शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
8
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
9
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
10
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
11
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
12
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
13
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
14
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
15
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
16
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
17
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
18
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
19
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
20
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

नरवीरांच्या पराक्रमामुळे स्वराज्य घडले : संतोष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:27 IST

औंध : ‘या भूमीत नरवीरांच्या महान पराक्रमामुळेच शिवछत्रपतींचे स्वराज्य घडले,’ असे मत वडूज मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संतोष देशमुख ...

औंध : ‘या भूमीत नरवीरांच्या महान पराक्रमामुळेच शिवछत्रपतींचे स्वराज्य घडले,’ असे मत वडूज मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संतोष देशमुख यांनी केले.

खटाव तालुक्यातील चौकीचा आंबा येथे अखिल भारतीय जीवा सेना, आलुतेदार-बलुतेदार संघटनेच्यावतीने स्वराज्य रक्षणासाठी साक्षात मृत्यूला सामोरे गेलेले वीर शिवाजी काशीद, नरवीर बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू देशपांडे, वीर शंभूसिंह जाधव तसेच नटश्रेष्ठ निळूभाऊ यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी मार्केट कमिटीचे माजी संचालक शिवाजीराव जाधव, हिंदकेसरी विकास तात्या जाधव, भीमराव जाधव, सुभाष जाधव, मुख्याध्यापक हणमंत पवार, संतोष चव्हाण, संयोजक सोमनाथ काळे, सतीश डोंगरे, दत्ता कोळी, शरद कदम, पंकज कदम, अजित वाघ, संतोष मोरे, संभाजी देवकर उपस्थित होते.

डॉ. देशमुख म्हणाले, ‘पराक्रमी वीरांचा स्मृतिदिन साजरा केल्यामुळे त्यांच्या त्यागाचे स्मरण नवीन पिढीस होण्यास मदत होणार आहे. आजकाल कोणत्याही संघटनेत समर्पित भावनेने काम करणारे कार्यकर्ते कमी होत आहेत.’

धनंजय क्षीरसागर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. सोमनाथ काळे यांनी आभार मानले.

१४औंध

फोटो : चौकीचा आंबा येथे कार्यक्रमप्रसंगी डॉ. संतोष देशमुख, शिवाजी जाधव, पै. विकासतात्या जाधव, सोमनाथ काळे उपस्थित होते. (छाया : रशिद शेख)