकऱ्यांना होणार लाभ
14
दीपिका पादुकोण-रणवीर सिंगने पहिल्यांदाच दाखवला लेकीचा चेहरा; लाडक्या दुआचे खास फोटो केले शेअर
15
अपात्र लाडक्या बहिणींनी उकळले १६४ कोटी रुपये, १२ हजारांवर पुरूष तर अपात्र महिला ७७ हजार
16
मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात ऐन दिवाळीत पावसाचा बार; पुढील तीन दिवस असेच वातावरण राहणार
17
उमेदवार जाहीर होताच महाआघाडीतील दरी स्पष्ट; राजद, काँग्रेस, डाव्या पक्षांनी केले दुहेरी अर्ज
18
बिहार निवडणूक २०२५: १२१ मतदारसंघांत एकूण १,३१४ उमेदवार; महिला मतदारांच्या आधारे ‘जदयु’ बळकट
19
“महाआघाडीला नव्हे, भाजप जनसुराजला घाबरतेय; आमचे उमेदवार फोडतेय”; प्रशांत किशोर यांचा आरोप
20
...तर H1B व्हिसाधारकांना वाढीव शुल्क लागणार नाही; पण वाढ कायम; ट्रम्प प्रशासनाकडून स्पष्टता

‘पैसे घ्या, पण पिण्याचे पाणी द्या’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 16:10 IST

यावर्षी तारळी प्रकल्पाचे पाणी पिण्यासाठी द्या, पिण्याच्या पाण्यासाठी लागणारे पैसे भरण्याची ही तयारी आहे. मात्र, टँकर नको कॅनालद्वारे पाणी द्या, अशी मागणी धोंडेवाडीसह मानेवाडी, तुपेवाडी, दातेवाडी, दगडवाडी, पळसगाव, कातरखटाव, सूर्याचीवाडी, पिंपरी या

ठळक मुद्देतारळी, उरमोडी प्रकल्प । धोंडेवाडीसह नऊ गावांची पैसे भरण्याची तयारी, पिकांना मिळेना पाणी

संदीप कुंभार ।मायणी : सध्या उन्हाची तीव्रता खूप वाढत चालली आहे. त्यामुळे धोंडेवाडीसह नऊ गावांतील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. या ग्रामस्थांनी तारळी प्रकल्पाचे पिण्याचे पाणी देण्यासाठी ‘पैसे घ्या, पण कॅनालद्वारे पाणी द्या,’ अशी विनंती तारळी व उरमोडीप्रकल्प अधिकऱ्यांकडे केली आहे.

खटाव तालुक्याचा पूर्व भागाचा शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी दोन दशकांपूर्वी तारळी उपसा सिंचन योजना या प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली होती. मात्र, या प्रकल्पाला दोन दशके होऊन गेली तरी या प्रकल्पाचे काम अद्याप अपूर्णच आहे. त्यामुळे आजही उन्हाळा आला की, या भागातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी शासनाकडे टँकरची मागणी करावी लागत आहे.

यावर्षी तारळी प्रकल्पाचे पाणी पिण्यासाठी द्या, पिण्याच्या पाण्यासाठी लागणारे पैसे भरण्याची ही तयारी आहे. मात्र, टँकर नको कॅनालद्वारे पाणी द्या, अशी मागणी धोंडेवाडीसह मानेवाडी, तुपेवाडी, दातेवाडी, दगडवाडी, पळसगाव, कातरखटाव, सूर्याचीवाडी, पिंपरी या नऊ गावांनी तारळी व उरमोडी प्रकल्प अधिकाऱ्यांकडे केली आहे.

खटाव व माण तालुक्यांतील एकूण आठ हजार ८७६ हेक्टर इतक्या अवर्षणप्रवण क्षेत्राला सिंचनाचा लाभ तारळी प्रकल्पामुळे मिळणार आहे. त्यासाठी आजवर चारवेळा प्रशासकीय मान्यता घेण्यात आली. या मान्यतेमुळे प्रकल्पांतर्गत रखडलेले भूसंपादन, पुनर्वसन व २६ किलोमीटर कालव्याचे काम पूर्ण झाले. खटाव पूर्वभागात इतकाच दुष्काळी भाग हा माण तालुक्यातील आहे.

या माण तालुक्यातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी १४ मे पासून पाणी दिले जात आहे. मात्र, तेव्हापासून खटाव पूर्व भागाला पाणी द्यावे, अशी मागणी या नऊ गावांतील ग्रामस्थ करीत असताना सुद्धा याकडे प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष होताना दिसत आहे.

नऊ गावांतील ग्रामस्थांनी अनेकवेळा तारळी प्रकल्प अधिकारी उरमोडी प्रकल्प अधिकाºयांच्या कार्यालयात हेलपाटे घातले आहेत. संबंधित अधिका-यांकडून अनेकवेळा त्यांना सकारात्मक उत्तर मिळत असले तरी कारवाई मात्र आजपर्यंत झालेली नाही. त्यामुळे नक्की या उन्हाळ्यात पाणी पिण्यासाठी मिळणार की नाही, हा मात्र प्रश्न सध्यातरी मागे लागताना दिसत नाही. उन्हाळ्यात शेती केली जात नाही. त्यामुळे फक्त पिण्याच्या पाण्याची गरज आहे. या भागात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू नाहीत. यामुळे शासनाचा यावर्षीचा खर्चही वाचला आहे. सध्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर झाला आहे.

काम अजून अपूर्णधोंडेवाडीसह गावातील कॅनॉलचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, याच प्रकल्पाअंतर्गत असलेल्या अनफळे, मोराळे, मायणी व मरडवाक या गावांचा परिसरातील कॅनॉलची कामे अजून अपूर्ण आहेत. तर काही ठिकाणी काम सुरूही झाले नाही. त्यामुळे हे काम केव्हा पूर्ण होणार, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

 

या वर्षी शेतकऱ्यांनी पाण्यासाठी प्रकल्प अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून पैसे भरण्याची तयारी केली. मात्र, अधिकाºयांनी पुढील सूचनेअभावी हे पैसे असूनही पैसे भरायचे तरी कोठे? हा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी लॉकडाऊन आहे. लॉकडाऊन संपल्यावर अधिकार यांच्याविरुद्ध तीव्र आंदोलन उभे करून त्यांना तालुका बंदी केली जाईल.- हणमंत भोसले,उपसरपंच, धोंडेवाडी, तालुका खटाव

 

तारळी प्रकल्प व उरमोडी प्रकल्प विभागातील दोन्ही अधिकाऱ्यांचे एकमेकांशी समन्वय नाही. त्यामुळे दोन्ही विभागाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. यामुळे नेमके पाणी यावर्षी तरी देणार का, हा प्रश्न निर्माण झाला आहे.- रामचंद्र घोलप, सामाजिक कार्यकर्ते

 

टॅग्स :water transportजलवाहतूकSatara areaसातारा परिसर