शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

सातारा जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाडल्या ऊसतोडी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 18:39 IST

पहिला हप्ता जाहीर केल्याशिवाय उसाच्या फडातील उसाची एक कांडीही तोडून देऊ नये, असा इशारा देत शनिवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वाठार, काले, आटके परिसरात फडात सुरू असलेल्या ऊसतोडी बंद पाडल्या. गेल्या आठवड्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी ऊसदराबाबत आंदोलने केली आहेत.

ठळक मुद्देवाठार, काले, आटके परिसरात आंदोलन दर जाहीर केल्याशिवाय ऊसतोडी न घेण्याचे केले आवाहन

कऱ्हाड ,दि. ०४ : पहिला हप्ता जाहीर केल्याशिवाय उसाच्या फडातील उसाची एक कांडीही तोडून देऊ नये, असा इशारा देत शनिवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वाठार, काले, आटके परिसरात फडात सुरू असलेल्या ऊसतोडी बंद पाडल्या. गेल्या आठवड्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी ऊसदराबाबत आंदोलने केली आहेत.

 यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, जिल्हा प्रवक्ते विकास पाटील, उपजिल्हाध्यक्ष दादासाहेब यादव, स्वाभिमानीचे नेते अनिल घराळ, कऱ्हाड तालुकाध्यक्ष प्रमोद जगदाळे, रोहित पाटील, बाळासाहेब पिसाळ, योगेश झांबरे, अमर कदम आदींची उपस्थिती होती.

गेल्या आठवड्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्ह्यात विविध ठिकाणी ऊसदराबाबत आंदोलने केली आहेत. ऊसदराच्या आंदोलनाची पहिली ठिणगीही कऱ्हाड तालुक्यातील पार्ले येथून गत आठवड्यापूर्वी पडली होती. हबरवाडी येथे शुक्रवारी होत असलेली ऊस वाहतूक रोखत टॅक्टर-ट्रॉलीतील चाकांतील हवा कार्यकर्त्यांनी सोडली होती. त्यानंतर शनिवारी (दि. ४) रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वाठार, काले, आटके परिसरात आंदोलन केले.

कार्यकर्त्यांनी शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास काले परिसरातील उसतोड सुरू असलेल्या पाच फडात जाऊन तोडी बंद पाडल्या. तसेच शेतकऱ्यांना जोपर्यंत उसाचा पहिला हप्ता ३ हजार ४०० रुपये कारखान्यांकडून जाहीर केला जात नाही, तोपर्यंत तोडी घेऊ नये, असे आवाहन केले.

 

माझ्या शेतात आज ऊसतोड सुरू होती. मात्र या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आले. त्यांनी त्यांच्या आंदोलनामागची भूमिका मला पटवून दिली. त्यावेळी मी स्वत:हूनच ऊसतोडणी बंद करायला परवानगी दिली आहे. कारखानदार उचल जाहीर करत नसल्यामुळे संघटनांना आंदोलन करावे लागत आहे. यात सामान्य शेतकऱ्यांचे हाल होत आहेत.- शशिकांत यादवशेतकरी, काले

 

उसाची पहिली उचल ३ हजार ४०० रुपये जाहीर करा, अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी ऊस परिषदेत केली आहे. मात्र, कारखानदार त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहेत. उचल जाहीर न करताच अनेकांनी ऊसतोडणी सुरू केलेली आहे. आपला ऊस लवकर जावा, या भूमिकेने काही शेतकरीही बळी पडत आहेत. ही बाब चुकीची असून, शेतकऱ्यांनी स्वत:च्या हितासाठी स्वाभिमानीच्या आंदोलनास पाठिंबा द्यावा, आम्ही शांत मार्गाने आंदोलन करीत आहोत. मात्र, कारखानदारांनी आडमुठेपणा सोडला नाही तर आम्हाला आंदोलनाची तीव्रता वाढवावी लागेल.- विकास पाटीलजिल्हा प्रवक्ते, स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :FarmerशेतकरीRaju Shettyराजू शेट्टी