शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

जगण्यासाठी मरणाच्या प्रांतात झुंबड! : लांबच लांब रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 16:26 IST

प्रधानमंत्री जनधन योजनेतून महिलांच्या खात्यावर पाचशे रुपये, शेतकरी सन्मान योजनेतून शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये तर ज्ज्ज्वला गॅस धारकांच्या खात्यावर ७५० रुपये केंद्र शासनाने जमा केले आहेत.

ठळक मुद्देसोशल डिस्टन्सिंगचा उडतोय फज्जा

सागर गुजरसातारा : कोरोनाचा विकार मृत्यूच्या रुपानं रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी दबा धरून बसलाय. राष्ट्रीयकृत बँका तसेच जीवनावश्यक वस्तू खरेदी केंद्रांवर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवून लोक जमा होताना पाहायला मिळत आहेत. आता जणूकाही याच मरणाच्या प्रांतात जगण्यासाठी लोकांची झुंबड उडालीय!

प्रधानमंत्री जनधन योजना, शेतकरी सन्मान योजना तसेच उज्ज्वला गॅसची रक्कम योजनांतील लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झालेले आहे. ही रक्कम काढून घेण्यासाठी बँकांसमोर तोबा गर्दी होते. प्रधानमंत्री जनधन योजनेतून महिलांच्या खात्यावर पाचशे रुपये, शेतकरी सन्मान योजनेतून शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये तर ज्ज्ज्वला गॅस धारकांच्या खात्यावर ७५० रुपये केंद्र शासनाने जमा केले आहेत.

शासनाकडून जमा झालेले पैसे काढून घेण्यासाठी प्रत्येक बँकेबाहेर तोबा गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. बहुतांशी राष्ट्रीयकृत बँकांच्या बाहेर खातेदारांच्या रांगा लागलेल्या आहेत.

ग्राहकांसाठी बँकांची वेळ सकाळी आठ ते अकरा एवढी मर्यादित असल्याने शेकडोंच्या संख्येने येणाऱ्या ग्राहकांना सेवा देण्यात बँकांना अडचणी निर्माण होताना दिसत आहेत. त्यातच बँकांच्या बाहेर उन्हातानात लोक उभे राहतात. यातून नवीन समस्या निर्माण होताना दिसत आहेत. बँकांच्या बाहेर सोशल डिस्टन्सिंगचा अभाव तीव्रतेने जाणवतो. यातून एखादा कोरोनाबाधित या रांगेत उभा असेल तर साहजिकच कोरोनाचा संसर्ग पसरण्याची दाट शक्यता आहे.

बँकांत समोर दररोज उभी राहणारी ही रांग थोपवण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे. या व्यतिरिक्त किराणा, रेशनिंग दुकान तसेच भाजीपाला विक्री केंद्रांवर लोकांची झुंबड उडते. ही गर्दी रोखण्यासाठी उपाययोजना प्रशासनाला करावी लागणार आहे. तरच कोरोनाचा प्रसार थांबू शकतो.

  • खरेदीच्या वेळा ठरल्याने गर्दी

जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीचा वेळा ठराविक असल्याने सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी रस्त्यांवर मोठी गर्दी होत आहे. सकाळी आठ ते अकरा ही मर्यादित वेळ किराणा व भाजीपाला खरेदीसाठी तसेच रेशन खरेदीसाठी केल्यानं जणूकाही या कालावधीत कोरोना विश्रांती घेतो, अशा अविर्भावात लोक रस्त्यावर उतरताना दिसतात.

 

प्रशासनाने किराणा माल आणि भाजी घरपोच देण्याचं जाहीर केलं असलं तरी अजून किराणा माल घरपोच करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे किराणा आणि रेशनिंग आणण्यासाठी घराबाहेर पडावं लागतं.- महेश पाटील 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSatara areaसातारा परिसर