शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
3
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
4
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
5
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
6
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
7
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
8
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
9
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
10
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
11
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
12
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
13
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
14
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
15
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
16
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
17
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
18
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
19
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
20
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी

म्युकरमायकोसिससाठी जिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रियागृह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:25 IST

सातारा : जिल्ह्यामध्ये म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळून येत आहेत, त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना कऱ्हाड येथे पाठवावे लागते. या रुग्णांवर सातारा ...

सातारा : जिल्ह्यामध्ये म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळून येत आहेत, त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना कऱ्हाड येथे पाठवावे लागते. या रुग्णांवर सातारा शहरातच उपचार व्हावेत, यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयांमध्ये शस्त्रक्रियागृह उभारण्याच्या अनुषंगाने प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हाधिकारी म्हणाले, म्युकरमायकोसिस या विकारातील रुग्णांवर शस्त्रक्रिया करायची असल्यास त्यांना कऱ्हाड येथील सह्याद्री अथवा कृष्णा हॉस्पिटलला पाठविले जाते. भविष्यात रुग्णांची संख्या वाढू शकते हे लक्षात घेऊन सातारा शहरातील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयमध्ये शस्त्रक्रियागृह तयार करण्यात येणार आहे.

दरम्यान, निपाह व्हायरसचा धोका सातारा जिल्ह्याला नाही, असे स्पष्टीकरण देखील जिल्हाधिकाऱ्यांनी केले. कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या कमी होत असून रुग्णवाढीचा दर ६.६९ टक्के इतका कमी झाला आहे. संभावित तिसऱ्या लाटेचा विचार करून लोकांनी बाजारपेठेमध्ये कमीत कमी गर्दी करावी. प्रशासनाने घालून दिलेले नियम पाळावेत, असे आवाहनदेखील जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

कोरोना महामारीच्या काळामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांची रत्नागिरी येथे बदली झालेली आहे. याबाबत प्रश्न उपस्थित केला असता जिल्हाधिकारी म्हणाले, जोपर्यंत साताऱ्याला जिल्हा आरोग्य अधिकारी मिळत नाही तोपर्यंत डॉ. आठल्ये यांना साताऱ्यातून रत्नागिरीला सोडण्यात येणार नाही.

सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सद्यस्थितीबाबत विचारले असता जिल्हाधिकारी म्हणाले, हे मेडिकल कॉलेज सुरू करण्यात आलेले आहे. जिल्हा शासकीय रुग्णालय तसेच जम्बो कोविड हॉस्पिटल या दोन संस्था कॉलेजकडे वर्ग करण्यात आलेले आहेत. तसेच माळवाडी येथील सावकार मेडिकल कॉलेज या संस्थेची इमारत तात्पुरत्या स्वरूपात भाडेतत्त्वावर शासकीय मेडिकल कॉलेजसाठी घेण्यात आले असून या ठिकाणी लॅब होस्टेल, क्लासेस, महाविद्यालयाची प्रशासकीय कार्यालय सुरू करण्यात आलेले आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशन करून झालेल्या डॉक्टरांचे नोकरी अर्ज मागून घेतले आहेत. ५० ते ६० डॉक्टर यासाठी तयार आहेत. ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे.