शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

नरवीरांच्या पराक्रमामुळे स्वराज्य घडले : संतोष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:27 IST

औंध : ‘या भूमीत नरवीरांच्या महान पराक्रमामुळेच शिवछत्रपतींचे स्वराज्य घडले,’ असे मत वडूज मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संतोष देशमुख ...

औंध : ‘या भूमीत नरवीरांच्या महान पराक्रमामुळेच शिवछत्रपतींचे स्वराज्य घडले,’ असे मत वडूज मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संतोष देशमुख यांनी केले.

खटाव तालुक्यातील चौकीचा आंबा येथे अखिल भारतीय जीवा सेना, आलुतेदार-बलुतेदार संघटनेच्यावतीने स्वराज्य रक्षणासाठी साक्षात मृत्यूला सामोरे गेलेले वीर शिवाजी काशीद, नरवीर बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू देशपांडे, वीर शंभूसिंह जाधव तसेच नटश्रेष्ठ निळूभाऊ यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी मार्केट कमिटीचे माजी संचालक शिवाजीराव जाधव, हिंदकेसरी विकास तात्या जाधव, भीमराव जाधव, सुभाष जाधव, मुख्याध्यापक हणमंत पवार, संतोष चव्हाण, संयोजक सोमनाथ काळे, सतीश डोंगरे, दत्ता कोळी, शरद कदम, पंकज कदम, अजित वाघ, संतोष मोरे, संभाजी देवकर उपस्थित होते.

डॉ. देशमुख म्हणाले, ‘पराक्रमी वीरांचा स्मृतिदिन साजरा केल्यामुळे त्यांच्या त्यागाचे स्मरण नवीन पिढीस होण्यास मदत होणार आहे. आजकाल कोणत्याही संघटनेत समर्पित भावनेने काम करणारे कार्यकर्ते कमी होत आहेत.’

धनंजय क्षीरसागर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. सोमनाथ काळे यांनी आभार मानले.

१४औंध

फोटो : चौकीचा आंबा येथे कार्यक्रमप्रसंगी डॉ. संतोष देशमुख, शिवाजी जाधव, पै. विकासतात्या जाधव, सोमनाथ काळे उपस्थित होते. (छाया : रशिद शेख)