शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाडल्या ऊसतोडी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 18:39 IST

पहिला हप्ता जाहीर केल्याशिवाय उसाच्या फडातील उसाची एक कांडीही तोडून देऊ नये, असा इशारा देत शनिवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वाठार, काले, आटके परिसरात फडात सुरू असलेल्या ऊसतोडी बंद पाडल्या. गेल्या आठवड्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी ऊसदराबाबत आंदोलने केली आहेत.

ठळक मुद्देवाठार, काले, आटके परिसरात आंदोलन दर जाहीर केल्याशिवाय ऊसतोडी न घेण्याचे केले आवाहन

कऱ्हाड ,दि. ०४ : पहिला हप्ता जाहीर केल्याशिवाय उसाच्या फडातील उसाची एक कांडीही तोडून देऊ नये, असा इशारा देत शनिवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वाठार, काले, आटके परिसरात फडात सुरू असलेल्या ऊसतोडी बंद पाडल्या. गेल्या आठवड्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी ऊसदराबाबत आंदोलने केली आहेत.

 यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, जिल्हा प्रवक्ते विकास पाटील, उपजिल्हाध्यक्ष दादासाहेब यादव, स्वाभिमानीचे नेते अनिल घराळ, कऱ्हाड तालुकाध्यक्ष प्रमोद जगदाळे, रोहित पाटील, बाळासाहेब पिसाळ, योगेश झांबरे, अमर कदम आदींची उपस्थिती होती.

गेल्या आठवड्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्ह्यात विविध ठिकाणी ऊसदराबाबत आंदोलने केली आहेत. ऊसदराच्या आंदोलनाची पहिली ठिणगीही कऱ्हाड तालुक्यातील पार्ले येथून गत आठवड्यापूर्वी पडली होती. हबरवाडी येथे शुक्रवारी होत असलेली ऊस वाहतूक रोखत टॅक्टर-ट्रॉलीतील चाकांतील हवा कार्यकर्त्यांनी सोडली होती. त्यानंतर शनिवारी (दि. ४) रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वाठार, काले, आटके परिसरात आंदोलन केले.

कार्यकर्त्यांनी शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास काले परिसरातील उसतोड सुरू असलेल्या पाच फडात जाऊन तोडी बंद पाडल्या. तसेच शेतकऱ्यांना जोपर्यंत उसाचा पहिला हप्ता ३ हजार ४०० रुपये कारखान्यांकडून जाहीर केला जात नाही, तोपर्यंत तोडी घेऊ नये, असे आवाहन केले.

 

माझ्या शेतात आज ऊसतोड सुरू होती. मात्र या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आले. त्यांनी त्यांच्या आंदोलनामागची भूमिका मला पटवून दिली. त्यावेळी मी स्वत:हूनच ऊसतोडणी बंद करायला परवानगी दिली आहे. कारखानदार उचल जाहीर करत नसल्यामुळे संघटनांना आंदोलन करावे लागत आहे. यात सामान्य शेतकऱ्यांचे हाल होत आहेत.- शशिकांत यादवशेतकरी, काले

 

उसाची पहिली उचल ३ हजार ४०० रुपये जाहीर करा, अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी ऊस परिषदेत केली आहे. मात्र, कारखानदार त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहेत. उचल जाहीर न करताच अनेकांनी ऊसतोडणी सुरू केलेली आहे. आपला ऊस लवकर जावा, या भूमिकेने काही शेतकरीही बळी पडत आहेत. ही बाब चुकीची असून, शेतकऱ्यांनी स्वत:च्या हितासाठी स्वाभिमानीच्या आंदोलनास पाठिंबा द्यावा, आम्ही शांत मार्गाने आंदोलन करीत आहोत. मात्र, कारखानदारांनी आडमुठेपणा सोडला नाही तर आम्हाला आंदोलनाची तीव्रता वाढवावी लागेल.- विकास पाटीलजिल्हा प्रवक्ते, स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :FarmerशेतकरीRaju Shettyराजू शेट्टी